शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार महिलांना मिळाला ‘उज्ज्वला’ सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:20 IST

ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धूरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या ......

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धूरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा भंडारा जिल्ह्यातील ३५ हजार ३४ महिलांना लाभ मिळाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यावर होणाºया विपरित परिणामाला काही प्रमाणात आळा बसला असून महिलांना धुरापासून जडणाºया विविध आजारातून मुक्तता मिळणार आहे.भंडारा जिल्हयात भारत पेट्रोलियम कापोर्रेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन व इंडियन आॅईल कापोर्रेशन या तीनही कंपन्याकडे ५५ हजार ९०५ अर्ज प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत सादर करण्यात आले होते. त्यापैकी ४३ हजार २३६ अर्ज मंजूर झाले असून ३५ हजार ३४ कुटूंबांना उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे.भारत पेट्रोलियम कापोर्रेशनने चार हजार ९५९, हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशनने १५ हजार ८८० व इंडियन आॅईल कापोर्रेशनने १४ हजार १९५ असे एकूण ३५ हजार ३४ गॅस कनेक्शन या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना वितरित केले आहे. आजही ग्रामीण व निमशहरी भागातील महिला चुलीवर स्वयंपाक करतात. त्यासाठी इंधन म्हणून लाकुड, कोळसा आणि शेणाच्या गोवºयाचा वापर होतो. यातील मुख्य इंधन म्हणून लाकडाचा उपयोग होतो आणि ते मिळवण्यासाठी महिलांना चांगलेच कष्ट पडतात. चुलीत जळणाºया या अस्वच्छ इंधनातून निघणाºया धुराचा स्त्री आणि तिच्या लहान मुलांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो.जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार हा धूर श्वसनाद्वारे शरीरात जाणे म्हणजे एका तासात ४०० सिगारेट ओढण्यासारखे आहे. महिला किमान ३ तास सकाळी आणि दोन तास रात्री या अशा धुराच्या सानिध्यात येतात. म्हणजे रोज १६०० सिगारेट आणि वर्षाच्या ५ लाख ८४ हजार सिगारेट ओढणे होय. परिणामी दमा आणि श्वसनाच्या इतर आजारांना महिला बळी पडतात. तिच्या संपूर्ण आयुष्यातील किमान १० ते १५ वर्षे तरी यामुळे कमी होतात.मुख्य म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गरीब महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणा?्या या योजनेची अंमलबजावणी खुद्द पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय स्वत: करीत आहे.यासाठी सर्व पेट्रोलियम कंपन्या या योजनेची अंमलबाजावणीसाठी नेमल्या आहेत.केवळ सव्वा वर्षात देशात दोन कोटी ९५ लक्ष ४३ हजार ११३ कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्रात १५ लाख २८ हजार ५४ महिलांना याचा लाभ मिळाला असून भंडारा जिल्ह्यात ३५ हजार ३४ गरीब महिलांचा सन्मान यामुळे वाढला आहे. प्रत्येक जोडणीमागे १६०० रुपये अनुदान देण्यात येत असून या योजनेच्या अंमलबाजावणीसाठी केंद्र शासनाने ८ हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पीत केला आहे.