शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

९४१ निराधारांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 00:34 IST

लाखनी तालुक्याअंतर्गत निराधारांना आधार देण्याकरिता नायब तहसिलदार व समितीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सलग १२ तास काम करीत ....

दरमहा नियोजित निधीची अपेक्षा : विनोद थोरवे यांच्या सकारात्मक कार्याची फलश्रृतीमुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्याअंतर्गत निराधारांना आधार देण्याकरिता नायब तहसिलदार व समितीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सलग १२ तास काम करीत प्रलंबित असलेल्या एकूण अर्जापैकी ९४१ अर्ज मंजूर करत निराधारांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.लोकशाहीच्या प्रगतीकरीता समाजातील शेवटच्या टोकातील व्यक्तीला सन्मानपूर्वक जगण्याकरीता शासन व प्रशासन कटिबद्ध आहे. त्या दिशेने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत म्हाताऱ्यांना व गरजूंना मानधन योजना सुरू केली आहे. मात्र कित्येक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या वेळकाठू धोरणाने योजना कागदावरच राहतात. धोरणाचे महत्व व कामात कुचराई प्रवृत्तीमुळे नाहक शासन बदनाम होतो. नव्याने रूजू झालेले नायब तहसिलदार विनोद थोरवे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत समितीनेही सहकार्याची भूमिका निभवल्याने संजय गांधी योजने अंतर्गत ३८८, श्रावणबाळ २९२, वृद्धपकाळ २६१ अर्जांना न्याय देण्यात आले. सकाळी १०.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत समितीने काम पहात २.१३ पासूनचे प्रलंबित अर्जांना न्याय दिला. यामुळे अख्ख्या तालुक्यातील लाभार्थ्यांनी समितीचे व थोरवे सरांचे कौतुक केले आहे. समितीच्या अध्यक्षपदी पद्माकर बावनकर, सचिव ना. तहसिलदार विनोद थोरवे, सदस्यपदी सरपंच रत्नाकर नागलवाडे, रसिका कांबळे, सरपंच धनंजय घाटबांधे, देवानंद उे, लवकुश निर्वाण, प्रदीप रहांगडाले यांनी तहसिलदार राजीव शक्करवार यांच्या मार्गदर्शनात पारदर्शक काम पार पडले.२०१७ ची ही पहिलीच बैठक असून सहा महिन्यातून घेण्यात आल्याने लाभार्थ्यांचा मोठा रोष अधिनिस्त कर्मचाऱ्यांवर होता. कित्येक अर्ज लापता होण्याचे प्रमाणही वाढले होते. कित्येकांना दुसऱ्यांनदा अर्ज करावा लागून असून चातकाप्रमाणे बैठकीचे वाढ लाभार्थी पहात होते. या समितीच्या नावाने कित्येक दलाही लाखनी तहसिल कार्यालयात सक्रिय होते. तहसिलदार राजीव शक्करवार कर्तव्यतत्पर असूनही कामाचे हात कमी असल्याने सेवेला अडचण जात होती. त्यांच्या मदतीला आता विनोद थोरवे नव्या जोमाने सहकार्य करीत असल्याने तहसिल कार्यालयही गतीशिल झाले हे विशेष.लाभार्थ्यांची प्रत्येक्ष भेट घेतल्यानंतर दरमहा नियोजित निधी बँकेमार्फत पुरविण्याची मागणी पुढे आली आहे. तीन-चार महिनेपर्यंत निधी / मदत मिळत नसल्याची खंत मंजुर लाभार्थ्यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे. कित्येक वर्षापासून केंद्र २०० रूपये तर राज्याचे ४०० रूपये देत आहे. यात महागाईनुसार व शासनाच्या जाहिरनाम्यानुसार दरमहा १००० रूपयाचे मागणीही लाभार्थ्यांनी केली आहे.