शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

२५ शिक्षक अद्याप रुजू नाही

By admin | Updated: July 19, 2016 00:31 IST

जिल्हा परिषद शाळेतील ३७८ शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.

बदली प्रक्रियेचा घोळ अद्याप कायममोहन भोयर  तुमसरजिल्हा परिषद शाळेतील ३७८ शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. त्यापैकी २५ शिक्षक रुजू झाले नाही तर ३५ शिक्षक रुजू होऊन दिर्घ रजेवर गेले. अन्यायग्रस्त शिक्षकांची संख्या सुमारे ११९ इतकी आहे. ८ जुन २०१६ ला ग्रामविकास मंत्रालयाने सात जिल्ह्यातील बदल्यांना स्थगिती दिली. या जिल्ह्यात मात्र घोळ अद्याप कायम आहे. मागील २१ दिवसांपासुन जिल्ह्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरु आहे.जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत मे महिन्यात जिल्हास्तरीय जि.प. शिक्षकांच्या ३७६ बदल्या करण्यात आल्या. दरम्यान जिल्ह्यातील २५ शिक्षक रुजू झाले नाही. तर ३५ शिक्षक रुजू झाले नंतर ते दिर्घ रजेवर गेले. दरम्यान ८ जून २०१६ ला प्राथमिक शिक्षक प्रवर्गाच्या बदल्यांना सरसकट स्थगिती ग्रामविकास मंत्रालयाने दिली. ७ जिल्ह्यातील बदल्या स्थगित करण्याचे आदेश शासनाने काढले.सव्वा महिना लोटूनही जिल्हा परिषद प्रशासनाने आजपर्यंत स्थगिती आदेशावर कारवाई केली नाही. येथे जिल्हा परिषद प्रशासनाने स्थगितीबाबत वेगवेगळे अर्थ काढले. ११ जून ला शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी १३ जून ला निर्णय देण्याचे लेखी आश्वासन दिले, पंरतु त्या दिवशी ते स्वत: उपस्थित नव्हते. १४ जूनला स्थायी समितीमध्ये ८ जून २०१६ च्या शासनाच्या स्थगितीबाबत निर्णय घेऊन ठराव घेण्यात आला. तरीही कारवाई झाली नाही. बदल्या संदर्भात शासनाने विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. मागील आठवड्यात पुन्हा चार शिक्षकांना सोयीच्या शाळेत बदलीचे आदेश देण्यात आले. अंशत: बदल असा नविन शब्द येथे वापरण्यात आला.नक्षलग्रस्त तालुक्यातून नक्षलग्रस्त तालुक्यात बदली, प्रशासकीय बदलीस पात्र शिक्षकांना विनंती बदलीचा लाभ, अर्ज व प्रपत्र न देता, पती-पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत ३० किमीच्या अंतराला लक्षात न घेता. १०० ते १३० किमीवर बदली, अपंगाना बदलीतून न वगळणे, रिक्त जागा नसतांनी पदस्थापना देणे, नंतर अतिरिक्त ठरविणे, तालुका बदलून सोयीच्या स्थळी देणे इत्यादी प्रकार येथे झाला असा शिक्षकांचा आरोप आहे. काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १३ जून रोजी शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना पृष्ठांगण करुन उचित कारवाईकरिता आदेश निर्गमित केले.हेच स्थगितीचे आदेश असून सर्व शिक्षकांनी मूळ आस्थापनेत जायला पाहिजे होते असे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना भेटी दरम्यान सांगितले. या सर्व प्रकरणावरुन अद्याप येथे घोळ असून संभ्रमावस्था आजही कायम आहे.नक्षलग्रस्त ते नक्षलग्रस्त स्थळी सुमारे ७० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. येथे अन्यायग्रस्त शिक्षकांची संख्या ११९ इतकी आहे. शाळा सुरु होऊन २१ दिवस झाले. कुठे एक शिक्षक दोन ते चार वर्गांना तर कुठे दोन शिक्षक चार वर्गांना अध्यापनाचे कार्य करीत आहेत. जिल्हा परिषद शाळेत सध्या गोंधळाची स्थिती आहे.या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अ.वा. बुध्दे, दिलीप बावनकर, सुधीर वाघमारे, श्रावण लांजेवार, राधेश्याम आमकर, गुलाब आव्हाड, सी. पी. मोरे, देवदास भुते, शकून चौधरी, भारती डेकाटे, रेखा वैद्य, गुलाब बामलोटे, व्ही. मुकर्णे, एम. जिभकाटे, डी.पी. भिवगडे, डी. के. चकोले इत्यादी शिक्षकांनी केली आहे.