शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

७६ टक्के रोपवाटिका तयार

By admin | Updated: July 2, 2015 00:48 IST

मागील काही दिवसांपासून पाऊस पडत नाही. पडलेच तर अत्यल्प प्रमाणात, तेही कुठे पाऊस तर कुठे नाही.

ओलावा कायम : मात्र पावसासाठी नजरा आकाशाकडे

गोंदिया : मागील काही दिवसांपासून पाऊस पडत नाही. पडलेच तर अत्यल्प प्रमाणात, तेही कुठे पाऊस तर कुठे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा सद्यस्थितीत आकाशाकडे आहेत. असे असतानाही जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ०३५ हेक्टर जमिनीत रोपवाटिका लावण्याचे कार्य पूर्ण केले आहे. मात्र १० दिवसात पाऊस न पडल्यास रोपवाटिकेला नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन वर्षांपासून सतत दुष्काळाचे चटके शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. खरीप हंगामात अधिक उत्पन्न घेवून कर्जमुक्त होवू, असे त्यांना वाटते. मात्र आता पाऊस दडी मारल्यासारखा दिसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तरी सहा-सात दिवस जरी पाऊन आले नाही तरी जमिनील ओलाव्यामुळे रोपवाटिकेवर विपरित परिणाम होणार नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात भात पिकाच्या रोपवाटिकेचे क्षेत्र १७ हजार हेक्टरच्या वर असून सध्या १३ हजार ०३५ हेक्टरमध्ये रोपवाटिका लावण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. गोंदिया तालुक्यात २ हजार १५८ हेक्टर, तिरोडा तालुक्यात दोन हजार २५० हेक्टर, गोरेगाव तालुक्यात एक हजार ३४८ हेक्टर, आमगाव तालुक्यात एक हजार ७०० हेक्टर, सालेकसा तालुक्यात एक हजार ७५ हेक्टर, देवरी तालुक्यात १ हजार ३२७ हेक्टर, सडक-अर्जुनी तालुक्यात १ हजार ७१५ हेक्टर व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एक हजार ७१५ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका लावण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या नोंदीनुसार जून महिन्यात ११२ टक्के पाऊस पडले आहे. २५, २६ व २९ जून रोजी सर्वच तालुक्यात पाऊस पडले आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा असून रोपवाटिका सद्या वाळण्याची शक्यता नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)संकरित तूर बियाणे मोफत वितरितशासनाने कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २५ क्विंटल आयसीपीएच २७४० नावाचे संकरित तूर बियाणे शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी लाभार्थ्यांना हे बियाणे मोफत वितरित केले जात असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात गोंदिया तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.३ क्विंटल, गोरेगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल, तिरोडा तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल व देवरी तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल वाटप करणे सुरू आहे. तसेच आमगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी या तिन्ही तालुक्यातील प्रत्येकी ७०० शेतकऱ्यांना २.५ क्विंटल सदर तूर बियाणे मोफत वाटप केले जात आहे.