शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

३२ एस.टी. कर्मचारी कामावर परतले; आठ बसेस धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST

एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी गत ५१ दिवसांपासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून बोलणी झाली. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी २२ व २३ डिसेंबरला कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. सेवासमाप्ती, निलंबन आणि बदल्या मागे घेतल्या जातील असे आश्वासन दिले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल ५१ दिवसांपासून संप करणारे कर्मचारी दोन दिवसांत कामावर रुजू झाल्यास कोणतीही कारवाई करणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी करताच भंडारा विभागातील ३२ कर्मचारी बुधवारी कामावर परतले. आठ बसेस रस्त्यावर धावल्या. गुरुवारी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर परतील अशी आशा आहे.एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी गत ५१ दिवसांपासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून बोलणी झाली. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी २२ व २३ डिसेंबरला कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. सेवासमाप्ती, निलंबन आणि बदल्या मागे घेतल्या जातील असे आश्वासन दिले. त्यावरून बुधवारी भंडारा विभागातील ३२ कर्मचारी रुजू झाले. सध्या भंडारा विभागातील १५२३ कर्मचाऱ्यांपैकी १२३२ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. गत तीन आठवड्यांपासून भंडारा व साकोली आगारातून बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बुधवारी ३२ कर्मचारी कामावर रुजू झाल्याने आठ बसेस रस्त्यावर धावल्या. त्यात पाच बसेस भंडारा-नागपूर, दोन बसेस भंडारा-पवनी आणि एक बस भंडारा-साकोली या मार्गावर धावली. ३६७ पैकी ३५९ बसेस आजही आगारातच उभ्या आहेत. परिवहन मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार बुधवारी कर्मचारी परतल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारीही आणखी कर्मचारी परततील, अशी अपेक्षा एस.टी. महामंडळाला आहे. गत ५१ दिवसांपासून संप सुरू असल्याने ग्रामीण व शहरी प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनधारक प्रवाशांकडून दामदुप्पट तिकीट वसूल करीत आहेत.

५१ दिवसांत २१.७८ कोटींचे नुकसान -  राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा गत ५१ दिवसांपासून संप सुरू आहे. एस.टी. बसेस बंद असल्याने भंडारा विभागातील सहा आगारांचे तब्बल २१ कोटी ७८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप सुरू झाल्याने एस.टी.चे मोठे नुकसान झाले आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

बसमध्ये प्रवाशांची गर्दी- महामंडळाच्या बोटावर मोजण्याएवढ्या बसेस सुरु असून या बसेसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. भंडारा-नागपूर या बसमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नसते. दिवसभरात पाच बसेस या मार्गावर धावत असून प्रवासी एसटीलाच पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे.

परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानुसार कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. दोन दिवसाची शेवटची संधी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. ही संधी कुणीही सोडू नये. कारण त्यानंतर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. भंडारा आगारातून बुधवारी आठ बसेस रस्त्यावर धावल्यात.-डाॅ.चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप