शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जिल्ह्यात २६ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली; टीव्ही, फ्रीज, बाइक तरी मोफत रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संक्रमण काळात सर्वांनाच धान्य मिळावे यासाठी राज्य व केंद्र सरकारने कंबर कसली होती. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना संक्रमण काळात सर्वांनाच धान्य मिळावे यासाठी राज्य व केंद्र सरकारने कंबर कसली होती. मात्र यातही बीपीएलधारकांना कुठलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्ह्यात २६ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. अनेक बीपीएल कार्डधारकांनामध्ये श्रीमंतांचा भरणा असल्याचे दिसून आले आहे. टीव्ही, फ्रीज, बाइक यासह अन्य भौतिक सुविधा घरी असतानाही त्यांना मोफतचे रेशन मिळत आहे. किंबहुना सगळीच कुटुंब तसे नाहीत हातावर कमविणे व पानावर खाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र त्यांच्या भाग्यातले रेशन त्यांना मिळत नसल्याची ही खंत व्यक्त होत आहे. जिल्हा पुरवठा विभागाने यादीतील दोष दूर करून खऱ्या लाभार्थींना रेशन उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावाच घेतला नाही

जिल्ह्यात २६ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याचे कार्डधारकांवरून समजते. मात्र अनेकांकडे टीव्ही, फ्रीज, बाइक अशा सुविधा आहेत. खर्‍या अर्थाने दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावा घेण्यात आलेला नाही, याकडे लक्ष देण्यात येत नसल्यामुळे त्यामुळे ही समस्या उद‌्भवत आहे.

कोण गरीब, कोण श्रीमंत?

जिल्ह्यात ६५ हजार ३९० बीपीएलकार्डधारकांची संख्या आहे. मात्र यापैकी अनेकांकडे सोयी-सुविधा असल्यानंतर कोण गरीब, कोण श्रीमंत हा फरक दिसून येत नाही. अत्यंत गरीब गरजू लाभार्थींना त्यांना हक्काचे रेशन मिळणे दुरापास्त होत आहे. एकीकडे पाॅस मशीनवर धान्य वितरित करायचे आहे. दुसरीकडे यादीमध्ये गोंधळ असल्याने खऱ्या लाभार्थींची ओळख लपलेली आहे. त्यामुळे कोण गरीब आणि कोण श्रीमंत, असा प्रश्न आपसूकच निर्माण होत आहे.

जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या अधिक असतानाही त्यांना त्या प्रमाणात सोयी-सुविधा मिळत नाहीत. आजही अनेकांना नि:शुल्क रेशन घरकुल व अन्य शासकीय योजनांपासून वंचित आहेत. खऱ्या लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना योजनेचा लाभ देण्याची खरी गरज आहे. जिल्हा पुरवठा कार्यालय असो की तहसील कार्यालयातील अन्न व पुरवठा विभाग कधीच दिलेल्या कार्डाची परत शहानिशा करीत नाही. नूतनीकरण झाले की हात वर करण्यात आले.

दारिद्र्यरेषेखालीसाठीचे निकष काय?

n जिल्ह्यात ६५ हजारपेक्षा जास्त दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे घर किंवा त्यांचे उत्पन्न अत्यल्प आहे अशांना महसूल प्रशासन बीपीएल कार्ड देत असते. लाभार्थींनी केलेल्या अर्जानुसार व सर्वेक्षणाअंती हे कार्ड दिले जाते. मात्र काही श्रीमंतांनी पैशाच्या भरोशावर बीपीएल कार्ड प्राप्त केले आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कार्ड प्राप्त करणे यामागे निकष व उद्दिष्टाला हरताळ फासण्यात आला आहे.