शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

४० गावांचे शेतीरस्ते पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:50 IST

गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देशेतकरी व नागरिक त्रस्त : गोसेची पाणी पातळी वाढविल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही.पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावांचा पुनर्वसनांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी निर्धारित क्षमतेपर्यंत वाढविण्याची सुचना आहे. परंतु यावर्षी प्रकल्प प्रशासनाने २४३.५०० मीटर जलसाठा केला आहे. आणखीनही जलसाठ्यात वाढ करण्याचा विचार प्रकल्प प्रशासनाचा आहे. या वाढत्या जलसाठ्याचे परिणाम आता दिसू लागले आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील ४० गावातील शेत रस्ते गोसीप्रकल्पाच्या पाण्यात बुडाले आहे. गत महिनाभरापासून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. अनेकदा कंबरभर पाण्यातून शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. विशेष म्हणजे अंशत: बाधीत ३२ गावांचे पुनर्वसन होण्यापुर्वीच जलपातळी वाढविली आहे. यामुळे या गावातही पाणी शिरण्याची भीती आहे. तसेच अनेक गावातही पाणी शिरण्याचा धोका आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाच्या अधिकाºयांना वारंवार सुचना दिली. प्रशासन म्हणते धोका होणार नाही परंतु पाणी पातळी वाढवितच असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याआदी पुनर्वसन मगच धरण या धोरणाची अंमलबजावणी करावी, प्रकल्पबाधीत कुटुंबातील तरूणाला नोकरी किंवा एकमुस्त २५ लाख रूपये द्यावे, मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, आंभोरा देवस्थान ते बोरगाव मंजुर पूल तात्काळ बांधावा आणि शेतीचे आर्थिक मोबदले द्यावे, आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.गावकऱ्यांना १५ किमीचा फेरासालेबर्डी, खैशी, कवडशी या गावातील नागरिकांना शहापूर मार्गे बाहेर जाण्यासाठी सध्या १५ किमीचा फेरा मारावा लागत आहे. कवडसी नालापुलावर चार ते पाच फुट पाणी असल्याने हा प्रमुख रस्ता बंद पडला आहे. यामुळे या परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. विद्यार्थ्यांना तर पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय नाही. विशेष म्हणजे खैरी गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी येणाऱ्या मजुरांना फेरा मारून यावे लागत असल्याने ते दुप्पट मजुरी मागत असल्याचे अनेकांनी सांगितले.नागपूर येथे प्रहारच्या नेतृत्वात आंदोलनगोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या १८ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर १९ आॅक्टोबर रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे यशवंत टिचकुले यांनी दिली.