शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

६९३ गावांना टंचाईसदृश्य परिस्थितीतून वगळले

By admin | Updated: January 15, 2015 22:45 IST

धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव व निर्सगाच्या अवकृपेमुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. त्यानंतरही प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे घोषित केली आहे.

देवानंद नंदेश्वर - भंडाराधानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव व निर्सगाच्या अवकृपेमुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. त्यानंतरही प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे घोषित केली आहे. यात १५४ गावांची ५० पैसेपेक्षा कमी तर ६९३ गावांची ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ६९३ गावातील शेतकऱ्यांना टंचाईसदृश्य स्थितीतून वगळले आहे. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना सवलतींचा लाभ मिळणार नाही.खरीप हंगामात धानाचे उत्पादन कमालिचे घटल्याने शेतकऱ्यांवर बिकट परीस्थिती ओढावली आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत ६९३ गावातील पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्हा प्रशासनाने ८४७ गावांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे दर्शविली आहे. यातील १५४ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ६९३ गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.भंडारा तालुक्यातील १७० गावांची पैसेवारी ६० पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ६० पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ५९ पैसे, पवनी तालुक्यातील १५१ गावांची पैसेवारी ५१ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५९ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ५४ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ५१ पैसे दाखविण्यात आली आहे. यातील १० गावे अकृषक पाण्याखालील पिक असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहिर केली नाही. यामध्ये पवनी तालुक्यातील १० गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८७८ एकूण गावांपैकी ८४७ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. पवनी तालुक्यातील १० गावांमध्ये दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावे आहेत. यापैकी ८४७ गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहिर करण्यात आली. यात ६९३ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यावर्षी जिल्हा प्रशासनाने धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही अंतिम आणेवारी ५६ पैसे दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे़१५४ गावांना मिळणार लाभजिल्ह्यातील १५४ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. यात भंडारा तालुक्यातील एक, मोहाडी तालुक्यातील २४, तुमसर ९, पवनी ४८, लाखांदूर ३४, लाखनी ३८, तर साकोली तालुका निरंक दाखविण्यात आला आहे. १५४ गावे टंचाई सदृश्य परिस्थतीत असल्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, दहावी व बारावी परिक्षेचे शुल्क माफ, रोहयो अंतर्गत निकषात शिथीलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी टँकरने पुरविणे, कृषीपंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत.