शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

अविरोध निवडणूक करणाऱ्या गावांना २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:01 IST

मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. त्यात ताडगाव, सालई खुर्द, भिकारखेडा, पिंपळगाव, रोहा, पारडी, कान्हळगाव (सिर), मांडेसर, दहेगाव, पिंपळगाव (कान्ह.), पाचगाव, पाहुणी, देव्हाडी (बुज.), पांजराबोरी, जांभोरा, केसलवाडा, खडकी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ठळक मुद्देअभिनव योजना : आमदार विकास निधीतून राजू कारेमोरे देणार निधी

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : निवडणूक म्हटली की गट-तट आलेच. एकमेकांवर कुरघोडी केली जाते. निवडणुकीच्या काळात गावात सरळ दोन गट निर्माण होतात. त्यातून वादाचे प्रसंगही येतात. अनेक गावात यातून वैमनस्य वाढीला येते. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आणि गावागावांत एकोपा नांदण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी पुढाकार घेतला आहे. ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध होईल त्या गावाला आपल्या विकासनिधीतून प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. त्यात ताडगाव, सालई खुर्द, भिकारखेडा, पिंपळगाव, रोहा, पारडी, कान्हळगाव (सिर), मांडेसर, दहेगाव, पिंपळगाव (कान्ह.), पाचगाव, पाहुणी, देव्हाडी (बुज.), पांजराबोरी, जांभोरा, केसलवाडा, खडकी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आरक्षण सोडत झाल्यापासून निवडणुकीचा ज्वर चढला आहे. लवकरच या गावात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. गावखेड्यातील राजकारण म्हणजे टोकाचे असते. गावाच्या विकासासाठी कमी आणि प्रतिष्ठेसाठीच अधिक निवडणूका लढल्या जातात. यामुळे गावात वाद होऊन विकास खोळंबतो.हा प्रकार टाळण्यासाठी आणि गावाचा विकास व्हावा यासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी - तुमसर तालुक्यात अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करणाºया गावांना आमदार विकास निधीतून सात ते २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार कारेमोरे यांनी केली आहे. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला ११ लाख, ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला १५ लाख, १५ आणि १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये प्राधान्याने विकास निधी दिला जाणार आहे. तसेच गावातील एखादा प्रभाग अविरोध झाल्यास त्याला तीन लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.यामुळे गावात अविरोध निवडणुकीसाठी नागरिकांना प्रेरणा मिळणार आहे. गावातील गट-तट संपुष्टात येऊन गावात ऐक्याचे वातावरण निर्माण होईल.जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच उपक्रमभंडारा जिल्ह्याच्या इतिहासात असा नाविण्य उपक्रम आमदार राजू कारेमोरे राबवित आहेत. गावाच्या विकासाला चालना देणारा हा उपक्रम असून यामुळे गावात एकतेची शक्ती वाढणार आहे. सामंजस्यातून ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून येतील. त्यामुळे कोणतेही गट-तट गावात राहणार नाहीत. गावाची ओळख आदर्श गाव म्हणून होण्यास वेळ लागणार नाही.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतून आदर्श गाव निर्मितीची चळवळ सुरु व्हावी, असा माझा प्रयत्न आहे. विकासनिधी मतदार संघातील गावांना दिला जातो. परंतु अविरोध निवडणूक होणाºया गावांना प्राधान्याने विकास निधी दिला जाईल. एकता व आदर्श निर्माण व्हावी हे माझे स्वप्न असून ते साकार करण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व तालुक्यातील जनता याला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.-राजू कारेमोरे, आमदार तुमसर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक