शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

आज मागासवर्गीयांचा राज्यभर निघणार आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

सरकारने १९७४पासून पदोन्नतीतील आरक्षण सुरू केले. त्यानंतर २००४ साली आरक्षण कायदा करून पदोन्नतीतील आरक्षण सर्व टप्प्यांवर चालू केले. मात्र, ...

सरकारने १९७४पासून पदोन्नतीतील आरक्षण सुरू केले. त्यानंतर २००४ साली आरक्षण कायदा करून पदोन्नतीतील आरक्षण सर्व टप्प्यांवर चालू केले. मात्र, अलीकडेच कोणत्याही न्यायालयाचा आदेश नसताना सरकारने एकतर्फी मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला. हा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, या मागणीसह विद्यार्थी फ्रीशिप योजना, शिष्यवृत्ती योजना सुरू करावी, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट रद्द करावी, नोकरीतील साडेचार लाखांचा अनुशेष भरून काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, मागील दीड वर्षात विविध जिल्ह्यात अनुसूचित जाती, जमातींवर केलेल्या अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करावी. ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व पदोन्नतीमधील आरक्षण सुरू करावे. सरकारी उद्योगांचे मोठ्या प्रमाणात खासगीकरण कंत्राटीकरण सुरू आहे, ते थांबविण्यात यावे. कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, कोरोनामध्ये मृत पावलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्या कुटुंबीयांना सरकारने ५० लाख रुपये द्यावेत, या मागण्यांसाठी राज्यातील एससी, एसटी, एनटी, एसबीसी, ओबीसीच्या कामगार, कर्मचारी, अधिकारी विद्यार्थी संघटना व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर तसेच मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या आक्रोश मोर्चाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध मंत्र्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तरी कोरोना नियमांचे पालन करून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड, सुनील निरभवणे, अरुण गाडे, एस. के. भंडारे, एन. जी. जारोंडे, सिद्धार्थ कांबळे, आत्माराम पाखरे, संजीवन गायकवाड, डॉ. नितीन कोळी, शरद कांबळे, डॉ. संजय कांबळे, संजय घोडके, प्रा. मधुकर उईके, अनिलकुमार ढोले, संजय खामकर, फरेंद्र कुतिरकर, राजकुमार जवादे, डॉ. बबन जोगदंड, डॉ. सुरेश पवार यांनी दिली आहे.