शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

रोजगारातून 28 हजार महिला झाल्या सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:50 IST

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून समाजात सन्मानाने जगण्याचा मार्गदेखील महिलांनी स्वीकारलेला पाहायला मिळत आहे. मोहाडी तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत १,७११ महिला बचत गट कार्यरत आहेत. यात १८ हजार ५२२ महिला स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमामधून अनेक महिलांचे संसार उभे राहिले आहेत.

ठळक मुद्देआज जागतिक महिला दिन : जिल्ह्यातील बचत गटांची भरारी, अन्‌ गवसला प्रगतीचा मार्ग

राजू बांतेलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : एकजूट, जिद्द, मेहनत याद्वारे या महिलांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या आता ख-या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. मेहनतीच्या जोरावर प्रगतीचा मार्ग गवसला आहे.एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रांत दिसू लागला आहे. मर्यादित क्षेत्रापुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून समाजात सन्मानाने जगण्याचा मार्गदेखील महिलांनी स्वीकारलेला पाहायला मिळत आहे. मोहाडी तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत १,७११ महिला बचत गट कार्यरत आहेत. यात १८ हजार ५२२ महिला स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमामधून अनेक महिलांचे संसार उभे राहिले आहेत. त्या महिला आपल्या संसारासाठी हातभार लावत आहेत. २०२०-२०२१ मध्ये सात लक्ष ३१ हजार रक्कम ५७९ महिला बचतसमूहाला कर्जवाटप करण्यात आली आहे. तसेच ९४८ महिला बचत गटसमूहाला १०-१५ हजार खेळते भांडवल प्राप्त करून देण्यात आले आहे. या खेळत्या भांडवलावर आंधळगाव येथे वारली पेंटिंग, करडी येथे बांबू व्यवसाय, वरठी कागदी बाहुल्या, पाचगाव येथे जैविक खत, जैविक गांडूळ, कांद्री येथे बॅग व्यवसाय तसेच दुग्ध व्यवसाय, अगरबत्ती, पापड, मसाले आदी व्यवसाय मोहाडी तालुक्यात महिला बचत गटांमार्फत केले जात आहेत. महिलांनी आपले व्यवसाय घरबसल्या सुरू केले आहेत. या सर्व महिलांचे व्यवसाय आता स्थिर झाले आहेत. आंधळगाव येथे तर रेशीम कापडाच्या साड्या करण्याचा व्यवसाय दुर्गा व यशस्वी बचत गटांकडून केला जातो. 

आर्थिक व सामाजिक स्तर सुधारला n  बचत गटाने तयार केलेल्या साड्यांना राज्यात व परराज्यांत मागणी आहे. कुरिअरद्वारे आंधळगाव येथील साड्या विविध ठिकाणी पाठविल्या जातात. राज्यात होणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रदर्शनांत आंधळगाव येथील साड्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. बचत गटांमुळेच या महिला एकत्र येऊन सुसंवाद साधू लागल्या. परस्परांमध्ये विचारविनिमय करू लागल्या आहेत. त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर सुधारला, याची जाणीव त्यांना आहे. 

बचत गटांमुळे आर्थिक कणा सक्षम झाला आहे. प्रगतीच्या दिशेने झेपावणारा आत्मविश्वास वाढलेला आहे. याकरिता गरज आहे, ती जिद्द व संघर्ष करण्याची, संधीचं सोनं करण्याची.-कांचन निंबार्ते,  उपसरपंच, ग्रामपंचायत कान्हळगाव

 

टॅग्स :Womenमहिला