शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

चार कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 00:27 IST

करडी परिसरातील ७ गावांसाठी ४ कोटी रूपयांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंदस्थितीत आहे.

जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष : करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनायुवराज गोमासे करडी (पालोरा)करडी परिसरातील ७ गावांसाठी ४ कोटी रूपयांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंदस्थितीत आहे. ही योजना सुरू करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले असले तरी प्रयत्न व्यर्थ ठरले. परिणामी नागरिक शुध्द पाण्यापासून वंचित आहेत. चार वर्षापासून कर्मचारी वेतनाविना आहेत. पाणी शुद्धीकरण यंत्रणा भंगारात निघाली आहे. करडी परिसरातील ७ गावांना शुद्ध पाणी पुरविण्याचे उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. या योजनेसाठी चार कोटी रूपयांचा निधी खर्च झाला. या योजनेत करडी, मुंढरी खुर्द, निलज खुर्द, निलज बुज, देव्हाडा, नरसिंगटोला, मोहगाव, नवेगाव आदी गावांचा समावेश होता. मात्र योजनेचा खर्च पेलणारा नाही, या कारणास्तव करडी गावाने योजनेतून नाव मागे घेतले. त्यामुळे उर्वरित लहान गावांच्या माथ्यावर योजना मारण्यात आली. ही योजना सन २००९ मध्ये तयार होऊन सन २०११ पर्यंत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. अखेर २०१२ मध्ये लोकार्पण करण्यात आले. योजना सुरु होवून जेमतेम कालावधी लोटत नाही, तोच विद्युत बिल व देखरेखीचा मोठा बोझा पडल्याने निधीच्या उपलब्धतेअभावी योजना बंद पडली. पुन्हा निधीसाठी जिल्हा परिषदेने मदत दिल्याने योजना कार्यान्वीत झाली. परंतु पुन्हा महिन्याभरानंतर ४ कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी असहकार आंदोलन पुकारल्याने योजना बंद पडली, ती कायमचीच. त्यानंतर योजना सुरू झाली नाही.बांधकाम होऊन तीन ते चार महिने सुरु राहिली. ही योजना बंद झाल्याने यंत्रणा भंगारात निघाल्यानंतर ही योजना सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले. तुमसर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी बावनकर यांनी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. परंतु उपयोग झालेला नाही. सन २०१२ मध्ये ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरित केल्याचे सांगण्यात आले. योजनेच्या संचालनासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत तत्कालीन उपसभापती उपेश बांते यांचे अध्यक्षतेखाली शिखर समिती गठित करुन योजना सुरु करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु शिखर समितीसुद्धा योजना चालविण्यात अपयशी ठरली.चार गावांचे नुकसानयोजना ७ गावांसाठी तयार करण्यात आली. परंतु यातील तीन गावांनी खर्च झेपणारा नसल्याची बाब समोर केली आहे. निलज बुज, निलज खुर्द, मोहगाव, नवेगाव अद्यापही योजना सुरु करण्याची मागणी करीत आहेत. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत अमानत रक्कम व नळ जोडणीसाठी बांधकाम करुन घेतले आहे. मात्र योजना सुरु करण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पं.स. सदस्य महादेव पचघरे यांनी केला.योजना सुरु करण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेऊन ही मागणी करण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने चार कोटी रूपयांची योजना भंगारात निघाली आहे. शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित असल्याचे निलजचे सरपंच किशोर माटे यांनी सांगितले.