शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

चार गावांतील फेरफारची ५० प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2017 00:24 IST

वाहनी तलाठी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चार गावातील ५० फेरफारची प्रकरणे मागील एक वर्षापासून प्रलंबित पडून आहेत.

कुलूप ठोकण्याचा इशारा : वाहनी तलाठी कार्यालयाचा कारभारलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वाहनी तलाठी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चार गावातील ५० फेरफारची प्रकरणे मागील एक वर्षापासून प्रलंबित पडून आहेत. स्थानिक परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून त्यांच्यात प्रचंड असंतोष व्याप्त आहे. संबंधित समस्या तात्काळ निकाली न काढल्यास पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.वाहनी येथे तलाठी कार्यालय असून त्या अंतर्गत वाहनी, परसवाडा, पिपरी चुन्नी, मांडवी या गावातील शेतकऱ्यांची फेरफारची ५० प्रकरणे मागील एक वर्षापासून प्रलंबित आहेत. एक वर्षापासून येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. आल्यापावली शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शासनाने वाहनी येथे तलाठी कार्यालय सुरू केले. त्याचा उपयोग काय असा प्रश्न येथे शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.नियमानुसार फेरफारची नोंदणी घेण्यात समस्या कोणती. केवळ शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार येथे मागील एक वर्षापासून सुरू असल्याचा आरोप तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी केला असून येत्या आठ दिवसात प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्यास तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा तक्रारीतून दिला आहे. प्रलंबित प्रकरणे निकाली न काढणाऱ्या तलाठ्याला मंडळ अधिकाऱ्यांनी येथे जाब विचारण्याची गरज आहे.