शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

९४१ निराधारांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 00:34 IST

लाखनी तालुक्याअंतर्गत निराधारांना आधार देण्याकरिता नायब तहसिलदार व समितीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सलग १२ तास काम करीत ....

दरमहा नियोजित निधीची अपेक्षा : विनोद थोरवे यांच्या सकारात्मक कार्याची फलश्रृतीमुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्याअंतर्गत निराधारांना आधार देण्याकरिता नायब तहसिलदार व समितीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सलग १२ तास काम करीत प्रलंबित असलेल्या एकूण अर्जापैकी ९४१ अर्ज मंजूर करत निराधारांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.लोकशाहीच्या प्रगतीकरीता समाजातील शेवटच्या टोकातील व्यक्तीला सन्मानपूर्वक जगण्याकरीता शासन व प्रशासन कटिबद्ध आहे. त्या दिशेने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत म्हाताऱ्यांना व गरजूंना मानधन योजना सुरू केली आहे. मात्र कित्येक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या वेळकाठू धोरणाने योजना कागदावरच राहतात. धोरणाचे महत्व व कामात कुचराई प्रवृत्तीमुळे नाहक शासन बदनाम होतो. नव्याने रूजू झालेले नायब तहसिलदार विनोद थोरवे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत समितीनेही सहकार्याची भूमिका निभवल्याने संजय गांधी योजने अंतर्गत ३८८, श्रावणबाळ २९२, वृद्धपकाळ २६१ अर्जांना न्याय देण्यात आले. सकाळी १०.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत समितीने काम पहात २.१३ पासूनचे प्रलंबित अर्जांना न्याय दिला. यामुळे अख्ख्या तालुक्यातील लाभार्थ्यांनी समितीचे व थोरवे सरांचे कौतुक केले आहे. समितीच्या अध्यक्षपदी पद्माकर बावनकर, सचिव ना. तहसिलदार विनोद थोरवे, सदस्यपदी सरपंच रत्नाकर नागलवाडे, रसिका कांबळे, सरपंच धनंजय घाटबांधे, देवानंद उे, लवकुश निर्वाण, प्रदीप रहांगडाले यांनी तहसिलदार राजीव शक्करवार यांच्या मार्गदर्शनात पारदर्शक काम पार पडले.२०१७ ची ही पहिलीच बैठक असून सहा महिन्यातून घेण्यात आल्याने लाभार्थ्यांचा मोठा रोष अधिनिस्त कर्मचाऱ्यांवर होता. कित्येक अर्ज लापता होण्याचे प्रमाणही वाढले होते. कित्येकांना दुसऱ्यांनदा अर्ज करावा लागून असून चातकाप्रमाणे बैठकीचे वाढ लाभार्थी पहात होते. या समितीच्या नावाने कित्येक दलाही लाखनी तहसिल कार्यालयात सक्रिय होते. तहसिलदार राजीव शक्करवार कर्तव्यतत्पर असूनही कामाचे हात कमी असल्याने सेवेला अडचण जात होती. त्यांच्या मदतीला आता विनोद थोरवे नव्या जोमाने सहकार्य करीत असल्याने तहसिल कार्यालयही गतीशिल झाले हे विशेष.लाभार्थ्यांची प्रत्येक्ष भेट घेतल्यानंतर दरमहा नियोजित निधी बँकेमार्फत पुरविण्याची मागणी पुढे आली आहे. तीन-चार महिनेपर्यंत निधी / मदत मिळत नसल्याची खंत मंजुर लाभार्थ्यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे. कित्येक वर्षापासून केंद्र २०० रूपये तर राज्याचे ४०० रूपये देत आहे. यात महागाईनुसार व शासनाच्या जाहिरनाम्यानुसार दरमहा १००० रूपयाचे मागणीही लाभार्थ्यांनी केली आहे.