शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

२६ दिवसांत ३३ टक्के पाऊस

By admin | Updated: June 27, 2017 00:26 IST

जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असताना त्यात निसर्गाचा साथही अत्यंत महत्वाची बाब आहे.

खरीप हंगाम उशिरा : दीड लक्ष हेक्टरमधील पेरणी खोळंबलीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असताना त्यात निसर्गाचा साथही अत्यंत महत्वाची बाब आहे. मान्सूनची चाहूल लागली असतानाही जिल्ह्यात २६ दिवसात फक्त ३३ टक्के पाऊस बरसला आहे. परिणामी खरीप हंगामाला यावर्षीही विलंबाने सुरूवात होणार असून दीड लक्ष हेक्टरमधील पेरणी खोळंबली असल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी नर्सरी भात पिकाची लागवड केली असली तरी रोवणीला प्रारंभ झालेला नाही.दुसरीकडे ९० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी बांधव निसर्गाच्या कृपेवर आधारित आहे. मान्सूनसत्र सुरू होऊनही वरूण राजाने मुबलक प्रमाणात हजेरी लावलेली नाही. मागील २६ दिवसात लाखांदूर, भंडारा, मोहाडी व लाखनी तालुक्यातच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या आधारावरच पाऊसाची टक्केवारी ३३ वर पोहचली असली तरी जिथे बरसला तिथेच बरसला, अशी स्थिती पहायला मिळत आहे. पेरणी करूनही पाऊस न बरसल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. हवामान खात्याच्या नोंदीप्रमाणे भंडारा तालुक्यात आतापर्यंत ६९.५ मि.मी. मोहाडी ३६.४, तुमसर १०.४, पवनी ३९.७, साकोली ३२.२, लाखांदूर ४५.५, लाखनी १४०.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ५३.४ इतकी आहे.