शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटींची पाणीपुरवठा योजना भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST

२० वर्षे लागली पूर्णत्वाकरिता : २५ कोटींची योजना मोहन भोयर तुमसर : गोबरवाही प्रादेशिक विस्तारित पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वाकरिता २० ...

२० वर्षे लागली पूर्णत्वाकरिता : २५ कोटींची योजना

मोहन भोयर

तुमसर : गोबरवाही प्रादेशिक विस्तारित पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वाकरिता २० वर्षे लागली. २२ वर्षांपूर्वी या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. २५ कोटींची योजना सध्या भंगारात निघाली असून २१ गावांतील नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. नियोजनाअभावी महत्त्वाकांक्षी योजना लोकार्पणानंतरही यशस्वी झाली नाही.

बावनथडी धरणाला संलग्नित गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन २२ वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. गोबरवाही परिसरातील २१ गावांतील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता ही योजना तयार करण्याचे ठरविले होते. सदर योजना पूर्ण करण्याकरिता सुमारे वीस वर्षे लागली परंतु अद्यापही नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. सुमारे २५ कोटी रुपये या योजनेवर खर्च करण्यात आले. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेचे लोकार्पण केले होते.

या योजनेची मशीन्स, मोटरपंप, जलशुद्धीकरण यंत्र धूळखात पडून आहेत. अनेक साहित्यांना जंग लागला आहे. संपूर्ण पाणीपुरवठा योजना भंगारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियोजनाअभावी महत्त्वाकांक्षी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अशीच रखडलेली राहणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बावनथडी धरणावर ही योजना तयार करण्यात आली. वर्षभर मुबलक पाणी या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना मिळणार आहे परंतु सदर योजना पूर्ण झाल्यानंतरही कार्यान्वित का होत नाही, हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या उदात्त हेतूने ही योजना राबविण्यात आली. शासनाचाही हाच हेतू आहे परंतु एक चांगली योजना येथे रखडली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हस्तांतरण करावे

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली आहे. परंतु हस्तांतरणाअभावी ही योजना रखडल्याची माहिती आहे. पाणीपुरवठा योजनेला सुरू करण्याअगोदर ती कुणी चालवावी याचे नियोजन झाले नव्हते. योजना पूर्णत्वानंतर सदर योजना कुणी चालवावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने येथे २५ कोटी रुपये खर्च केले परंतु या अद्यापही लाभ होत नाही. त्यामुळे नागरिक पाण्यापासून वंचित राहिले असून नागरिकांमध्ये असंतोष आहे. या योजनेबाबत निर्णय तात्काळ घेण्याची गरज आहे.

गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वास २० वर्ष लागली. येथील मशीनरी विस्कळीत झाली असून सदर मशीनचे मेेन्टेनन्स करण्याची गरज आहे. संबंधित विभागाला ही योजना हस्तांतरित करून सुरळीत चालवावी, अशी आमदार राजू कारेमोरे यांची मागणी आहे.