शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

पालिका हद्दीत ४१६ बालके कुपोषित

By admin | Updated: July 1, 2017 00:20 IST

बाल मृत्यूदर कमी करणे आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी सन २००५ पासून राज्यात राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषणमिशन कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

वर्षभरातील आकडेवारी : १५ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बाल मृत्यूदर कमी करणे आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी सन २००५ पासून राज्यात राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषणमिशन कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी लक्षावधींचा खर्च करण्यात आला असला तरी एक वर्षभरात कुपोषणामुळे १५ बालकांचा मृत्यू झाला आहे. भंडारा, पवनी, तुमसर या नगरपालीका हद्दीतील ही आकडेवारी आहे. जिल्ह्यातील भंडारा, पवनी व तुमसर या तीन्ही नगरपालिका क्षेत्रात शंभरपेक्षा जास्त आंगणवाड्या आहेत. मागील वर्षभरात बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी कार्यालयांतर्गत भंडारा व पवनी येथे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाअंती ० ते ६ वयोगटातील जवळपास ८ हजार २६७ बालकांची तपासणी करण्यात आली. यातील ४१६ बालके कुपोषीत असल्याचे निदर्शनास आले. यापैकी १५ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जून २०१६ ते मे २०१७ या कालावधीत भंडारा, पवनी आणि तुमसर या नागरी क्षेत्रांतर्गत ० ते ६ वयोगटातील ८ हजार २६७ बालकांपैकी ३९३ बालके मध्यम तिव्र स्वरुपात कुपोषीत असल्याचे तर २३ बालके अति कुपोषित श्रेणीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ६ हजार ६४२ साधारण कुपोषण श्रेणीत असल्याचे दिसून आले. विभागानुसार घोषित करण्यात आलेल्या आकडेवारीत ० ते १ या वयोगटातील १५ बालके कुपोषणामुळे दगावली आहे. सर्वेक्षणात ० ते ६ महिने वयोगटातील ७४३ बालके, सहा महिने ते एक वर्ष वयोगटातील ८६५, एक वर्ष ते ३ वर्ष वयोगटातील २ हजार ९३८ तर तीन वर्ष ते पाच वर्ष वयोगटातील २ हजार ७३१ बालके कुपोषीत असल्याचे घोषीत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर प्रभावी कार्य सुरु आहे. बालकांचा कुपोषणावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे.- सुरेश ठाकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) भंडारा.