शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘त्या’ ३३ विद्यार्थ्यांना दोन्ही सत्राची परीक्षा देण्याची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:09 IST

स्थानिक समर्थ महाविद्यालयाने एमकॉमच्या ३३ विद्यार्थांना प्रथम सेमिस्टर परिक्षेपासून वंचित ठेवले. त्यानंतर आमदार डॉ.परिणय फुके आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद लाखनीकर यांच्या प्रयत्नाने हा तिढा सुटला.

ठळक मुद्देपरिणय फुके यांची मध्यस्थी : महाविद्यालयाला संलग्नित करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानिक समर्थ महाविद्यालयाने एमकॉमच्या ३३ विद्यार्थांना प्रथम सेमिस्टर परिक्षेपासून वंचित ठेवले. त्यानंतर आमदार डॉ.परिणय फुके आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद लाखनीकर यांच्या प्रयत्नाने हा तिढा सुटला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले.समर्थ महाविद्यालयात ४१७ क्रमांकाचे परीक्षा केंद्र आहे. तिथे एमकॉमच्या ३३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. परंतु २५ आॅक्टोबरला पहिला पेपर असताना विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र महाविद्यालयातून मिळाले नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ.संजय पोहरकर यांना विचारले असता त्यांनी केंद्र संलग्नीकरण न झाल्यामुळे परीक्षेला बसता येणार नाही, असे सांगून प्रवेश रद्द करण्याबाबत विद्यार्थ्यांकडून अर्ज लिहून मूळ कागदपत्रे परत घेण्यासाठी सांगितले.दरम्यान खासदार नाना पटोले यांनी विद्यार्थ्यांही ही समस्या लक्षात घेऊन कुलगुरू काणे यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशा सूचना केल्या. ही बाब विद्यार्थ्यांनी आमदार डॉ.परिणय फुके यांना सांगितली त्यांनी वेळीच दखल घेत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी सांगितले. आणि शुक्रवारला नागपूर येथे विद्यापीठात कुलगुरू डॉ.काणे यांची आ.परिणय फुके, माजी सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. समस्या ऐकून घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रात प्रथम सत्राची परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही असे सांगून परीक्षा केंद्र संलग्नित प्रक्रिया पूर्ण करण्याचे कुलगुरूंनी प्राचार्यांना सांगितले. या बैठकीत हर्षा जवंजाळ, पल्लवी पंधरे, मनीषा भानारकर, मेघा बांगडकर, अर्चना निमजे, श्रुती वासनिक, दीपक टेकाम, योगेश निखारे, विक्की बुंदेले असे ३२ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या बैठकीला प्राचार्य संजय पोहरकर उपस्थित नव्हते.समर्थ महाविद्यालयातील ३२ विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिले, असे कळताच मी कुलगुरूंना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी हे सांगितले. महाविद्यालयाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये. आज विद्यापीठात कुलगुरू सोबत बैठकीत त्यावर तोडगा निघाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.-डॉ.परिणय फुके, आमदार, विधानपरिषद.महाविद्यालयाच्या चुकीमुळे एमकॉमचे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालयाला संलग्नीकरण प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या सत्रात प्रथम आणि द्वितीय सत्राची परीक्षा देण्याची मुभा देण्याचा निर्णय विद्यापीठात घेतला.- डॉ.सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू,रा तू म विद्यापीठ, नागपूर.महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही, हे कळताच आम्ही संस्थेच्यावतीने संस्था प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ कुलगुरूंच्या भेटीसाठी गेलो. माजी सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते यांच्या नेतृत्वात कुलगुरूंसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात आला.- आल्हाद लाखनीकर, अध्यक्ष, राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी