शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

२.७५ लाख रेशन कार्ड होणार ‘स्मार्ट’

By admin | Updated: May 12, 2015 00:33 IST

सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी रेशन कार्ड स्मार्ट केले जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील २.७५ लाख ...

बायोमेट्रिक प्रणालीने होणार धान्यवाटपप्रशांत देसाई भंडारासार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी रेशन कार्ड स्मार्ट केले जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील २.७५ लाख शिधापत्रिका संगणकीकृत केले जात आहे. त्याला आधार क्रमांकाची जोड देऊन यापूढे बायोमेट्रिक प्रणालीने धान्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत प्रत्येक लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे.भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाख ७५,४१४ आहे. त्यापैकी दोन लाख ७५,६१५ शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिका बारकोड प्रणालीने जोडण्यात येणार आहे. यात प्राधान्य गट, अंत्योदय, अन्नपूर्णा, केसरी, शुभ्र शिधापत्रिकाधारकांचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यात बारकोड प्रणालीने शिधापत्रिका जोडण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अडीच लाख शिधापत्रिका या प्रणालीशी जोडण्यात आलेल्या आहेत. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेले वितरण व्यवस्थेतील धान्य खासगी बाजारात विकले जात असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. धान्याच्या काळा बाजाराला आळा बसावा यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केले जात आहेत. संगणकीकरणाचा वापर केल्याने एका नागरिकाला एकच शिधापत्रिका मिळणे शक्य होईल. या संगणकीकृत यादीत मयत व्यक्तींच्या नावांची दुरूस्ती करता यावी, यासाठी राशन दुकानदारांमार्फत नव्याने अर्ज भरून घेतले जात आहेत. मुळ गावापासून दूर राहत असलेल्या व्यक्तीचे दोन ठिकाणी शिधापत्रिका असल्याचे अनेक प्रकरण आहेत. परंतु ‘डी डुप्लिकेशन’मुळे याची माहिती त्वरीत उपलब्ध होणार असून, असे दुहेरी कार्ड रद्द केले जाणार आहेत. राशन दुकानातील व्यवहाराने संगणकीकरण करण्यात येणार असून बारकोड असलेल्या शिधापत्रिका दिले जाणार आहे. बारकोडेड शिधापत्रिका तयार करण्यासाठी लाभार्थ्यांकडून एक अर्ज भरून घेतला जात आहे. या अर्जात आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक मागवले जाणार आहेत. हे अर्ज प्रत्येक राशन दुकानदार आणि ग्रामीण भागात तहसीलदारांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.दुहेरी शिधापत्रिकेला आळाआधार क्रमांकामुळे या प्रणालीत दुहेरी राशन कार्ड लगेच ओळखता येणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक प्रत्येक राशन कार्डधारकांना द्यावाच लागणार आहे. राशन दुकानांमध्ये आता बायोमेट्रिक पद्धतीने धान्य दिले, याची माहिती त्वरित उपलब्ध होईल. त्यामुळे धान्याची काळाबाजारी थांबेल. यामुळे धान्याची बचत होणार आहे.अर्जाची नि:शुल्क विक्रीरेशन कार्डधारकांना आधार कार्ड, बँक खात्याविषयी माहिती सादर करता यावी म्हणून शासनाकडून नि:शुल्क अर्ज स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जासाठी प्रत्येकी पाच रूपये दुकानदाराला शासनाकडून दिले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, असे असताना काही दुकानदारंकडून दोन रूपयांमध्ये अर्जाची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.बायोमेट्रिक प्रणालीने गैरप्रकाराला आळाधान्याची बचतसार्वजनिक राशन व्यवस्थेत बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात आल्यानंतर ३० टक्के धान्याची बचत होणार आहे. संगणकीकरणामुळे एकापेक्षा जास्त शिधापत्रिका असलेले बोगस शोधण्यास मदत मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्य होणार आहे.- अनिल बनसोड, जिल्हा पुरवठा अधिकारी