शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

सामूहिक विवाह सोहळ्यात ३४ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: April 21, 2017 00:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता,

मोहरणा व पळसगाव येथे आयोजन : स्वत:च्या मुलीचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करण्याचा पटोले यांचा संकल्प लाखांदूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता, सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला-मुलींची लग्न लावून देणे काळाची गरज झाली आहे, असे आवाहन करीत आपल्या मुलीचेही लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करणार असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. मोहरणा येथील सर्वधर्मिय सामूहीक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे गुरूवारला ओबीसी व छावा संग्राम परीषदेच्यावतीने सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, भाजपचे वामन बेदरे, अ‍ॅड.वसंता एंचिलवार, सभापती मंगला बगमारे, पं.स. सदस्य शिवाजी देशकर, भरत खंडाईत, नगरसेव रामचंद राऊत, नुतन कांबळे, सभापती सुभाष राऊत, रामकृष्ण ठेंगरी, देवा पाटील राऊत, मनोहर महावाडे, ताराचंद मातेरे, दादाजी राऊत, सरपंच ग्रिष्मा राऊत, भायुमो सचिव जितेंद्र ढोरे, बाळु बुराडे, पवन समरत, सुभाष खिलवानी, वंदना ढोरे, अमर भानारकर, लोचन पारधी, उर्मिला राऊत संचालक, रूपाली राऊत ग्रा.पं.सदस्य, मनोरमा मोटघरे, गजानन शहारे उपस्थित होते.यावेळी खा.पटोले म्हणाले, मागील बारा वर्षांपासून हा सोहळा छावा संग्राम परीषदेच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. जनतेच्या आशिवार्दाने आपले विवाह सोहळे आजही चालुच आहेत. जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासुन कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, त्याचा फायदा जनतेला मिळणार आहे असेही ते म्हणाले.खा.पटोले यांनी संसारपयोगी साहीत्य व ग्रामगितेचे वाटप करून व सर्व वर-वधुंचे पालकत्व स्वीकारून कन्यादान केले. प्रास्ताविक नाना पिलारे यांनी तर संचालन रामचंद्र राऊत व यशवंत नखाते यांनी केले. कार्यक्रमासाठी विलास पिलारे, मधुकर भोयर, मंगेश राऊत, श्रीधर राऊत, यांच्यासह मोहरणावासीयांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)साकोली : सामूहिक विवाह सोहळयाच्या माध्यमातून बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित होते, त्यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत आम्ही हे कार्य प्रामाणिकपणे करीत आहोत. या सोहळयांच्या माध्यमातून ओबीसी बहुजन समाज विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे. ओबीसी समाजाचे स्वतंत्र मंत्रालय असावे अशी आमची लढाई होती. त्यात आम्हाला यश आले असून राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय तयार केले. बहुजनांना एकत्र आणण्याचे व्यासपीठ म्हणजे सामूहीक विवाह सोहळे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.पळसगाव (सोनका) येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळयात ते बोलत होते. यावेळी १३ जोडपी विवाहबध्द झाली. त्यांना खा.पटोले यांनी भेटवस्तू दिले. मंचावर आमदार परिणय फुके, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, श्रावण ब्राम्हणकर, उपसभापती लखन बर्वे, माजी जि.प. सदस्या सविता ब्राम्हणकर, भरत खंडाईत, नेपाल कापगते, घनशाम मेंढे, जिल्हा परिषद सदस्य दीपक मेंढे, यादोराव कापगते, सरपंच कामिना भेंडारकर, सरपंच प्रेमराज गहाणे व राजू पालीवार उपस्थित होते. या विवाह सोहळयाला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)