शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

३६,३१९ विद्यार्थ्यांची कसोटी पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 21:30 IST

इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता ...

ठळक मुद्देपरिक्षा बारावी व दहावीची: शिक्षण विभागाची तयारी पूर्ण, जिल्ह्यात दोन परिक्षा केंद्र संवेदनशिल

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेत यंदा जिल्ह्यातून ३६ हजार ३१९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परिक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहे. विद्यार्थी दशेतील टर्निंग पॉर्इंट म्हणून समजली जाणाऱ्या या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचा कस पणाला लागला आहे. परिक्षा म्हटले म्हणजे अभ्यासाचे टेन्शन वाढत जाते. अशा स्थितीत पालकांसह शिक्षकगण व मार्गदर्शक विद्यार्थ्यांना अभ्यासाप्रती प्रोत्साहीत करीत असतात. मंडळाने काही महिन्यांपूर्वी बारावी व दहावी परिक्षेचे वेळापत्रक घोषित केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे नियोजनही सुरु होते. २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परिक्षेला सुरुवात होणार असून यावर्षी जिल्ह्यातून १८ हजार ५७९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ६१ परिक्षा केंद्रामधून विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. यात विशेष म्हणजे बारावीचे सर्वाधिक परिक्षार्थी भंडारा तालुक्यातून आहेत. बारावी परिक्षेचा शेवटचा पेपर २० मार्च रोजी आहे. दहावीची परिक्षा १ मार्च पासून सुरु होणार असून यात १७ हजार ७४० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन परिक्षा केंद्र संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात सदर दोन्ही केंद्र मोहाडी तालुक्यातील असून १२ वीचे केंद्र म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल आंधळगाव व दहावीचे केंद्र असलेल्या कान्हळगाव येथील नवप्रभात हायस्कूलचा समावेश आहे. दहावीची परिक्षा २२ मार्च रोजी संपणार आहे. परिक्षेसाठी शिक्षण विभागाची पुर्ण तयारी झाली आहे. कॉपीमुक्त अभियानासाठीही शिक्षण विभागाने चांगलाच भर दिला आहे.