शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

चार कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 00:27 IST

करडी परिसरातील ७ गावांसाठी ४ कोटी रूपयांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंदस्थितीत आहे.

जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष : करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनायुवराज गोमासे करडी (पालोरा)करडी परिसरातील ७ गावांसाठी ४ कोटी रूपयांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंदस्थितीत आहे. ही योजना सुरू करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले असले तरी प्रयत्न व्यर्थ ठरले. परिणामी नागरिक शुध्द पाण्यापासून वंचित आहेत. चार वर्षापासून कर्मचारी वेतनाविना आहेत. पाणी शुद्धीकरण यंत्रणा भंगारात निघाली आहे. करडी परिसरातील ७ गावांना शुद्ध पाणी पुरविण्याचे उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. या योजनेसाठी चार कोटी रूपयांचा निधी खर्च झाला. या योजनेत करडी, मुंढरी खुर्द, निलज खुर्द, निलज बुज, देव्हाडा, नरसिंगटोला, मोहगाव, नवेगाव आदी गावांचा समावेश होता. मात्र योजनेचा खर्च पेलणारा नाही, या कारणास्तव करडी गावाने योजनेतून नाव मागे घेतले. त्यामुळे उर्वरित लहान गावांच्या माथ्यावर योजना मारण्यात आली. ही योजना सन २००९ मध्ये तयार होऊन सन २०११ पर्यंत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. अखेर २०१२ मध्ये लोकार्पण करण्यात आले. योजना सुरु होवून जेमतेम कालावधी लोटत नाही, तोच विद्युत बिल व देखरेखीचा मोठा बोझा पडल्याने निधीच्या उपलब्धतेअभावी योजना बंद पडली. पुन्हा निधीसाठी जिल्हा परिषदेने मदत दिल्याने योजना कार्यान्वीत झाली. परंतु पुन्हा महिन्याभरानंतर ४ कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी असहकार आंदोलन पुकारल्याने योजना बंद पडली, ती कायमचीच. त्यानंतर योजना सुरू झाली नाही.बांधकाम होऊन तीन ते चार महिने सुरु राहिली. ही योजना बंद झाल्याने यंत्रणा भंगारात निघाल्यानंतर ही योजना सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले. तुमसर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी बावनकर यांनी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. परंतु उपयोग झालेला नाही. सन २०१२ मध्ये ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरित केल्याचे सांगण्यात आले. योजनेच्या संचालनासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत तत्कालीन उपसभापती उपेश बांते यांचे अध्यक्षतेखाली शिखर समिती गठित करुन योजना सुरु करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु शिखर समितीसुद्धा योजना चालविण्यात अपयशी ठरली.चार गावांचे नुकसानयोजना ७ गावांसाठी तयार करण्यात आली. परंतु यातील तीन गावांनी खर्च झेपणारा नसल्याची बाब समोर केली आहे. निलज बुज, निलज खुर्द, मोहगाव, नवेगाव अद्यापही योजना सुरु करण्याची मागणी करीत आहेत. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत अमानत रक्कम व नळ जोडणीसाठी बांधकाम करुन घेतले आहे. मात्र योजना सुरु करण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पं.स. सदस्य महादेव पचघरे यांनी केला.योजना सुरु करण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेऊन ही मागणी करण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने चार कोटी रूपयांची योजना भंगारात निघाली आहे. शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित असल्याचे निलजचे सरपंच किशोर माटे यांनी सांगितले.