शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पूर व अतिवृष्टीत जलसंधारण विभागाचे 43 बंधारे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 21:54 IST

जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने सिंचनाची सोय वाढावी यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेतून नाल्यांवर सिमेंट प्लग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधारे, मामा तलावांचा समावेश आहे. यामुळे एका पाण्याचा दुष्काळ संपला. तसेच भूगर्भातील जलसाठा वाढला. सिंचनाच्या जाळ्यांमुळे शेतीच्या उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याला ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जलसंधारण विभागाचे ४३ बंधारे उद्ध्वस्त झाले असून, त्यात मामा तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे व साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. सुमारे चार कोटी ९० लाख ५० हजारांचे नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील सिंचन अडचणीत सापडले आहे. जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने सिंचनाची सोय वाढावी यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेतून नाल्यांवर सिमेंट प्लग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधारे, मामा तलावांचा समावेश आहे. यामुळे एका पाण्याचा दुष्काळ संपला. तसेच भूगर्भातील जलसाठा वाढला. सिंचनाच्या जाळ्यांमुळे शेतीच्या उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली. मात्र, मात्र अनेक वर्षांपासून देखभाल-दुरुस्ती करण्यात आली नाही. दरवर्षी पूर व अतिवृष्टीचा फटका बसतो आहे. यंदा तीनदा पूर व अतिवृष्टीची झळ बंधाऱ्यांना बसली. यामुळे नाल्यांवर बांधलेल्या बंधाऱ्याचे व तलावांचे मोठे नुकसान झाले. जलसंधारण विभागाच्या सर्वेक्षणात ४३ सिमेंट पल्ग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे.मामा तलावांना अतिक्रमणाचा विळखाजिल्ह्यातील जुने मालगुजारी (मामा) तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. यामुळे सिंचन क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. तलावांच्या जागेवर अनेकांनी शेती केल्याने तसेच सिंचन क्षमतेवर परिणाम होण्यासोबत जलसाठ्यातही मोठी घट झाली आहे. अनेकांनी घरांचे बांधकाम तलाव क्षेत्रात केले आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे मासेमारी व्यवसाय संकटात सापडले असून अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.

गावनिहाय नुकसानग्रस्त बंधारे व तलाव- जांभोरा, झबाडा, हरदोली, नेरी, विहीरगाव, सिंदपुरी, देव्हाडी, धुटेरा, पिटेसूर बोडी, गर्रा, तुडकापुरी, आतेगाव, उकारा, नेरला, निष्टी, सोनेगाव, वाही, कान्हळगाव येथील मामा तलावांचा समावेश आहे. महालगाव, मलिंदा, कान्हळगाव, चिचोली, आंधळगाव, पिंपळगाव, सीतेपार, विहीरगाव, लोभी, साकोली, खापरी रेहपाडे येथील साठवण बंधारे, करडी, आंधळगाव, सानगडी, सोनेगाव येथील कोल्हापुरी बंधारे, निलागोंदी, गोंडीशिवनाला येथील लघू पाटबंधारे तलाव तर भावड येथील सिमेंट प्लग बंधाऱ्याचा समावेश आहे.

नुकसानीचा शासनाला अहवाल- पूर व अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे चार कोटी ९० लाख ५० हजारांचे नुकसान झाले. निधीच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे. शासनाकडून काय मदत मिळते, केव्हा बंधाऱ्यांची दुरुस्ती होते, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

नुकसानग्रस्त बंधाऱ्यांच्या  दुरुस्तीसाठी शासनाला प्रस्ताव पाठविला. निधीअभावी अडचणी वाढल्या आहेत. निधीची पूर्तता होताच नियोजनानुसार तलाव बंधारे यांच्या सुधारणा व दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ केला जाईल.- सुभाष कापगते, जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.

 

टॅग्स :floodपूर