शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

भंडारा जिल्हा परिषदेच्या ७८१ शाळा डिजीटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:00 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये म्हणून जिल्हा परिषदेने समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ७८१ शाळा डिजीटल झाल्या असून या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचे अद्यवत शिक्षण ग्रामीण विद्यार्थी घेत आहेत.

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियान : ग्रामीण विद्यार्थी घेत आहेत माहिती तंत्रज्ञानाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये म्हणून जिल्हा परिषदेने समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ७८१ शाळा डिजीटल झाल्या असून या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचे अद्यवत शिक्षण ग्रामीण विद्यार्थी घेत आहेत.शहरी भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण योग्य वेळी मिळते. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी माहिती तंत्रज्ञानापासून दूर असतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात सर्वाधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरीबांची मुले शिकतात. ही मुले स्पर्धेच्या युगात मागे पडू नये यासाठी भंडारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत ७८१ शाळा डिजीटल झाल्या असून या शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यांना एक जबाबदार नागरिक आणि सक्षम होण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण दिले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल वर्गखोली ही संकल्पना राबविली जात आहे. यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. या अभियानाच्या माध्यमातूनच जिल्हा परिषद शाळा डिजीटल केल्या जात आहेत.आमदार विकास निधीतून जिल्ह्यात २ हजार ३४३ वर्गखोल्या डिजीटल करण्यात आल्या आहेत. या वर्गामध्ये संगणक, प्रोजेक्टर, एलसीडी, टीव्ही आणि इंटरनेटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. चलचित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविल्या जात असल्याने विषय चटकन समजतो.सातही तालुक्यातील शाळांचा समावेशजिल्हा परिषद आणि स्थानिक व्यवस्थापनाच्या सातही तालुक्यातील शाळांमधील वर्गखोल्या डिजीटल करण्यात आल्या आहेत. त्यात भंडारा जिल्ह्यातील १५१ शाळा, मोहाडी ९८, तुमसर १७३, साकोली ८४, पवनी १०६, लाखनी ९१, लाखांदूर ७८ शाळांचा समावेश आहे. यासोबतच भंडारा तालुक्यातील १२८ शाळा, मोहाडी ८९, तुमसर ९३, साकोली ९४, पवनी १२०, लाखनी ८९, लाखांदूर ८० अशा ६९३ शाळा प्रगत शाळांमध्ये परावर्तीत झाल्या आहेत.माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात शहरी विद्यार्थ्यांसोबत ग्रामीण विद्यार्थी स्पर्धेत टिकावे यासाठी शाळांचे डिजीटलायझेशन केले जात आहे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत २ हजार ३४३ वर्गखोल्या डिजीटल झाल्या आहेत.-प्रकाश काळे, जिल्हा समन्वयक, समग्र शिक्षा अभियान, भंडारा