शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

पालिका हद्दीत ४१६ बालके कुपोषित

By admin | Updated: July 1, 2017 00:20 IST

बाल मृत्यूदर कमी करणे आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी सन २००५ पासून राज्यात राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषणमिशन कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

वर्षभरातील आकडेवारी : १५ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बाल मृत्यूदर कमी करणे आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी सन २००५ पासून राज्यात राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषणमिशन कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी लक्षावधींचा खर्च करण्यात आला असला तरी एक वर्षभरात कुपोषणामुळे १५ बालकांचा मृत्यू झाला आहे. भंडारा, पवनी, तुमसर या नगरपालीका हद्दीतील ही आकडेवारी आहे. जिल्ह्यातील भंडारा, पवनी व तुमसर या तीन्ही नगरपालिका क्षेत्रात शंभरपेक्षा जास्त आंगणवाड्या आहेत. मागील वर्षभरात बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी कार्यालयांतर्गत भंडारा व पवनी येथे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाअंती ० ते ६ वयोगटातील जवळपास ८ हजार २६७ बालकांची तपासणी करण्यात आली. यातील ४१६ बालके कुपोषीत असल्याचे निदर्शनास आले. यापैकी १५ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जून २०१६ ते मे २०१७ या कालावधीत भंडारा, पवनी आणि तुमसर या नागरी क्षेत्रांतर्गत ० ते ६ वयोगटातील ८ हजार २६७ बालकांपैकी ३९३ बालके मध्यम तिव्र स्वरुपात कुपोषीत असल्याचे तर २३ बालके अति कुपोषित श्रेणीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ६ हजार ६४२ साधारण कुपोषण श्रेणीत असल्याचे दिसून आले. विभागानुसार घोषित करण्यात आलेल्या आकडेवारीत ० ते १ या वयोगटातील १५ बालके कुपोषणामुळे दगावली आहे. सर्वेक्षणात ० ते ६ महिने वयोगटातील ७४३ बालके, सहा महिने ते एक वर्ष वयोगटातील ८६५, एक वर्ष ते ३ वर्ष वयोगटातील २ हजार ९३८ तर तीन वर्ष ते पाच वर्ष वयोगटातील २ हजार ७३१ बालके कुपोषीत असल्याचे घोषीत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर प्रभावी कार्य सुरु आहे. बालकांचा कुपोषणावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे.- सुरेश ठाकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) भंडारा.