शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पवनीतील सावरला परिसरात वाघाने घेतला पुन्हा एकाचा बळी; एकाच आठवड्यात दुसरी घटना

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: April 4, 2024 18:58 IST

वाघाचा बंदोबस्त न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार

भंडारा : मोहफुले वेचण्यासाठी कुटुंबियांसह जंगलात गेलेल्या व्यक्तीवर हल्ला करून वाघाने ठार केले. ही घटना पवनी तालुक्यातील सावरला वन क्षेत्रात गुरूवारी दुपारी घडली. ताराचंद लक्ष्मण सावरबांधे (६०, सावरला, ता. पवनी)) असे मृताचे नाव असून एकाच आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे जनक्षोभ वाढला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ताराचंद सावरबांधे हे आपल्या कुटुंबियांसह मोहफुलें वेचण्यासाठी प्रादेशिक वनविभागाच्या सावरला परिसरातील कंपार्टमेंट ३१३ मध्ये गुरुवारी सकाळी गेले होते. सावरल्यावरून शेळी गावाकडे जाणाऱ्या रोडवरील मोहफुले वेचत परिवारातील मुलगा व पत्नी दुसऱ्या झाडाकडे मोह वेचण्याकरिता गेले. या दरम्यान, वाघाने ताराचंदवर झडप घेतली. यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे पत्नी व मुलगा हादरून गेले. त्यांनी गावात कळविताच ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली. दरम्यान प्रादेशिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह घटनास्थळी पोहचून नागिरकांची समजूत घातली. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे नेण्यात आले. दरम्यान जनतेचा आक्रोश पाहण्यासारखा होता. घटनास्थळी जिल्हा उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी निलक, डीवायएसपी मनोज सिडाम, ठाणेदार निलेश ब्राह्मणे, यांच्यासह उपसरपंच उत्तम सावरबांधे, शिवसेना नेते अनिल धकाते, प्रशांत भुते इत्यादींनी भेट दिली.वाघाचा बंदोबस्त न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार

सलग घटना घडूनही वनविभाग वाघाचा बंदोबस्त करत नाही. यामुळे शेतीची काम करणे, गुरे राखणे जोखिमीचे झाले आहे. सावरला-कान्हाळगाव क्षेत्र प्रादेशिक कार्यालयांतर्गत येते. लागूनच उमरेड-कऱ्हाडला व्याघ्र प्रकल्प आहे. मात्र वाघाचा संचार सावरला परिसरात जास्त आहे. हे माहीत असूनही काहीच उपाययोजना होत नाही. दखल न घेतल्यास लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा सावरला येथील गावकऱ्यांनी दिला.१० लाखांचा धनादेश

वन विभागाकडून ताराचंद सावरबांधेच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर उर्वरित १५ लाख रुपये फिक्स डीपाझिट करण्यात येणार असल्याचे उपवन संरक्षक राहुल गवई यांनी सांगितले.६ महिन्यात चवथा बळी

यापूर्वी गेल्या आठवड्यात कनहाळगाव येथील महिलेला वाघांने हल्ला करून जिवंत मारले होते. त्या घटनेची शाई वाळत नाही तोच ही घटना घडली. ६ महिन्यात वाघाने सावरला क्षेत्रातील ४ व्यक्तीचा बळी घेतला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे.