शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

जिल्ह्यात २६ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली; टीव्ही, फ्रीज, बाइक तरी मोफत रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संक्रमण काळात सर्वांनाच धान्य मिळावे यासाठी राज्य व केंद्र सरकारने कंबर कसली होती. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना संक्रमण काळात सर्वांनाच धान्य मिळावे यासाठी राज्य व केंद्र सरकारने कंबर कसली होती. मात्र यातही बीपीएलधारकांना कुठलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्ह्यात २६ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. अनेक बीपीएल कार्डधारकांनामध्ये श्रीमंतांचा भरणा असल्याचे दिसून आले आहे. टीव्ही, फ्रीज, बाइक यासह अन्य भौतिक सुविधा घरी असतानाही त्यांना मोफतचे रेशन मिळत आहे. किंबहुना सगळीच कुटुंब तसे नाहीत हातावर कमविणे व पानावर खाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र त्यांच्या भाग्यातले रेशन त्यांना मिळत नसल्याची ही खंत व्यक्त होत आहे. जिल्हा पुरवठा विभागाने यादीतील दोष दूर करून खऱ्या लाभार्थींना रेशन उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावाच घेतला नाही

जिल्ह्यात २६ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याचे कार्डधारकांवरून समजते. मात्र अनेकांकडे टीव्ही, फ्रीज, बाइक अशा सुविधा आहेत. खर्‍या अर्थाने दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावा घेण्यात आलेला नाही, याकडे लक्ष देण्यात येत नसल्यामुळे त्यामुळे ही समस्या उद‌्भवत आहे.

कोण गरीब, कोण श्रीमंत?

जिल्ह्यात ६५ हजार ३९० बीपीएलकार्डधारकांची संख्या आहे. मात्र यापैकी अनेकांकडे सोयी-सुविधा असल्यानंतर कोण गरीब, कोण श्रीमंत हा फरक दिसून येत नाही. अत्यंत गरीब गरजू लाभार्थींना त्यांना हक्काचे रेशन मिळणे दुरापास्त होत आहे. एकीकडे पाॅस मशीनवर धान्य वितरित करायचे आहे. दुसरीकडे यादीमध्ये गोंधळ असल्याने खऱ्या लाभार्थींची ओळख लपलेली आहे. त्यामुळे कोण गरीब आणि कोण श्रीमंत, असा प्रश्न आपसूकच निर्माण होत आहे.

जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या अधिक असतानाही त्यांना त्या प्रमाणात सोयी-सुविधा मिळत नाहीत. आजही अनेकांना नि:शुल्क रेशन घरकुल व अन्य शासकीय योजनांपासून वंचित आहेत. खऱ्या लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना योजनेचा लाभ देण्याची खरी गरज आहे. जिल्हा पुरवठा कार्यालय असो की तहसील कार्यालयातील अन्न व पुरवठा विभाग कधीच दिलेल्या कार्डाची परत शहानिशा करीत नाही. नूतनीकरण झाले की हात वर करण्यात आले.

दारिद्र्यरेषेखालीसाठीचे निकष काय?

n जिल्ह्यात ६५ हजारपेक्षा जास्त दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे घर किंवा त्यांचे उत्पन्न अत्यल्प आहे अशांना महसूल प्रशासन बीपीएल कार्ड देत असते. लाभार्थींनी केलेल्या अर्जानुसार व सर्वेक्षणाअंती हे कार्ड दिले जाते. मात्र काही श्रीमंतांनी पैशाच्या भरोशावर बीपीएल कार्ड प्राप्त केले आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कार्ड प्राप्त करणे यामागे निकष व उद्दिष्टाला हरताळ फासण्यात आला आहे.