शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

३७१ गावांना मिळणार दुष्काळी मदत

By admin | Updated: April 6, 2016 00:22 IST

खरीप व रबी हंगामातंर्गत राज्यातील अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून भंडारा जिल्हा बाद ठरविला होता.

शासन आदेश धडकले : लाखनी, साकोली, लाखांदूर तालुक्यातील पूर्ण गावे मदतीच्या यादीतइंद्रपाल कटकवार भंडाराखरीप व रबी हंगामातंर्गत राज्यातील अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून भंडारा जिल्हा बाद ठरविला होता. त्यावेळी ‘लोकमत’ने दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांची आपबिती मांडली होती. तद्वतच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात राज्य शासनाला आदेश देत ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या सर्वच गावांना दुष्काळग्रस्त घोषित करून सवलती द्या, असे म्हटले आहे. आता या आशयाचा आदेश जिल्हा प्रशासनाकडे धडकला असून जिल्ह्यातील ३७१ गावांतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार, राज्याच्या विविध भागात एकूण १५ हजार ७४७ गावांमध्ये वर्ष २०१५ मधील खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले होते. धानाची उतारीही कमी भरली होती. अवर्षणामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. यात दोन हजार कोटी रूपये बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली होती. राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त गावांपैकी भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीच्या दृष्टीकोनातून दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली होती. परंतु निधी वाटपाच्या बाबतीत भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर जिल्हे वगळण्यात आली होती. दरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने या आशयाची याचिका दाखल करून घेत उपरोक्त आदेश दिला. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या ३७१ गावापैंकी लाखनी, साकोली व लाखांदुर तालुक्यातील सर्वंच गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. भंडारा तालुक्यातील ४, तुमसर १२, मोहाडी तालुक्यातील ७० गावांचा समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यातील, विशेषत: विदर्भातील दुष्काळसदृश्य गावांच्या यादीसह शासननिर्णय संकेतस्थळावर उपलब्ध नव्हता. सदर निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी आज या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मंगळवारी आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे.