शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

२५ कोटींची पाणीपुरवठा योजना भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST

२० वर्षे लागली पूर्णत्वाकरिता : २५ कोटींची योजना मोहन भोयर तुमसर : गोबरवाही प्रादेशिक विस्तारित पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वाकरिता २० ...

२० वर्षे लागली पूर्णत्वाकरिता : २५ कोटींची योजना

मोहन भोयर

तुमसर : गोबरवाही प्रादेशिक विस्तारित पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वाकरिता २० वर्षे लागली. २२ वर्षांपूर्वी या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. २५ कोटींची योजना सध्या भंगारात निघाली असून २१ गावांतील नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. नियोजनाअभावी महत्त्वाकांक्षी योजना लोकार्पणानंतरही यशस्वी झाली नाही.

बावनथडी धरणाला संलग्नित गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन २२ वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. गोबरवाही परिसरातील २१ गावांतील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता ही योजना तयार करण्याचे ठरविले होते. सदर योजना पूर्ण करण्याकरिता सुमारे वीस वर्षे लागली परंतु अद्यापही नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. सुमारे २५ कोटी रुपये या योजनेवर खर्च करण्यात आले. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेचे लोकार्पण केले होते.

या योजनेची मशीन्स, मोटरपंप, जलशुद्धीकरण यंत्र धूळखात पडून आहेत. अनेक साहित्यांना जंग लागला आहे. संपूर्ण पाणीपुरवठा योजना भंगारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियोजनाअभावी महत्त्वाकांक्षी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अशीच रखडलेली राहणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बावनथडी धरणावर ही योजना तयार करण्यात आली. वर्षभर मुबलक पाणी या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना मिळणार आहे परंतु सदर योजना पूर्ण झाल्यानंतरही कार्यान्वित का होत नाही, हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या उदात्त हेतूने ही योजना राबविण्यात आली. शासनाचाही हाच हेतू आहे परंतु एक चांगली योजना येथे रखडली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हस्तांतरण करावे

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली आहे. परंतु हस्तांतरणाअभावी ही योजना रखडल्याची माहिती आहे. पाणीपुरवठा योजनेला सुरू करण्याअगोदर ती कुणी चालवावी याचे नियोजन झाले नव्हते. योजना पूर्णत्वानंतर सदर योजना कुणी चालवावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने येथे २५ कोटी रुपये खर्च केले परंतु या अद्यापही लाभ होत नाही. त्यामुळे नागरिक पाण्यापासून वंचित राहिले असून नागरिकांमध्ये असंतोष आहे. या योजनेबाबत निर्णय तात्काळ घेण्याची गरज आहे.

गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वास २० वर्ष लागली. येथील मशीनरी विस्कळीत झाली असून सदर मशीनचे मेेन्टेनन्स करण्याची गरज आहे. संबंधित विभागाला ही योजना हस्तांतरित करून सुरळीत चालवावी, अशी आमदार राजू कारेमोरे यांची मागणी आहे.