मोहरणा व पळसगाव येथे आयोजन : स्वत:च्या मुलीचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करण्याचा पटोले यांचा संकल्प लाखांदूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता, सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला-मुलींची लग्न लावून देणे काळाची गरज झाली आहे, असे आवाहन करीत आपल्या मुलीचेही लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करणार असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. मोहरणा येथील सर्वधर्मिय सामूहीक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे गुरूवारला ओबीसी व छावा संग्राम परीषदेच्यावतीने सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, भाजपचे वामन बेदरे, अॅड.वसंता एंचिलवार, सभापती मंगला बगमारे, पं.स. सदस्य शिवाजी देशकर, भरत खंडाईत, नगरसेव रामचंद राऊत, नुतन कांबळे, सभापती सुभाष राऊत, रामकृष्ण ठेंगरी, देवा पाटील राऊत, मनोहर महावाडे, ताराचंद मातेरे, दादाजी राऊत, सरपंच ग्रिष्मा राऊत, भायुमो सचिव जितेंद्र ढोरे, बाळु बुराडे, पवन समरत, सुभाष खिलवानी, वंदना ढोरे, अमर भानारकर, लोचन पारधी, उर्मिला राऊत संचालक, रूपाली राऊत ग्रा.पं.सदस्य, मनोरमा मोटघरे, गजानन शहारे उपस्थित होते.यावेळी खा.पटोले म्हणाले, मागील बारा वर्षांपासून हा सोहळा छावा संग्राम परीषदेच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. जनतेच्या आशिवार्दाने आपले विवाह सोहळे आजही चालुच आहेत. जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासुन कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, त्याचा फायदा जनतेला मिळणार आहे असेही ते म्हणाले.खा.पटोले यांनी संसारपयोगी साहीत्य व ग्रामगितेचे वाटप करून व सर्व वर-वधुंचे पालकत्व स्वीकारून कन्यादान केले. प्रास्ताविक नाना पिलारे यांनी तर संचालन रामचंद्र राऊत व यशवंत नखाते यांनी केले. कार्यक्रमासाठी विलास पिलारे, मधुकर भोयर, मंगेश राऊत, श्रीधर राऊत, यांच्यासह मोहरणावासीयांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)साकोली : सामूहिक विवाह सोहळयाच्या माध्यमातून बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित होते, त्यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत आम्ही हे कार्य प्रामाणिकपणे करीत आहोत. या सोहळयांच्या माध्यमातून ओबीसी बहुजन समाज विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे. ओबीसी समाजाचे स्वतंत्र मंत्रालय असावे अशी आमची लढाई होती. त्यात आम्हाला यश आले असून राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय तयार केले. बहुजनांना एकत्र आणण्याचे व्यासपीठ म्हणजे सामूहीक विवाह सोहळे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.पळसगाव (सोनका) येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळयात ते बोलत होते. यावेळी १३ जोडपी विवाहबध्द झाली. त्यांना खा.पटोले यांनी भेटवस्तू दिले. मंचावर आमदार परिणय फुके, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, श्रावण ब्राम्हणकर, उपसभापती लखन बर्वे, माजी जि.प. सदस्या सविता ब्राम्हणकर, भरत खंडाईत, नेपाल कापगते, घनशाम मेंढे, जिल्हा परिषद सदस्य दीपक मेंढे, यादोराव कापगते, सरपंच कामिना भेंडारकर, सरपंच प्रेमराज गहाणे व राजू पालीवार उपस्थित होते. या विवाह सोहळयाला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
सामूहिक विवाह सोहळ्यात ३४ जोडपी विवाहबद्ध
By admin | Updated: April 21, 2017 00:38 IST