शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

२५ कोटींची पाणीपुरवठा योजना भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST

२० वर्षे लागली पूर्णत्वाकरिता : २५ कोटींची योजना मोहन भोयर तुमसर : गोबरवाही प्रादेशिक विस्तारित पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वाकरिता २० ...

२० वर्षे लागली पूर्णत्वाकरिता : २५ कोटींची योजना

मोहन भोयर

तुमसर : गोबरवाही प्रादेशिक विस्तारित पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वाकरिता २० वर्षे लागली. २२ वर्षांपूर्वी या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. २५ कोटींची योजना सध्या भंगारात निघाली असून २१ गावांतील नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. नियोजनाअभावी महत्त्वाकांक्षी योजना लोकार्पणानंतरही यशस्वी झाली नाही.

बावनथडी धरणाला संलग्नित गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन २२ वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. गोबरवाही परिसरातील २१ गावांतील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता ही योजना तयार करण्याचे ठरविले होते. सदर योजना पूर्ण करण्याकरिता सुमारे वीस वर्षे लागली परंतु अद्यापही नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. सुमारे २५ कोटी रुपये या योजनेवर खर्च करण्यात आले. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेचे लोकार्पण केले होते.

या योजनेची मशीन्स, मोटरपंप, जलशुद्धीकरण यंत्र धूळखात पडून आहेत. अनेक साहित्यांना जंग लागला आहे. संपूर्ण पाणीपुरवठा योजना भंगारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियोजनाअभावी महत्त्वाकांक्षी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अशीच रखडलेली राहणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बावनथडी धरणावर ही योजना तयार करण्यात आली. वर्षभर मुबलक पाणी या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना मिळणार आहे परंतु सदर योजना पूर्ण झाल्यानंतरही कार्यान्वित का होत नाही, हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या उदात्त हेतूने ही योजना राबविण्यात आली. शासनाचाही हाच हेतू आहे परंतु एक चांगली योजना येथे रखडली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हस्तांतरण करावे

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली आहे. परंतु हस्तांतरणाअभावी ही योजना रखडल्याची माहिती आहे. पाणीपुरवठा योजनेला सुरू करण्याअगोदर ती कुणी चालवावी याचे नियोजन झाले नव्हते. योजना पूर्णत्वानंतर सदर योजना कुणी चालवावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने येथे २५ कोटी रुपये खर्च केले परंतु या अद्यापही लाभ होत नाही. त्यामुळे नागरिक पाण्यापासून वंचित राहिले असून नागरिकांमध्ये असंतोष आहे. या योजनेबाबत निर्णय तात्काळ घेण्याची गरज आहे.

गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वास २० वर्ष लागली. येथील मशीनरी विस्कळीत झाली असून सदर मशीनचे मेेन्टेनन्स करण्याची गरज आहे. संबंधित विभागाला ही योजना हस्तांतरित करून सुरळीत चालवावी, अशी आमदार राजू कारेमोरे यांची मागणी आहे.