शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

३६,३१९ विद्यार्थ्यांची कसोटी पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 21:30 IST

इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता ...

ठळक मुद्देपरिक्षा बारावी व दहावीची: शिक्षण विभागाची तयारी पूर्ण, जिल्ह्यात दोन परिक्षा केंद्र संवेदनशिल

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेत यंदा जिल्ह्यातून ३६ हजार ३१९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परिक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहे. विद्यार्थी दशेतील टर्निंग पॉर्इंट म्हणून समजली जाणाऱ्या या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचा कस पणाला लागला आहे. परिक्षा म्हटले म्हणजे अभ्यासाचे टेन्शन वाढत जाते. अशा स्थितीत पालकांसह शिक्षकगण व मार्गदर्शक विद्यार्थ्यांना अभ्यासाप्रती प्रोत्साहीत करीत असतात. मंडळाने काही महिन्यांपूर्वी बारावी व दहावी परिक्षेचे वेळापत्रक घोषित केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे नियोजनही सुरु होते. २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परिक्षेला सुरुवात होणार असून यावर्षी जिल्ह्यातून १८ हजार ५७९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ६१ परिक्षा केंद्रामधून विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. यात विशेष म्हणजे बारावीचे सर्वाधिक परिक्षार्थी भंडारा तालुक्यातून आहेत. बारावी परिक्षेचा शेवटचा पेपर २० मार्च रोजी आहे. दहावीची परिक्षा १ मार्च पासून सुरु होणार असून यात १७ हजार ७४० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन परिक्षा केंद्र संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात सदर दोन्ही केंद्र मोहाडी तालुक्यातील असून १२ वीचे केंद्र म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल आंधळगाव व दहावीचे केंद्र असलेल्या कान्हळगाव येथील नवप्रभात हायस्कूलचा समावेश आहे. दहावीची परिक्षा २२ मार्च रोजी संपणार आहे. परिक्षेसाठी शिक्षण विभागाची पुर्ण तयारी झाली आहे. कॉपीमुक्त अभियानासाठीही शिक्षण विभागाने चांगलाच भर दिला आहे.