शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

४६५ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:17 IST

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना प्रगतशील करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे दिसत नाही.

डिमांड भरुनही वीज जोडणी नाही : कृषिपंप जोडणीची घोषणा फसवी असल्याचा आरोपराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना प्रगतशील करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे दिसत नाही. मोहाडी तालुक्यात अनेक शेतकरी कृषी पंपाच्या वीज जोडणी प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे.राज्यशासनाने शेतीसाठी वीज उपलब्ध करून देऊ, शेतकऱ्याला समृध्द, सधन व प्रगतशील करण्यासाठी कटीबध्द आहे, असे सांगितले जाते. परंतु शेतीसाठी मागेल त्याला वीज हे आश्वासन फसवी असल्याचे दिसून आले आहे. मोहाडी तालुक्यात १५ जून २०१६ म्हणजे एक वर्षापासून ४६५ कृषीपंपाच्या वीज कनेक्शनची वाट शेतकरी बघत आहेत. दररोज कृषी पंपाच्या जोडणीसाठी अर्ज येत असतात. त्यामुळे हा आकडा दररोज वाढत आहे. भंडारा जिल्ह्याचा हा आकडा २६०० च्यावर पोहोचला आहे. धडक सिंचन विहिरी, मनरेगातून तयार होणाऱ्या विहीरींमध्ये पाणी जमा झाले. परंतु ते पाणी शेतीसाठी ओढायचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. डोळ्यादेखत धानाचे पऱ्हे कोमेजले आहे. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. परंतु आडात असूनही धान पऱ्ह्यांना शेतीसाठी पाणी सिंचीत करता येत नसल्याचे शेतकऱ्यांना शल्य आहे. वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांच्या पैसा एक वर्ष शासनाच्या तिजोरीत पडूनही वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे हेच काय अच्छे दिन असे म्हणण्याची पाळी आली आहे.एका पाण्यासाठी पीक गेल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी अनेकवेळा घेतला आहे. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला कृषीपंपाचे कनेक्शन अशी घोषणा हवेत विरली आहे. शासन शाश्वत कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळवून देण्यासाठी अपयशी ठरला आहे.याबाबत अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता, कृषीपंपाचे वीज जोडणी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यासाठी निधी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. निधी नसल्यामुळे एक वर्षापासून वीज जोडणीची कामे ठप्प आहेत. वीज जोडणीच्या कामासाठी भंडारा जिल्ह्यासाठी पाच कोटी रूपयाची आवश्यकता असल्याची माहिती आहे. निधी नसल्याने निविदा निघाल्या नाहीत. त्यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडणीची कामे रखडली आहे. अन्य जिल्ह्यात कृषीपंपाच्या वीज जोडणीची कामे सुरू असताना भंडारा जिल्ह्यासाठी निधी नसणे, हे आश्चर्य आहे. एक वर्षापाूसन शेतकरी कृषी पंपाचे वीज कनेक्शन मिळावे यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात पायपीट करून थकले आहेत. परंतु या गंभीर विषयाची दखल कुणीही घेतलेली नाही. सरकारात असणारे, नसणारे दोनही पक्षातील नेते म्हणतात, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. पण, सगळ्याच शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन या संवेदनशिल विषयाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. शासनाचे धोरण शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला जात आहे. शेतकऱ्यांनी वीज, पाण्याशिवाय शेती कशी करावी?-राजेश लेंडे, सरपंच ग्रामपंचायत मोहगाव देवीआधी विहिरीच्या कामासाठी आता वीज जोडणीसाठी चकरा किती पायपीट करायची. पऱ्हे व रोवणी कशी करायची असा प्रश्न आहे.- रामप्रसाद वहिले, शेतकरी, कान्हळगाव/सिरसोलीवीज कनेक्शनबाबत कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही. कंत्राटदाराकडून वीज जोडणीची कामे करता येत नाही.- मंगेश कहाळे, उपविभागीय अभियंता, मोहाडी.