शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

४० गावांचे शेतीरस्ते पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:50 IST

गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देशेतकरी व नागरिक त्रस्त : गोसेची पाणी पातळी वाढविल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही.पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावांचा पुनर्वसनांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी निर्धारित क्षमतेपर्यंत वाढविण्याची सुचना आहे. परंतु यावर्षी प्रकल्प प्रशासनाने २४३.५०० मीटर जलसाठा केला आहे. आणखीनही जलसाठ्यात वाढ करण्याचा विचार प्रकल्प प्रशासनाचा आहे. या वाढत्या जलसाठ्याचे परिणाम आता दिसू लागले आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील ४० गावातील शेत रस्ते गोसीप्रकल्पाच्या पाण्यात बुडाले आहे. गत महिनाभरापासून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. अनेकदा कंबरभर पाण्यातून शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. विशेष म्हणजे अंशत: बाधीत ३२ गावांचे पुनर्वसन होण्यापुर्वीच जलपातळी वाढविली आहे. यामुळे या गावातही पाणी शिरण्याची भीती आहे. तसेच अनेक गावातही पाणी शिरण्याचा धोका आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाच्या अधिकाºयांना वारंवार सुचना दिली. प्रशासन म्हणते धोका होणार नाही परंतु पाणी पातळी वाढवितच असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याआदी पुनर्वसन मगच धरण या धोरणाची अंमलबजावणी करावी, प्रकल्पबाधीत कुटुंबातील तरूणाला नोकरी किंवा एकमुस्त २५ लाख रूपये द्यावे, मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, आंभोरा देवस्थान ते बोरगाव मंजुर पूल तात्काळ बांधावा आणि शेतीचे आर्थिक मोबदले द्यावे, आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.गावकऱ्यांना १५ किमीचा फेरासालेबर्डी, खैशी, कवडशी या गावातील नागरिकांना शहापूर मार्गे बाहेर जाण्यासाठी सध्या १५ किमीचा फेरा मारावा लागत आहे. कवडसी नालापुलावर चार ते पाच फुट पाणी असल्याने हा प्रमुख रस्ता बंद पडला आहे. यामुळे या परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. विद्यार्थ्यांना तर पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय नाही. विशेष म्हणजे खैरी गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी येणाऱ्या मजुरांना फेरा मारून यावे लागत असल्याने ते दुप्पट मजुरी मागत असल्याचे अनेकांनी सांगितले.नागपूर येथे प्रहारच्या नेतृत्वात आंदोलनगोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या १८ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर १९ आॅक्टोबर रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे यशवंत टिचकुले यांनी दिली.