शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

जिल्ह्यातील प्रकल्पांत 60 टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 6:00 AM

देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसाने प्रकल्पातील जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली ...

देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसाने प्रकल्पातील जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट जलसाठा आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सध्या 60.99 टक्के जलसाठा असून त्यात सर्वाधिक मध्यम प्रकल्पात 71.84 टक्के जलसाठय़ाचा समावेश आहे. मुबलक पाणी प्रकल्पांमध्ये असतानाही नियोजन मात्र शून्य दिसत आहे.भंडारा जिल्ह्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरना हे चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा संकल्पीत उपयुक्त साठा 42.815 दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात 30.761 दलघमी पाणी असून याची टक्केवारी 71.846 आहे. 31 लघु प्रकल्पांचा संकल्पीत उपयुक्त साठा 53.54 दलघमी असून सध्या या प्रकल्पात 28.858 दलघमी म्हणजे 53.898 टक्के जलसाठा आहे. 28 माजी मालगुजारी तलावांची संकल्पीत उपयुक्त जलसाठा क्षमता 25.380 दलघमी असून सध्या या प्रकल्पात 14.631 दलघमी म्हणजे 57.64 टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गत तीन वर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठा तिपटीने वाढल्याचे दिसत आहे. 2019 मध्ये जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये केवळ 21.21 टक्के जलसाठा होता तर 2018 मध्ये 24.50 टक्के जलसाठा नोंदविल्या गेला होता. दोन वर्षाच्या तुलनेत यंदा मुबलक पाणी प्रकल्पांमध्ये असले तरी नियोजन शून्यतेचा फटका बसू शकतो. सिंचनासाठी पाणी सोडण्याचे योग्य नियोजन जिल्ह्यात करण्यात आले नाही. त्यामुळे उन्हाळी पिकांना वेळेवर पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. यासाठी पाठबंधारे विभागाने वेळीच नियोजन करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे.प्रकल्प तुडूंब तरीही पाणीटंचाईजिल्ह्यातील सर्व प्रकल्प सद्यस्थितीत तुडूंब दिसत असले तरी प्रशासनाच्या लेखी जिल्ह्यातील 617 गावांमध्ये पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत 337 तर एप्रिल ते जून या कालावधीत 280 गावे पाणीटंचाईने प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून 12 लाख 90 हजार रुपयांचा हा कृती आराखडा आहे. प्रकल्पातील पाण्याचा योग्य वापर केला तर पाणीटंचाईवर मात होऊ शकते. मात्र या प्रकल्पाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. याचा अनुभव यंदाही येत आहे.