शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

६.२३ कोेटींचे चुकारे अडले

By admin | Updated: April 4, 2016 01:04 IST

खरीप हंगामात धान उत्पादनात घट झाली आहे. यावर्षांत जिल्ह्यातील ५७ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर १७,३४६

देवानंद नंदेश्वर ल्ल भंडाराखरीप हंगामात धान उत्पादनात घट झाली आहे. यावर्षांत जिल्ह्यातील ५७ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर १७,३४६ शेतकऱ्यांकडून एकूण ६ लाख १७ हजार ३६६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़ या धानाची किंमत ८७ कोटी ०४ लाख ८६ हजार ६० रूपये एवढी आहे. यासह शेतकऱ्यांना प्रती क्विटल २०० रुपये बोनसप्रमाणे १२ कोटी ३४ लाख ७३ हजार २०० रुपयांचे वाटप होत आहेत. ३१ मार्चपर्यत शेतकऱ्यांना धान खरेदी व बोनस मिळून एकूण ९३ कोटी १० लाख ५६ हजार १९५ रुपयांचे चुकारे वाटप करण्यात आले आहे. अद्यापही ६ कोटी २३ लाख ३ हजार १५ रुपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे अडले आहे.भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला होता़ निसर्गाच्या प्रकोपामुळे धान पिक उत्पादनात घट झाली. यावर्षी सुरुवातीला धान खरेदी केंद्र सुरू करण्यास उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. विविध संघटनांच्या आक्रमक भूमिकांमुळे जिल्ह्यात एकुण ५७ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. उच्च प्रतिच्या धानाला प्रती क्विंटल १,४६० रूपये तर, साधारण प्रतिच्या धानाला १,४१० रुपये आधारभूत किंमत देण्यात आली. १ नोव्हेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण ६ लाख १७ हजार ३६६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़ यात भंडारा तालुक्यात ११ हजार ५४३.५५, मोहाडी तालुक्यात ३० हजार ६८३.२५, तुमसर तालुक्यात १ लाख २२ हजार ८९५.७०, लाखनी तालुक्यात १ लाख २३ हजार ९९६.२०, साकोली तालुक्यात ९७ हजार २०९.८०, लाखांदूर तालुक्यात १ लाख ५७ हजार ७७३.२० तर, पवनी तालुक्यात ७३ हजार ६४.६० क्विंटलचा समावेश आहे.८७.०४ कोटींची धान खरेदी४जिल्ह्यात ८७ कोटी ४ लाख ८६ हजार ६० रुपयांची धान खरेदी करण्यात आली़ जिल्ह्यात अ ग्रेड धानाची खरेदी झालेली नाही. साधारण धानाची ६ लाख १७ हजार ३६६ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १७,३४६ शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपयांप्रमाणे १२ कोटी ३४ लाख ७३ हजार २०० रुपयांची वाटप प्रक्रीया सुरु आहे. धान खरेदी व बोनस मिळून ९९ कोटी ३९ लाख ५९ हजार रुपयांच्या रक्कमेपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेमध्ये ९६ कोटी २३ लाख ८३ हजार १६७ रुपयांची हुंडी दाखल करण्यात आली. शेतकऱ्यांना धान व बोनसचा मोबदला म्हणून ९३ कोटी १० लाख ५६ हजार १९५ रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली़ ६ कोटी २३ लाख ३ हजार १५ रुपयांचे चुकारे अद्यापही अडले आहेत.धान खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. १७,३४६ शेतकऱ्यांना धान व बोनसचा मोबदला म्हणून ९३ कोटी १० लाख ५६ हजार १९५ रुपयांची रक्कम वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ६.२३ कोटी रुपयांच्या रक्कमेचे लवकरच वाटप होईल.- चंद्रकांत खाडे,जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.