शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

दोन वर्षात कर्करोगाने ८८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: January 5, 2016 00:59 IST

चिमूटभर तंबाखू मनुष्याची नशा पुर्ण करतो. मात्र, अनेक घटक पदार्थानेयुक्त तंबाखू शरीरास किती घातक आहे, ..

प्रशांत देसाई भंडाराचिमूटभर तंबाखू मनुष्याची नशा पुर्ण करतो. मात्र, अनेक घटक पदार्थानेयुक्त तंबाखू शरीरास किती घातक आहे, याची कल्पना मनुष्याला येत नाही. त्यामुळे क्षणभरासाठी तंबाखूतून नशेचा आनंद मिळत असला तरी यामुळे मागील दोन वर्षात जिल्ह्यात कर्करोगाने ग्रस्त ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ४५ महिला व ४३ पुरूषांचा समावेश असून तुमसर तालुक्यात सर्वाधिक ३४ तर लाखांदूर येथे केवळ एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दोन वर्षांपासून ते २६ सप्टेंबर २०१५ पर्यंत कर्करोगाने मृत्यू झालेल्यांची नोंद आहे. यात ८८ रूग्णाचा मृत्यू झाला असून त्यात तुमसर तालुक्यात मृत्यूसंख्या सर्वाधिक आहे. भंडारा तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात कमी मृत्यू लाखांदूर येथे झाले असून तिथे एका महिलेचा कर्करोगाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. तंबाखूमुळे मानवाचे आर्युमान सरासरी १५ वर्षाने कमी होते. तंबाखू हे व्यापारी उत्पादन असून त्यामुळे होणारे मृत्यू व एवढी मनुष्यहानी जगातील कुठल्याही व्यापारी उत्पादनाने होत नाही. तंबाखूमुळे गभर्पात होऊ शकतो.तंबाखूमुळे स्त्रियांना होणारे बाळ कमी वजनाचे, मतिमंद, जन्मजात शारीरिक व्याधीसह वा मृत जन्माला येते. तंबाखूमुळे स्त्रियांच्या हिरड्यांना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हिरड्यांचे विकार वाढतात, त्यामुळे दात अकाली पडतात व विद्रुप दिसू शकतात. कर्करोग होण्यामागे तंबाखू हे मुख्य कारण असले तरी शितपेयाचे अतिसेवन, अनुवांशिकता, अनियमित आहार, क्ष-किरणाच्या संपर्कात राहणे, फास्टफुड यांच्यामुळे धोका होतो.महिलांना उद्भवू शकतो त्रासतंबाखूमुळे स्त्रियांना गर्भाशयाचा, फुफ्फुसाचा, तोंडाचा व इतर अवयवांचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. तंबाखूमुळे स्त्रियांची प्रजनन क्षमता घटू शकते व रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते. तंबाखूमुळे होणारे दृष्परिणाम लक्षात घेता जे लोक सध्या तंबाखूचे सेवन करीत आहेत, त्यांना व्यसन सोडण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. तंबाखू सेवनापासून परावृत्त केल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शासकीय रूग्णालयात कर्करोग तपासणी शिबिर घेण्यात येतात.- डॉ. देवेंद्र पातूरकर,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा.