शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

८२ गावेच दुष्काळग्रस्त कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:18 IST

तुमसर व मोहाडी तालुक्यात खरीप व रबी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. प्रशासनाने ५० पैशांच्या आत आणेवारी दाखविली.

पंचबुध्दे यांचा आरोप : शेतकऱ्यांवर अन्याय, महसूल प्रशासनाचे दुर्लक्षतुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यात खरीप व रबी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. प्रशासनाने ५० पैशांच्या आत आणेवारी दाखविली. केवळ ८२ गावांना दुष्काळग्रस्त दाखविण्यात आले. भौगोलिकदृष्ट्या तुमसर व मोहाडी तालुक्यांच्या सीमा लागल्या आहेत. दोन्ही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य के. के. पंचबुध्दे यांनी केली आहे.तुमसर व मोहाडी तालुक्यात सिंचनाच्या सोयी केवळ कागदावर आहेत. तुमसर तहसील प्रशासनाने केवळ १२ गावांची आणेवारी ५० पैशाच्या खाली दाखविली. मोहाडी तालुक्यात ७० गावांची आणेवारी ५० पैशाच्या आत आहे. दोन्ही तालुक्यातील सर्वच गावे दुष्काळात होरपडत आहेत. दोन्ही तालुक्याच्या सीमा लागुन आहेत. तुमसर व मोहाडी तालुक्यातील केवळ ८२ गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली. जी गावे दुष्काळग्रस्त घोषित झाली व जी गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली नाही त्यात कोणताच फरक नाही. खरीप व रबीची दोन्ही पीक येथे शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. बानवथडी प्रकल्पातून केवळ २० टक्के शेतकऱ्यांनाच सिंचनाचा लाभ मिळाला. तलावातून केवळ बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला. वैनगंगेच्या काठावरची गावे सुध्दा दुष्काळाच्या छायेत आहेत. महसूल प्रशासनाने केलेली आणेवारी दोषपूर्ण आहे. येथे शेतकऱ्यात प्रचंड असंतोष खदखदत आहे. शासनाने येथे पुन्हा सर्वे करावा. तुमसर तालुक्यातील केवळ १२ गावांचा समावेश करण्यात आला. एका गावाजवळील दुसरे गाव येथे दुष्काळग्रस्त यादीत नाही. रस्ता ओलांडल्यानंतर दुसऱ्या गावाच्या सीमा सुरु होतात. एक गाव दुष्काळग्रस्त व दुसरे गाव दुष्काळग्रस्त नाही, हे कसे काय शक्य आहे. असा प्रश्न के.के. पंचबुध्दे यांनी उपस्थित केला. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यातील गावे दुष्काळग्रस्त घोषित झाली नाही. दोन्ही तालुके ुदुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुध्दे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)