शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

३२ एस.टी. कर्मचारी कामावर परतले; आठ बसेस धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST

एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी गत ५१ दिवसांपासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून बोलणी झाली. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी २२ व २३ डिसेंबरला कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. सेवासमाप्ती, निलंबन आणि बदल्या मागे घेतल्या जातील असे आश्वासन दिले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल ५१ दिवसांपासून संप करणारे कर्मचारी दोन दिवसांत कामावर रुजू झाल्यास कोणतीही कारवाई करणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी करताच भंडारा विभागातील ३२ कर्मचारी बुधवारी कामावर परतले. आठ बसेस रस्त्यावर धावल्या. गुरुवारी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर परतील अशी आशा आहे.एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी गत ५१ दिवसांपासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून बोलणी झाली. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी २२ व २३ डिसेंबरला कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. सेवासमाप्ती, निलंबन आणि बदल्या मागे घेतल्या जातील असे आश्वासन दिले. त्यावरून बुधवारी भंडारा विभागातील ३२ कर्मचारी रुजू झाले. सध्या भंडारा विभागातील १५२३ कर्मचाऱ्यांपैकी १२३२ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. गत तीन आठवड्यांपासून भंडारा व साकोली आगारातून बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बुधवारी ३२ कर्मचारी कामावर रुजू झाल्याने आठ बसेस रस्त्यावर धावल्या. त्यात पाच बसेस भंडारा-नागपूर, दोन बसेस भंडारा-पवनी आणि एक बस भंडारा-साकोली या मार्गावर धावली. ३६७ पैकी ३५९ बसेस आजही आगारातच उभ्या आहेत. परिवहन मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार बुधवारी कर्मचारी परतल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारीही आणखी कर्मचारी परततील, अशी अपेक्षा एस.टी. महामंडळाला आहे. गत ५१ दिवसांपासून संप सुरू असल्याने ग्रामीण व शहरी प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनधारक प्रवाशांकडून दामदुप्पट तिकीट वसूल करीत आहेत.

५१ दिवसांत २१.७८ कोटींचे नुकसान -  राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा गत ५१ दिवसांपासून संप सुरू आहे. एस.टी. बसेस बंद असल्याने भंडारा विभागातील सहा आगारांचे तब्बल २१ कोटी ७८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप सुरू झाल्याने एस.टी.चे मोठे नुकसान झाले आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

बसमध्ये प्रवाशांची गर्दी- महामंडळाच्या बोटावर मोजण्याएवढ्या बसेस सुरु असून या बसेसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. भंडारा-नागपूर या बसमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नसते. दिवसभरात पाच बसेस या मार्गावर धावत असून प्रवासी एसटीलाच पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे.

परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानुसार कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. दोन दिवसाची शेवटची संधी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. ही संधी कुणीही सोडू नये. कारण त्यानंतर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. भंडारा आगारातून बुधवारी आठ बसेस रस्त्यावर धावल्यात.-डाॅ.चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप