शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्ह्यातील ग्रामीण भागातही एसटीच्या ४०४ बसफेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST

सध्या एसटी ८४,७४५ कि.मी. धावत आहे, तर यामध्ये शहरी भागात ५८,२५९ कि.मी. तर ग्रामीणमध्ये २६४८६ कि.मी. एसटी धावते आहे. ...

सध्या एसटी ८४,७४५ कि.मी. धावत आहे, तर यामध्ये शहरी भागात ५८,२५९ कि.मी. तर ग्रामीणमध्ये २६४८६ कि.मी. एसटी धावते आहे. तरीही काही बसफेऱ्यांवर मात्र निवडक एक-दोनच प्रवासी राहत असल्याने, या मार्गावरील बसेस मात्र नाईलाजास्तव बंद करण्यात आल्या आहेत. या बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत असली तरी, बसफेऱ्यांचा खर्चही निघत नाही. जून महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने एसटी महामंडळाच्या बसेस पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. आता कोरोनानंतर ७५६ बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील सहाही आगारातून दररोज अनेक बसेस शहरी भागासह ग्रामीणमध्ये धावत आहेत. मात्र अजूनही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही गावांतील नागरिकांना आजही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे. यासाठी एसटी महामंडळाने पूर्वीप्रमाणे बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

काही गावांना घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधार

भंडारा जिल्ह्यात अनेक मार्गावर एसटी बसेस धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र जिल्ह्यातील काही भागात मात्र अजूनही एसटी बस पोहोचत नसल्याने त्या गावातील प्रवाशांना खासगी टमटम, ऑटो रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. भंडारा आगारात ७७ बसेस असून यातील अनेक बसेस ग्रामीणमध्येच फिरतात. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक बसेस धावत आहेत.

कोट

बसेस सुरू झाल्याने आला जिवात जीव ...

कोट

मागील काही दिवस कोरोना वाढल्याने एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे शहर तालुका स्तरावर काही प्रमाणात ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. तरीही नागपूरसाठी रात्रीच्या बसेस सुरू कराव्यात, अशी आमची मागणी आहे.

- श्याम आकरे, प्रवासी

कोट

शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी, एसटी बसेस आहेत. परंतु ग्रामीण भागातील एसटी बससेवा खूप गरजेची आहे. एसटीचा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य शेतमजुरांना खूप मोठा आधार मिळतो. अनेकदा खासगी वाहनातून प्रवास करणे सर्वसामान्यांना परवडणारे नसते.

- संदीप मेश्राम, प्रवासी

कोट

भंडारा आगारात ७७ एसटी बसेस आहेत. विशेष म्हणजे यातील ६० टक्के बसेस ग्रामीण भागातच धावत आहेत. खेडेगावातीलही सध्या अनेक बसेस सुरू आहेत. काही गावांत मुक्कामी बस आहेत. अगदीच दोन प्रवासी असतील, तर ते एसटीलाही परवडणारे नाही. ज्या मार्गावर गरज असेल तेथे प्रवाशांच्या मागणीनुसार त्या मार्गावर बसेस लवकर सुरू करता येतील.

- फाल्गुन राखडे, भंडारा आगारप्रमुख