शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

६० टक्के रोवणी

By admin | Updated: August 7, 2014 23:46 IST

जिल्ह्यात पावसाच्या दमदार आगमनामुळे अजूनपावेतो ६० टक्के रोवणी झाली आहे. सर्व पिकांची एकुण रोवणीची टक्केवारी ६५ इतकी आहे. खरीप हंगामातील हा आकडा पिकाच्या उत्पादनाअंतर्गत अनुकूल नाही.

भंडारा : जिल्ह्यात पावसाच्या दमदार आगमनामुळे अजूनपावेतो ६० टक्के रोवणी झाली आहे. सर्व पिकांची एकुण रोवणीची टक्केवारी ६५ इतकी आहे. खरीप हंगामातील हा आकडा पिकाच्या उत्पादनाअंतर्गत अनुकूल नाही. पावसाचे सर निरंतर असल्यास रोवणीच्या कामाला वेग येईल.भंडारा जिल्ह्यात जवळपास दोन लाखापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रात धानासह अन्य पिकांची लागवड करण्याचे उदिष्ठ आहे. त्यापैकी भंडारा तालुक्यात २२हजार ८८८ हेक्टर, मोहाडी २८ हजार ८३०, तुमसर २८ हजार २४०, पवनी २९ हजार ३१३, साकोली २२ हजार ७०, लाखनी २० हजार ५३० तर लाखांदूर तालुक्यात २९ हजार ७२० हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्याचे उदिष्ठ आहे. जिल्ह्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी भंडारा तालुक्यात २७हजार ८८ हेक्टर, मोहाडी ३० हजार ४६६, तुमसर २९ हजार १७७, पवनी ३५ हजार ३७८, साकोली २२ हजार ९३०, लाखनी २१ हजार ६१० तर लाखांदूर तालुक्यात ३१ हजार ९९० हेक्टर क्षेत्रात सर्व पिकांची लागवड करण्याचे उदिष्ठ आहे. भंडारा जिल्ह्यात धानाची रोवणी ६० टक्क्याच्या आसपास आटोपली आहे. गत दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रोवणीचे मंदावले आहे. ज्यांच्याकडे पाण्याची किंवा सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे तिथे मात्र रोवणीचे काम जोमात सुरु आहे. कडधान्यामध्ये भूईमुग, तिळ, सोयाबीन व इतर गळीत धान्याची लागवड केली जात आहे. त्याचप्रकारे पाच हजार पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रामध्ये उसाची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन्ही कृषी उपविभागांतर्गत ९८ हजार ९६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची माहिती आहे. याची एकुण टक्केवारी ५४.२० इतकी आहे. पावसाच्या हजेरीवर धान पऱ्हे लागवडीची गती अवलंबून राहणार आहे. बळीराजाला पुन्हा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा उशिरा सुरू झालेल्या रोवणीमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. ज्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी पावसापूर्वी विहीरीच्या पाण्याने रोवणी केली, त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात भातपिकासोबतच तृणधान्यात तूर, मुंग, उडीद तर कडधान्यात भूईमुंग, खरीप तीळ,सोयाबीन, इतर गळीत धान्यासह हळद, अद्रक, मिरची व भाजीपाल्याचे पिक घेण्यात आले. मागील वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने याच तारखेपर्यंत झालेल्या रोवणीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी असल्याने रोवणीचे प्रमाण कमी झाले आहे. (शहर प्रतिनिधी)