शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

By admin | Updated: March 22, 2016 00:45 IST

तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी येथील अनेक मामा तलावांमधून सिंचन होत नव्हते.

भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी येथील अनेक मामा तलावांमधून सिंचन होत नव्हते. या तलावांचे पुनरुज्जीवन करून त्यांना सिंचनक्षम करण्यासाठी पहिल्यांदाच कालबद्ध नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून २०१६-१७ मध्ये या तलावांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी २१ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात १३३० मिलीमीटर पाऊस पडतो. जिल्ह्यातील भूस्तर रुपांतरीत प्रकारचा असल्यामुळे येथे कितीही पाऊस पडला तरी जमिनीत पाणी पडण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे शाश्वत सिंचनाकरिता पावसाचे पाणी तलावांवर साठवून ठेवणे आवश्यक ठरते. जिल्ह्यात धानाचे प्रमुख पीक आहे. मात्र पावसाने दडी मारली की पिकांवर परिणाम होऊन उत्पादनात घट येते. ही बाब लक्षातयेऊन गोंड राजाच्या कालखंडात मामा तलावांची निर्मिती झाली. नंतर हे तलाव ब्रिटीशांनी मालगुजार लोकांना हस्तांतरीत केले. सध्या जिल्ह्यात १४६२ मामा तलाव असून त्यांची सिंचन क्षमता ५८९९.५८ हेक्टर आहे. मागील अनेक वर्षापासून तलावाचे पुनरुज्जीवन न झाल्याने सिंचनक्षमतेत मोठी घट झाली आहे. या तलावांचे नूतनीकरण केल्यास सिंचनक्षमता वाढून पिक उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते हे लक्षात घेवून यावर्षी मामा तलाव दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २७८ तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी ५०.५१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व मामा तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. मामा तलावांची पाणी साठवण क्षमता वाढल्या त्यामध्ये मत्स्य व्यवसाय, शिंगाडा यासह जोडधंद्यासह मदत होईल. ३० हेक्टर सिंचन क्षेत्र असलेल्या २३१ तलावांचे व १०० हेक्टर सिंचन क्षेत्र असलेल्या ४७ तलावांची दुरुस्ती पहिल्या टप्प्यात होणार आहे. (नगर प्रतिनिधी)