शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

४० गावांचे शेतीरस्ते पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:50 IST

गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देशेतकरी व नागरिक त्रस्त : गोसेची पाणी पातळी वाढविल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही.पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावांचा पुनर्वसनांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी निर्धारित क्षमतेपर्यंत वाढविण्याची सुचना आहे. परंतु यावर्षी प्रकल्प प्रशासनाने २४३.५०० मीटर जलसाठा केला आहे. आणखीनही जलसाठ्यात वाढ करण्याचा विचार प्रकल्प प्रशासनाचा आहे. या वाढत्या जलसाठ्याचे परिणाम आता दिसू लागले आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील ४० गावातील शेत रस्ते गोसीप्रकल्पाच्या पाण्यात बुडाले आहे. गत महिनाभरापासून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. अनेकदा कंबरभर पाण्यातून शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. विशेष म्हणजे अंशत: बाधीत ३२ गावांचे पुनर्वसन होण्यापुर्वीच जलपातळी वाढविली आहे. यामुळे या गावातही पाणी शिरण्याची भीती आहे. तसेच अनेक गावातही पाणी शिरण्याचा धोका आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाच्या अधिकाºयांना वारंवार सुचना दिली. प्रशासन म्हणते धोका होणार नाही परंतु पाणी पातळी वाढवितच असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याआदी पुनर्वसन मगच धरण या धोरणाची अंमलबजावणी करावी, प्रकल्पबाधीत कुटुंबातील तरूणाला नोकरी किंवा एकमुस्त २५ लाख रूपये द्यावे, मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, आंभोरा देवस्थान ते बोरगाव मंजुर पूल तात्काळ बांधावा आणि शेतीचे आर्थिक मोबदले द्यावे, आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.गावकऱ्यांना १५ किमीचा फेरासालेबर्डी, खैशी, कवडशी या गावातील नागरिकांना शहापूर मार्गे बाहेर जाण्यासाठी सध्या १५ किमीचा फेरा मारावा लागत आहे. कवडसी नालापुलावर चार ते पाच फुट पाणी असल्याने हा प्रमुख रस्ता बंद पडला आहे. यामुळे या परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. विद्यार्थ्यांना तर पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय नाही. विशेष म्हणजे खैरी गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी येणाऱ्या मजुरांना फेरा मारून यावे लागत असल्याने ते दुप्पट मजुरी मागत असल्याचे अनेकांनी सांगितले.नागपूर येथे प्रहारच्या नेतृत्वात आंदोलनगोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या १८ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर १९ आॅक्टोबर रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे यशवंत टिचकुले यांनी दिली.