शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रकल्पांत 60 टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 06:00 IST

देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसाने प्रकल्पातील जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली ...

देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसाने प्रकल्पातील जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट जलसाठा आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सध्या 60.99 टक्के जलसाठा असून त्यात सर्वाधिक मध्यम प्रकल्पात 71.84 टक्के जलसाठय़ाचा समावेश आहे. मुबलक पाणी प्रकल्पांमध्ये असतानाही नियोजन मात्र शून्य दिसत आहे.भंडारा जिल्ह्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरना हे चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा संकल्पीत उपयुक्त साठा 42.815 दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात 30.761 दलघमी पाणी असून याची टक्केवारी 71.846 आहे. 31 लघु प्रकल्पांचा संकल्पीत उपयुक्त साठा 53.54 दलघमी असून सध्या या प्रकल्पात 28.858 दलघमी म्हणजे 53.898 टक्के जलसाठा आहे. 28 माजी मालगुजारी तलावांची संकल्पीत उपयुक्त जलसाठा क्षमता 25.380 दलघमी असून सध्या या प्रकल्पात 14.631 दलघमी म्हणजे 57.64 टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गत तीन वर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठा तिपटीने वाढल्याचे दिसत आहे. 2019 मध्ये जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये केवळ 21.21 टक्के जलसाठा होता तर 2018 मध्ये 24.50 टक्के जलसाठा नोंदविल्या गेला होता. दोन वर्षाच्या तुलनेत यंदा मुबलक पाणी प्रकल्पांमध्ये असले तरी नियोजन शून्यतेचा फटका बसू शकतो. सिंचनासाठी पाणी सोडण्याचे योग्य नियोजन जिल्ह्यात करण्यात आले नाही. त्यामुळे उन्हाळी पिकांना वेळेवर पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. यासाठी पाठबंधारे विभागाने वेळीच नियोजन करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे.प्रकल्प तुडूंब तरीही पाणीटंचाईजिल्ह्यातील सर्व प्रकल्प सद्यस्थितीत तुडूंब दिसत असले तरी प्रशासनाच्या लेखी जिल्ह्यातील 617 गावांमध्ये पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत 337 तर एप्रिल ते जून या कालावधीत 280 गावे पाणीटंचाईने प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून 12 लाख 90 हजार रुपयांचा हा कृती आराखडा आहे. प्रकल्पातील पाण्याचा योग्य वापर केला तर पाणीटंचाईवर मात होऊ शकते. मात्र या प्रकल्पाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. याचा अनुभव यंदाही येत आहे.