शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

४७ शाळांना खेळाच्या मैदानांची ‘एलर्जी’

By admin | Updated: April 15, 2015 00:39 IST

शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच त्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने अनेक भौतिक ..

प्रशांत देसाई भंडाराशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच त्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने अनेक भौतिक सुविधा पुरविल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३५ जिल्हा परिषद शाळांसह ४७ शाळांमध्ये खेळाचे मैदानच उपलब्ध नाही. यासह अनेक शाळांना संरक्षक भिंत, शौचालय, यासह भौतिक सुविधांही उपलब्ध नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.जिल्ह्यात १,३३१ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यात जिल्हा परिषद व खासगी शाळांचा समावेश आहे. यातील जिल्हा परिषदच्या ७९९ तर ५३२ खासगी ज्यात अनुदानित व विना अनुदानित शाळांचा समावेश आहे. यातील ४७ शाळांना खेळाचे मैदान नाही. यात जिल्हा परिषदच्या ३५ शाळांचा तर माध्यमिकच्या १२ शाळांचा समावेश आहे. या शाळांना खेळाचे मैदान नसणे म्हणजे येथे विद्यार्थ्यांमधून चांगले खेळाडू निर्माण होण्याची आशा धुसर आहे. प्राथमिक शिक्षणासोबतच विद्याथ्याच्या शारीरिक विकास होण्यासाठी शासनाकडून क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन दिले जाते. परंतु खेळाचे मैदान नसलेल्या शाळातून चांगले खेळाडू कसे निर्माण होतील. जिल्हा परिषदच्या सेस फंडात क्रीडा स्पर्धांसाठी आर्थिक तरतूद करण्यात येते. मात्र, हा निधी तुटपूंजा पडत असल्याने यातून कोणत्या स्पर्धा आयोजित करणार, असा प्रश्न जिल्हा परिषद शिक्षकांना नेहमी पडतो. जिल्ह्यातील १३३ शाळांना संरक्षक भिंत नाही. स्वतंत्र वर्ग खोल्या नसलेल्या वर्गांची संख्या ४९६ आहे. त्यामुळे एकाच खोलीत दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना बसावे लागते. याचा शिक्षणावर परिणाम होतो. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालय नसलेल्या शाळांची संख्या १७ आहे. ज्यात ११ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शौचालय तर सहा शाळांमध्ये मुलींचे शौचालय नाही. त्यामुळे विद्यार्थिनींची कुचंबणा होते. जिल्ह्यातील ५७ शाळांना किचनशेड नाही. फायबरचे किचनशेड उभारण्याची योजना हाती घेण्यात आली होती. तरीही काही शाळांमध्ये किचनशेड तयार झाले नसल्याने मध्यान्ह भोजन शाळेतील वर्ग खोलीतील एका कोपऱ्यात बनविले जात आहे. अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी शिक्षण विभागाने शाळांमध्ये रॅम्प बांधण्याची सक्ती केली आहे. तरीही ४० शाळांमध्ये रॅम्पची सुविधा नसल्याने अपंग विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. जिल्ह्यातील १० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना घरून किंवा शाळा परिसरातील विहिरींवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. तर १२६ शाळेतील मुख्यध्यापकांना स्वतंत्र कक्षासाठी खोली नाहीत. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याचे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. शिक्षणासोबतच ग्रामीण भागातून चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत प्रोत्साहन दिले जाते. परंतु जिल्ह्यातील ४७ शाळांना खेळाचे मैदान नसल्याने ग्रामीण भागात चांगले खेळाडू कसे निर्माण होतील, असा प्रश्न उभा ठाकला आहे. पटसंख्येसाठी शिक्षकांची पायपीटवार्षिक परीक्षा संपली की ग्रामीण भागातील शिक्षकांना शाळेची पटसंख्या कायम राहावी यासाठी पायपीट करावी लागते. पटसंख्या अशीच कमी होत राहिली तर पुढील काही वर्षात जिल्हा परिषद शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांना पटसंख्या वाढविण्यासाठी पायपीट करावी लागते.