शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

४० गावांचे शेतीरस्ते पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:50 IST

गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देशेतकरी व नागरिक त्रस्त : गोसेची पाणी पातळी वाढविल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही.पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावांचा पुनर्वसनांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी निर्धारित क्षमतेपर्यंत वाढविण्याची सुचना आहे. परंतु यावर्षी प्रकल्प प्रशासनाने २४३.५०० मीटर जलसाठा केला आहे. आणखीनही जलसाठ्यात वाढ करण्याचा विचार प्रकल्प प्रशासनाचा आहे. या वाढत्या जलसाठ्याचे परिणाम आता दिसू लागले आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील ४० गावातील शेत रस्ते गोसीप्रकल्पाच्या पाण्यात बुडाले आहे. गत महिनाभरापासून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. अनेकदा कंबरभर पाण्यातून शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. विशेष म्हणजे अंशत: बाधीत ३२ गावांचे पुनर्वसन होण्यापुर्वीच जलपातळी वाढविली आहे. यामुळे या गावातही पाणी शिरण्याची भीती आहे. तसेच अनेक गावातही पाणी शिरण्याचा धोका आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाच्या अधिकाºयांना वारंवार सुचना दिली. प्रशासन म्हणते धोका होणार नाही परंतु पाणी पातळी वाढवितच असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याआदी पुनर्वसन मगच धरण या धोरणाची अंमलबजावणी करावी, प्रकल्पबाधीत कुटुंबातील तरूणाला नोकरी किंवा एकमुस्त २५ लाख रूपये द्यावे, मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, आंभोरा देवस्थान ते बोरगाव मंजुर पूल तात्काळ बांधावा आणि शेतीचे आर्थिक मोबदले द्यावे, आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.गावकऱ्यांना १५ किमीचा फेरासालेबर्डी, खैशी, कवडशी या गावातील नागरिकांना शहापूर मार्गे बाहेर जाण्यासाठी सध्या १५ किमीचा फेरा मारावा लागत आहे. कवडसी नालापुलावर चार ते पाच फुट पाणी असल्याने हा प्रमुख रस्ता बंद पडला आहे. यामुळे या परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. विद्यार्थ्यांना तर पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय नाही. विशेष म्हणजे खैरी गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी येणाऱ्या मजुरांना फेरा मारून यावे लागत असल्याने ते दुप्पट मजुरी मागत असल्याचे अनेकांनी सांगितले.नागपूर येथे प्रहारच्या नेतृत्वात आंदोलनगोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या १८ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर १९ आॅक्टोबर रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे यशवंत टिचकुले यांनी दिली.