शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

मामा तलावासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

By admin | Updated: March 22, 2016 00:45 IST

तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी येथील अनेक मामा तलावांमधून सिंचन होत नव्हते.

भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी येथील अनेक मामा तलावांमधून सिंचन होत नव्हते. या तलावांचे पुनरुज्जीवन करून त्यांना सिंचनक्षम करण्यासाठी पहिल्यांदाच कालबद्ध नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून २०१६-१७ मध्ये या तलावांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी २१ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात १३३० मिलीमीटर पाऊस पडतो. जिल्ह्यातील भूस्तर रुपांतरीत प्रकारचा असल्यामुळे येथे कितीही पाऊस पडला तरी जमिनीत पाणी पडण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे शाश्वत सिंचनाकरिता पावसाचे पाणी तलावांवर साठवून ठेवणे आवश्यक ठरते. जिल्ह्यात धानाचे प्रमुख पीक आहे. मात्र पावसाने दडी मारली की पिकांवर परिणाम होऊन उत्पादनात घट येते. ही बाब लक्षातयेऊन गोंड राजाच्या कालखंडात मामा तलावांची निर्मिती झाली. नंतर हे तलाव ब्रिटीशांनी मालगुजार लोकांना हस्तांतरीत केले. सध्या जिल्ह्यात १४६२ मामा तलाव असून त्यांची सिंचन क्षमता ५८९९.५८ हेक्टर आहे. मागील अनेक वर्षापासून तलावाचे पुनरुज्जीवन न झाल्याने सिंचनक्षमतेत मोठी घट झाली आहे. या तलावांचे नूतनीकरण केल्यास सिंचनक्षमता वाढून पिक उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते हे लक्षात घेवून यावर्षी मामा तलाव दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २७८ तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी ५०.५१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व मामा तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. मामा तलावांची पाणी साठवण क्षमता वाढल्या त्यामध्ये मत्स्य व्यवसाय, शिंगाडा यासह जोडधंद्यासह मदत होईल. ३० हेक्टर सिंचन क्षेत्र असलेल्या २३१ तलावांचे व १०० हेक्टर सिंचन क्षेत्र असलेल्या ४७ तलावांची दुरुस्ती पहिल्या टप्प्यात होणार आहे. (नगर प्रतिनिधी)