शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
4
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
5
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
6
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
7
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
8
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
9
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
10
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
11
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
12
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
13
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
14
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
17
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
18
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
19
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
20
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल

४६५ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:17 IST

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना प्रगतशील करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे दिसत नाही.

डिमांड भरुनही वीज जोडणी नाही : कृषिपंप जोडणीची घोषणा फसवी असल्याचा आरोपराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना प्रगतशील करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे दिसत नाही. मोहाडी तालुक्यात अनेक शेतकरी कृषी पंपाच्या वीज जोडणी प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे.राज्यशासनाने शेतीसाठी वीज उपलब्ध करून देऊ, शेतकऱ्याला समृध्द, सधन व प्रगतशील करण्यासाठी कटीबध्द आहे, असे सांगितले जाते. परंतु शेतीसाठी मागेल त्याला वीज हे आश्वासन फसवी असल्याचे दिसून आले आहे. मोहाडी तालुक्यात १५ जून २०१६ म्हणजे एक वर्षापासून ४६५ कृषीपंपाच्या वीज कनेक्शनची वाट शेतकरी बघत आहेत. दररोज कृषी पंपाच्या जोडणीसाठी अर्ज येत असतात. त्यामुळे हा आकडा दररोज वाढत आहे. भंडारा जिल्ह्याचा हा आकडा २६०० च्यावर पोहोचला आहे. धडक सिंचन विहिरी, मनरेगातून तयार होणाऱ्या विहीरींमध्ये पाणी जमा झाले. परंतु ते पाणी शेतीसाठी ओढायचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. डोळ्यादेखत धानाचे पऱ्हे कोमेजले आहे. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. परंतु आडात असूनही धान पऱ्ह्यांना शेतीसाठी पाणी सिंचीत करता येत नसल्याचे शेतकऱ्यांना शल्य आहे. वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांच्या पैसा एक वर्ष शासनाच्या तिजोरीत पडूनही वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे हेच काय अच्छे दिन असे म्हणण्याची पाळी आली आहे.एका पाण्यासाठी पीक गेल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी अनेकवेळा घेतला आहे. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला कृषीपंपाचे कनेक्शन अशी घोषणा हवेत विरली आहे. शासन शाश्वत कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळवून देण्यासाठी अपयशी ठरला आहे.याबाबत अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता, कृषीपंपाचे वीज जोडणी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यासाठी निधी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. निधी नसल्यामुळे एक वर्षापासून वीज जोडणीची कामे ठप्प आहेत. वीज जोडणीच्या कामासाठी भंडारा जिल्ह्यासाठी पाच कोटी रूपयाची आवश्यकता असल्याची माहिती आहे. निधी नसल्याने निविदा निघाल्या नाहीत. त्यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडणीची कामे रखडली आहे. अन्य जिल्ह्यात कृषीपंपाच्या वीज जोडणीची कामे सुरू असताना भंडारा जिल्ह्यासाठी निधी नसणे, हे आश्चर्य आहे. एक वर्षापाूसन शेतकरी कृषी पंपाचे वीज कनेक्शन मिळावे यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात पायपीट करून थकले आहेत. परंतु या गंभीर विषयाची दखल कुणीही घेतलेली नाही. सरकारात असणारे, नसणारे दोनही पक्षातील नेते म्हणतात, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. पण, सगळ्याच शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन या संवेदनशिल विषयाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. शासनाचे धोरण शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला जात आहे. शेतकऱ्यांनी वीज, पाण्याशिवाय शेती कशी करावी?-राजेश लेंडे, सरपंच ग्रामपंचायत मोहगाव देवीआधी विहिरीच्या कामासाठी आता वीज जोडणीसाठी चकरा किती पायपीट करायची. पऱ्हे व रोवणी कशी करायची असा प्रश्न आहे.- रामप्रसाद वहिले, शेतकरी, कान्हळगाव/सिरसोलीवीज कनेक्शनबाबत कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही. कंत्राटदाराकडून वीज जोडणीची कामे करता येत नाही.- मंगेश कहाळे, उपविभागीय अभियंता, मोहाडी.