शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५२ तलावांतून काढला ४५ हजार घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 22:39 IST

धरणातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राज्य शासनाने उन्हाळ्यात राबविले.

ठळक मुद्देलोकमत शुभ वर्तमान : जिल्ह्यातील ७३७ शेतकºयांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धरणातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राज्य शासनाने उन्हाळ्यात राबविले. या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५२ तलावातून ४५ हजार ३७ घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आले. या तलावातून काढलेला गाळ ६७० हेक्टर शिवारात टाकण्यात आला असून यावर्षी तलावाच्या जलसाठ्यात वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने मे महिन्यात ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. जलसाठयांची पुनरस्थापना करणे. जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत शाश्वत स्वरूपाची वाढ करणे आणि शेत जमिनीचा पोत सुधारून उत्पन्न वाढीसाठी मदत करणे या हेतूने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.राज्यातील २५० हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या ८२ हजार १५६ धरणांपैकी ३१ हजार ४५९ धरणांची साठवणूक क्षमता ४२.५४ लक्ष घनमीटर इतकी आहे. या धरणातील गाळ काढल्यास ही साठवणूक क्षमता मोठया प्रमाणात वाढणार आहे. हा दृष्टीकोन ठेऊन हे अभियान हाती घेण्यात आले.भंडारा जिल्ह्यात या अभियानात ५२ तलावांची निवड करण्यात आली होती. यात भंडारा तालुक्यात १२, पवनी तालुक्यात ७, तुमसर तालुक्यात ८, मोहाडी तालुक्यात ८, साकोली तालुक्यात ७, लाखनी तालुक्यात ७ आणि लाखांदूर तालुक्यात ८ तलावांचा समावेश करण्यात आला. या तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे ठरविण्यात आले. यासाठी कुठलाही निधी खर्च न करता संपूर्ण लोकसहभागातून ५२ तलावातून ४५ हजार ३७ घनमीटर गाळ काढण्यात आला. काढलेला गाळ ६७० हेक्टर मध्ये टाकण्यात आला.भंडारा तालुक्यात १७ हजार ८५५ घनमीटर, पवनी ६ हजार १ घनमीटर, तुमसर ४ हजार १५७ घनमीटर, मोहाडी २ हजार ३४४ घनमीटर, साकोली ७८३, लाखनी ५ हजार १६ घनमीटर व लाखांदूर ८ हजार ८८० घनमीटर गाळ काढला असून हा गाळ भंडारा तालुक्यातील २५० हेक्टर, पवनी ३९ हेक्टर, तुमसर ७९ हेक्टर, मोहाडी ४७ हेक्टर, साकोली २२ हेक्टर, लाखनी १२२ हेक्टर व लाखांदूर १०९ हेक्टर क्षेत्रावर हा गाळ टाकण्यात आला. या मोहीमेत जिल्ह्यातील ७३७ शेतकºयांनी सहभाग नोंदविला.गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार या योजनेत जिल्ह्यात झालेले काम लोकसहभागातून करण्यात आले असून यासाठी शासनाचा कुठलाही निधी खर्च झालेला नाही. यावर्षी कमी वेळ मिळाला असला तरी चांगले काम झाले आहे. पुढील वर्षाचे नियोजन आतापासून करण्यात येणार असून ज्या तलावांचा लाभ सिंचनासाठी जास्त होणार आहे. अशा तलावांची यादी तयार करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. त्याच तलावातील गाळ काढण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे सिंचनाला निश्चितच लाभ होईल.- सुहास दिवसे, जिल्हाधिकारी .