शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

जिल्ह्यातील ग्रामीण भागातही एसटीच्या ४०४ बसफेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST

सध्या एसटी ८४,७४५ कि.मी. धावत आहे, तर यामध्ये शहरी भागात ५८,२५९ कि.मी. तर ग्रामीणमध्ये २६४८६ कि.मी. एसटी धावते आहे. ...

सध्या एसटी ८४,७४५ कि.मी. धावत आहे, तर यामध्ये शहरी भागात ५८,२५९ कि.मी. तर ग्रामीणमध्ये २६४८६ कि.मी. एसटी धावते आहे. तरीही काही बसफेऱ्यांवर मात्र निवडक एक-दोनच प्रवासी राहत असल्याने, या मार्गावरील बसेस मात्र नाईलाजास्तव बंद करण्यात आल्या आहेत. या बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत असली तरी, बसफेऱ्यांचा खर्चही निघत नाही. जून महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने एसटी महामंडळाच्या बसेस पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. आता कोरोनानंतर ७५६ बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील सहाही आगारातून दररोज अनेक बसेस शहरी भागासह ग्रामीणमध्ये धावत आहेत. मात्र अजूनही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही गावांतील नागरिकांना आजही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे. यासाठी एसटी महामंडळाने पूर्वीप्रमाणे बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

काही गावांना घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधार

भंडारा जिल्ह्यात अनेक मार्गावर एसटी बसेस धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र जिल्ह्यातील काही भागात मात्र अजूनही एसटी बस पोहोचत नसल्याने त्या गावातील प्रवाशांना खासगी टमटम, ऑटो रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. भंडारा आगारात ७७ बसेस असून यातील अनेक बसेस ग्रामीणमध्येच फिरतात. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक बसेस धावत आहेत.

कोट

बसेस सुरू झाल्याने आला जिवात जीव ...

कोट

मागील काही दिवस कोरोना वाढल्याने एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे शहर तालुका स्तरावर काही प्रमाणात ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. तरीही नागपूरसाठी रात्रीच्या बसेस सुरू कराव्यात, अशी आमची मागणी आहे.

- श्याम आकरे, प्रवासी

कोट

शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी, एसटी बसेस आहेत. परंतु ग्रामीण भागातील एसटी बससेवा खूप गरजेची आहे. एसटीचा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य शेतमजुरांना खूप मोठा आधार मिळतो. अनेकदा खासगी वाहनातून प्रवास करणे सर्वसामान्यांना परवडणारे नसते.

- संदीप मेश्राम, प्रवासी

कोट

भंडारा आगारात ७७ एसटी बसेस आहेत. विशेष म्हणजे यातील ६० टक्के बसेस ग्रामीण भागातच धावत आहेत. खेडेगावातीलही सध्या अनेक बसेस सुरू आहेत. काही गावांत मुक्कामी बस आहेत. अगदीच दोन प्रवासी असतील, तर ते एसटीलाही परवडणारे नाही. ज्या मार्गावर गरज असेल तेथे प्रवाशांच्या मागणीनुसार त्या मार्गावर बसेस लवकर सुरू करता येतील.

- फाल्गुन राखडे, भंडारा आगारप्रमुख