शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

२५ शिक्षक अद्याप रुजू नाही

By admin | Updated: July 19, 2016 00:31 IST

जिल्हा परिषद शाळेतील ३७८ शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.

बदली प्रक्रियेचा घोळ अद्याप कायममोहन भोयर  तुमसरजिल्हा परिषद शाळेतील ३७८ शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. त्यापैकी २५ शिक्षक रुजू झाले नाही तर ३५ शिक्षक रुजू होऊन दिर्घ रजेवर गेले. अन्यायग्रस्त शिक्षकांची संख्या सुमारे ११९ इतकी आहे. ८ जुन २०१६ ला ग्रामविकास मंत्रालयाने सात जिल्ह्यातील बदल्यांना स्थगिती दिली. या जिल्ह्यात मात्र घोळ अद्याप कायम आहे. मागील २१ दिवसांपासुन जिल्ह्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरु आहे.जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत मे महिन्यात जिल्हास्तरीय जि.प. शिक्षकांच्या ३७६ बदल्या करण्यात आल्या. दरम्यान जिल्ह्यातील २५ शिक्षक रुजू झाले नाही. तर ३५ शिक्षक रुजू झाले नंतर ते दिर्घ रजेवर गेले. दरम्यान ८ जून २०१६ ला प्राथमिक शिक्षक प्रवर्गाच्या बदल्यांना सरसकट स्थगिती ग्रामविकास मंत्रालयाने दिली. ७ जिल्ह्यातील बदल्या स्थगित करण्याचे आदेश शासनाने काढले.सव्वा महिना लोटूनही जिल्हा परिषद प्रशासनाने आजपर्यंत स्थगिती आदेशावर कारवाई केली नाही. येथे जिल्हा परिषद प्रशासनाने स्थगितीबाबत वेगवेगळे अर्थ काढले. ११ जून ला शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी १३ जून ला निर्णय देण्याचे लेखी आश्वासन दिले, पंरतु त्या दिवशी ते स्वत: उपस्थित नव्हते. १४ जूनला स्थायी समितीमध्ये ८ जून २०१६ च्या शासनाच्या स्थगितीबाबत निर्णय घेऊन ठराव घेण्यात आला. तरीही कारवाई झाली नाही. बदल्या संदर्भात शासनाने विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. मागील आठवड्यात पुन्हा चार शिक्षकांना सोयीच्या शाळेत बदलीचे आदेश देण्यात आले. अंशत: बदल असा नविन शब्द येथे वापरण्यात आला.नक्षलग्रस्त तालुक्यातून नक्षलग्रस्त तालुक्यात बदली, प्रशासकीय बदलीस पात्र शिक्षकांना विनंती बदलीचा लाभ, अर्ज व प्रपत्र न देता, पती-पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत ३० किमीच्या अंतराला लक्षात न घेता. १०० ते १३० किमीवर बदली, अपंगाना बदलीतून न वगळणे, रिक्त जागा नसतांनी पदस्थापना देणे, नंतर अतिरिक्त ठरविणे, तालुका बदलून सोयीच्या स्थळी देणे इत्यादी प्रकार येथे झाला असा शिक्षकांचा आरोप आहे. काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १३ जून रोजी शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना पृष्ठांगण करुन उचित कारवाईकरिता आदेश निर्गमित केले.हेच स्थगितीचे आदेश असून सर्व शिक्षकांनी मूळ आस्थापनेत जायला पाहिजे होते असे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना भेटी दरम्यान सांगितले. या सर्व प्रकरणावरुन अद्याप येथे घोळ असून संभ्रमावस्था आजही कायम आहे.नक्षलग्रस्त ते नक्षलग्रस्त स्थळी सुमारे ७० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. येथे अन्यायग्रस्त शिक्षकांची संख्या ११९ इतकी आहे. शाळा सुरु होऊन २१ दिवस झाले. कुठे एक शिक्षक दोन ते चार वर्गांना तर कुठे दोन शिक्षक चार वर्गांना अध्यापनाचे कार्य करीत आहेत. जिल्हा परिषद शाळेत सध्या गोंधळाची स्थिती आहे.या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अ.वा. बुध्दे, दिलीप बावनकर, सुधीर वाघमारे, श्रावण लांजेवार, राधेश्याम आमकर, गुलाब आव्हाड, सी. पी. मोरे, देवदास भुते, शकून चौधरी, भारती डेकाटे, रेखा वैद्य, गुलाब बामलोटे, व्ही. मुकर्णे, एम. जिभकाटे, डी.पी. भिवगडे, डी. के. चकोले इत्यादी शिक्षकांनी केली आहे.