शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळ्यात ३४ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: April 21, 2017 00:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता,

मोहरणा व पळसगाव येथे आयोजन : स्वत:च्या मुलीचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करण्याचा पटोले यांचा संकल्प लाखांदूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता, सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला-मुलींची लग्न लावून देणे काळाची गरज झाली आहे, असे आवाहन करीत आपल्या मुलीचेही लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करणार असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. मोहरणा येथील सर्वधर्मिय सामूहीक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे गुरूवारला ओबीसी व छावा संग्राम परीषदेच्यावतीने सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, भाजपचे वामन बेदरे, अ‍ॅड.वसंता एंचिलवार, सभापती मंगला बगमारे, पं.स. सदस्य शिवाजी देशकर, भरत खंडाईत, नगरसेव रामचंद राऊत, नुतन कांबळे, सभापती सुभाष राऊत, रामकृष्ण ठेंगरी, देवा पाटील राऊत, मनोहर महावाडे, ताराचंद मातेरे, दादाजी राऊत, सरपंच ग्रिष्मा राऊत, भायुमो सचिव जितेंद्र ढोरे, बाळु बुराडे, पवन समरत, सुभाष खिलवानी, वंदना ढोरे, अमर भानारकर, लोचन पारधी, उर्मिला राऊत संचालक, रूपाली राऊत ग्रा.पं.सदस्य, मनोरमा मोटघरे, गजानन शहारे उपस्थित होते.यावेळी खा.पटोले म्हणाले, मागील बारा वर्षांपासून हा सोहळा छावा संग्राम परीषदेच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. जनतेच्या आशिवार्दाने आपले विवाह सोहळे आजही चालुच आहेत. जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासुन कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, त्याचा फायदा जनतेला मिळणार आहे असेही ते म्हणाले.खा.पटोले यांनी संसारपयोगी साहीत्य व ग्रामगितेचे वाटप करून व सर्व वर-वधुंचे पालकत्व स्वीकारून कन्यादान केले. प्रास्ताविक नाना पिलारे यांनी तर संचालन रामचंद्र राऊत व यशवंत नखाते यांनी केले. कार्यक्रमासाठी विलास पिलारे, मधुकर भोयर, मंगेश राऊत, श्रीधर राऊत, यांच्यासह मोहरणावासीयांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)साकोली : सामूहिक विवाह सोहळयाच्या माध्यमातून बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित होते, त्यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत आम्ही हे कार्य प्रामाणिकपणे करीत आहोत. या सोहळयांच्या माध्यमातून ओबीसी बहुजन समाज विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे. ओबीसी समाजाचे स्वतंत्र मंत्रालय असावे अशी आमची लढाई होती. त्यात आम्हाला यश आले असून राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय तयार केले. बहुजनांना एकत्र आणण्याचे व्यासपीठ म्हणजे सामूहीक विवाह सोहळे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.पळसगाव (सोनका) येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळयात ते बोलत होते. यावेळी १३ जोडपी विवाहबध्द झाली. त्यांना खा.पटोले यांनी भेटवस्तू दिले. मंचावर आमदार परिणय फुके, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, श्रावण ब्राम्हणकर, उपसभापती लखन बर्वे, माजी जि.प. सदस्या सविता ब्राम्हणकर, भरत खंडाईत, नेपाल कापगते, घनशाम मेंढे, जिल्हा परिषद सदस्य दीपक मेंढे, यादोराव कापगते, सरपंच कामिना भेंडारकर, सरपंच प्रेमराज गहाणे व राजू पालीवार उपस्थित होते. या विवाह सोहळयाला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)