शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

पूर व अतिवृष्टीत जलसंधारण विभागाचे 43 बंधारे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 21:54 IST

जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने सिंचनाची सोय वाढावी यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेतून नाल्यांवर सिमेंट प्लग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधारे, मामा तलावांचा समावेश आहे. यामुळे एका पाण्याचा दुष्काळ संपला. तसेच भूगर्भातील जलसाठा वाढला. सिंचनाच्या जाळ्यांमुळे शेतीच्या उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याला ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जलसंधारण विभागाचे ४३ बंधारे उद्ध्वस्त झाले असून, त्यात मामा तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे व साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. सुमारे चार कोटी ९० लाख ५० हजारांचे नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील सिंचन अडचणीत सापडले आहे. जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने सिंचनाची सोय वाढावी यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेतून नाल्यांवर सिमेंट प्लग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधारे, मामा तलावांचा समावेश आहे. यामुळे एका पाण्याचा दुष्काळ संपला. तसेच भूगर्भातील जलसाठा वाढला. सिंचनाच्या जाळ्यांमुळे शेतीच्या उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली. मात्र, मात्र अनेक वर्षांपासून देखभाल-दुरुस्ती करण्यात आली नाही. दरवर्षी पूर व अतिवृष्टीचा फटका बसतो आहे. यंदा तीनदा पूर व अतिवृष्टीची झळ बंधाऱ्यांना बसली. यामुळे नाल्यांवर बांधलेल्या बंधाऱ्याचे व तलावांचे मोठे नुकसान झाले. जलसंधारण विभागाच्या सर्वेक्षणात ४३ सिमेंट पल्ग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे.मामा तलावांना अतिक्रमणाचा विळखाजिल्ह्यातील जुने मालगुजारी (मामा) तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. यामुळे सिंचन क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. तलावांच्या जागेवर अनेकांनी शेती केल्याने तसेच सिंचन क्षमतेवर परिणाम होण्यासोबत जलसाठ्यातही मोठी घट झाली आहे. अनेकांनी घरांचे बांधकाम तलाव क्षेत्रात केले आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे मासेमारी व्यवसाय संकटात सापडले असून अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.

गावनिहाय नुकसानग्रस्त बंधारे व तलाव- जांभोरा, झबाडा, हरदोली, नेरी, विहीरगाव, सिंदपुरी, देव्हाडी, धुटेरा, पिटेसूर बोडी, गर्रा, तुडकापुरी, आतेगाव, उकारा, नेरला, निष्टी, सोनेगाव, वाही, कान्हळगाव येथील मामा तलावांचा समावेश आहे. महालगाव, मलिंदा, कान्हळगाव, चिचोली, आंधळगाव, पिंपळगाव, सीतेपार, विहीरगाव, लोभी, साकोली, खापरी रेहपाडे येथील साठवण बंधारे, करडी, आंधळगाव, सानगडी, सोनेगाव येथील कोल्हापुरी बंधारे, निलागोंदी, गोंडीशिवनाला येथील लघू पाटबंधारे तलाव तर भावड येथील सिमेंट प्लग बंधाऱ्याचा समावेश आहे.

नुकसानीचा शासनाला अहवाल- पूर व अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे चार कोटी ९० लाख ५० हजारांचे नुकसान झाले. निधीच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे. शासनाकडून काय मदत मिळते, केव्हा बंधाऱ्यांची दुरुस्ती होते, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

नुकसानग्रस्त बंधाऱ्यांच्या  दुरुस्तीसाठी शासनाला प्रस्ताव पाठविला. निधीअभावी अडचणी वाढल्या आहेत. निधीची पूर्तता होताच नियोजनानुसार तलाव बंधारे यांच्या सुधारणा व दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ केला जाईल.- सुभाष कापगते, जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.

 

टॅग्स :floodपूर