शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

२७,६२९ पाठ्यपुस्तकांचा तुटवडा

By admin | Updated: June 13, 2017 00:17 IST

सर्व शिक्षा अभियानातंर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहू नये,...

देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्व शिक्षा अभियानातंर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहू नये, यासाठी यंदा एक लाख १५ हजार ७१ विद्यार्थ्यांसाठी एकूण सहा लाख ३८ हजार १०७ पुस्तकांची मागणी बालभारतीकडे नोंदविण्यात आली. यापैकी आतापर्यत सहा लाख १० हजार ४७८ पुस्तके प्राप्त झालेली आहेत. २०१७-१८ शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यत उर्वरीत २७ हजार ६२९ पुस्तक मिळतील, असा विश्वास जिल्हा परीषद शिक्षण विभागाने दिला.प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शैक्षणिक सत्र २७ जूनपासून सुरू होत आहे़ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे़ केंद्र शासनाच्या अभिनव योजनेपैकी ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे़ मराठी, हिंदी, उर्दू, सेमी इंग्रजी अशा माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पाठ्यपुस्तके मोफत वितरित करण्यात येतात. पुणे येथील पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, बालभारतीच्या माध्यमातून नागपूरच्या पाठ्यपुस्तक भंडार व वितरण केंद्र, बालभारतीला पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. जिल्हास्तरीय सर्व शिक्षा अभियानातंर्गत तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्याचे वितरण करण्यात येते. मात्र यावर्षी नागपूर येथून थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली. पाठ्यपुस्तके प्रत्येक शाळांना वितरण करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख १५ हजार ७१ विद्यार्थ्यांसाठी एकूण सहा लाख १० हजार ४७८ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी सहा लाख १० हजार ४७८ पुस्तके शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहेत. यामध्ये इयत्ता पहिलीच्या १३ हजार १५१ विद्यार्थ्यांना ३९ हजार ४५३ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी सर्वच पुस्तके प्राप्त झाली आहेत. इयत्ता दुसरीसाठी ३८,८७४ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी सर्व पुस्तकांची उचल करण्यात आली असून १२ हजार ९५८ विद्यार्थ्यांना त्याचे वाटप होणार आहे. इयत्ता तीसरीसाठी ५१ हजार ८२७ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी ४८ हजार ३५१ पुस्तकांची उचल करण्यात आली असून ३,४७६ पुस्तके अद्याप प्राप्त होऊ शकली नाही. इयत्ता चवथीकरिता ६९ हजार ८० पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी ६७,२८८ पुस्तका प्राप्त झालेल्या आहेत. इयत्ता चवथीचे लाभार्थी १३,७९४ एवढे आहेत. इयत्ता पाचवीच्या १४ हजार ७६३ विद्यार्थ्यांसाठी ८८ हजार ६२७ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी ८८ हजार ५१५ पुस्तके प्राप्त झाली आहेत. इयत्ता ६ वी च्या १५ हजार ४२६ विद्यार्थ्यांसाठी एक लक्ष ३९ हजार १४६ पाठ्यपुस्तकांची उचल करण्यात आली असून एक लाख ८ हजार १२ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी सर्व पुस्तके प्राप्त झालेली आहेत. इयत्ता सातवीकरिता १४ हजार ४६२ पाठ्यपुस्तके अद्यापही प्राप्त होऊ शकली नाही. एक लाख ९ हजार ८४२ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी ९५ हजार ३८० पाठ्यपुस्तकांची उचल केली आहे. एकूण लाभार्थी १५ हजार ६८६ एवढी आहे. इयत्ता आठवीचे लाभार्थी संख्या १६ हजार ३६३ असून बालभारतीकडे एक लाख ३२ हजार ३९२ पाठ्यपुस्तकांची मागणी केली.जिल्ह्यातील १,१६९ शाळांना मिळणार पुस्तकेजिल्ह्यातील १,१६९ शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. यात ७९९ जिल्हा परीषद शाळा, २४ नगरपालिका शाळा, ३४३ खासगी अनुदानित शाळा व शासकीय, समाजकल्याण व आदीवासी विभागातंर्गत असलेल्या प्रत्येकी एक शाळेचा समावेश आहे.इयत्ता ७ व ९ वीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशितमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे यांच्या परिपत्रकान्वये शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून इयत्ता ७ व ९ वी ची सर्व पाठ्यपुस्के नव्याने प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच "प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२" सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इय्यता ३ री परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) व इयत्ता ४ थी व ५ वी परिसर अभ्यास भाग-१ व भाग-२ ही पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०१८- १९ मध्ये बदलणे अपेक्षित आहे. त्यामुळे २०१७- १८ मध्ये जुन्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहणार आहे.