शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

५२ तलावांतून काढला ४५ हजार घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 22:39 IST

धरणातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राज्य शासनाने उन्हाळ्यात राबविले.

ठळक मुद्देलोकमत शुभ वर्तमान : जिल्ह्यातील ७३७ शेतकºयांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धरणातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राज्य शासनाने उन्हाळ्यात राबविले. या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५२ तलावातून ४५ हजार ३७ घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आले. या तलावातून काढलेला गाळ ६७० हेक्टर शिवारात टाकण्यात आला असून यावर्षी तलावाच्या जलसाठ्यात वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने मे महिन्यात ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. जलसाठयांची पुनरस्थापना करणे. जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत शाश्वत स्वरूपाची वाढ करणे आणि शेत जमिनीचा पोत सुधारून उत्पन्न वाढीसाठी मदत करणे या हेतूने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.राज्यातील २५० हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या ८२ हजार १५६ धरणांपैकी ३१ हजार ४५९ धरणांची साठवणूक क्षमता ४२.५४ लक्ष घनमीटर इतकी आहे. या धरणातील गाळ काढल्यास ही साठवणूक क्षमता मोठया प्रमाणात वाढणार आहे. हा दृष्टीकोन ठेऊन हे अभियान हाती घेण्यात आले.भंडारा जिल्ह्यात या अभियानात ५२ तलावांची निवड करण्यात आली होती. यात भंडारा तालुक्यात १२, पवनी तालुक्यात ७, तुमसर तालुक्यात ८, मोहाडी तालुक्यात ८, साकोली तालुक्यात ७, लाखनी तालुक्यात ७ आणि लाखांदूर तालुक्यात ८ तलावांचा समावेश करण्यात आला. या तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे ठरविण्यात आले. यासाठी कुठलाही निधी खर्च न करता संपूर्ण लोकसहभागातून ५२ तलावातून ४५ हजार ३७ घनमीटर गाळ काढण्यात आला. काढलेला गाळ ६७० हेक्टर मध्ये टाकण्यात आला.भंडारा तालुक्यात १७ हजार ८५५ घनमीटर, पवनी ६ हजार १ घनमीटर, तुमसर ४ हजार १५७ घनमीटर, मोहाडी २ हजार ३४४ घनमीटर, साकोली ७८३, लाखनी ५ हजार १६ घनमीटर व लाखांदूर ८ हजार ८८० घनमीटर गाळ काढला असून हा गाळ भंडारा तालुक्यातील २५० हेक्टर, पवनी ३९ हेक्टर, तुमसर ७९ हेक्टर, मोहाडी ४७ हेक्टर, साकोली २२ हेक्टर, लाखनी १२२ हेक्टर व लाखांदूर १०९ हेक्टर क्षेत्रावर हा गाळ टाकण्यात आला. या मोहीमेत जिल्ह्यातील ७३७ शेतकºयांनी सहभाग नोंदविला.गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार या योजनेत जिल्ह्यात झालेले काम लोकसहभागातून करण्यात आले असून यासाठी शासनाचा कुठलाही निधी खर्च झालेला नाही. यावर्षी कमी वेळ मिळाला असला तरी चांगले काम झाले आहे. पुढील वर्षाचे नियोजन आतापासून करण्यात येणार असून ज्या तलावांचा लाभ सिंचनासाठी जास्त होणार आहे. अशा तलावांची यादी तयार करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. त्याच तलावातील गाळ काढण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे सिंचनाला निश्चितच लाभ होईल.- सुहास दिवसे, जिल्हाधिकारी .