शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

सिंचन प्रकल्पांत २२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:03 IST

अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही. आगामी काळातील टंचाई लक्षात घेता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी व चारापिकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यासाठी धोक्याची घंटा : जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात आठ दलघमी पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही. आगामी काळातील टंचाई लक्षात घेता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी व चारापिकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण ६३ प्रकल्प आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बपेरा, मोहाडी तालुक्यातील टेकेपार बोथली आणि सोरणा हे चार मध्यम प्रकल्प आहे तर ३१ लघु प्रकल्प असून २८ माजी मालगुजारी तलाव आहे. चांदपूर प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पीत जलसाठा २८.८७ दलघमी असून सध्या याप्रकल्पात ७.४० दलघमी साठा आहे. तर बपेरा, टेकेपार बोथली आणि सोरर्णा या प्रकल्पात केवळ मृत जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पात दुप्पट म्हणजे १५.८३ टक्के जलसाठा होता. यावर्षी पडलेल्या अपुºया पावसाने पुर्णक्षमतेने प्रकल्प भरले नाहीत.जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्प क्षमता ५३.५४ दशलक्ष दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात १२.९८ दलघमी उपयुक्त जलसाठा असून २४.२५ दलघमी मृतसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठ्याचे टक्केवारी १२.९८ आहे. २८ माजी मालगुजारी तलावांची प्रकल्पीय संकल्पीत क्षमता २५.३८ दलघमी असून सध्या या प्रकल्पात ५.९१ दलघमी म्हणजे २३.२९ टक्के जलसाठा आहे.या प्रकल्पातील अपुºया जलसाठ्याचा परिणामी उन्हाळी पिकांवर होणार आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडले जाणार नाही. सर्व पाणी पिण्यासाठी आणि चारापिकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासून पाण्याचा वापर जपून करण्याची गरज आहे.पाच वर्षांपासून घटतोय जलसाठाधान उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असून निसर्गाच्या भरोशावर अवलंबून आहे. मात्र गत पाच वर्षाचा तुलनात्मक अभ्यास केला असता दरवर्षी पावसाचे आणि परिणामी जलसाठ्याचे प्रमाण कमी होत आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ८१.६५ टक्के जलसाठा होता. २०१५ मध्ये निचांकी पातळीला जावून १८.५५ टक्के, २०१६ मध्ये २३.२६ टक्के आणि २०१७ मध्ये ४३.७५ टक्के जलसाठा होता. मात्र गत पावसाळ्यात अपुरा पाऊस झाल्याने सध्या प्रकल्पात २२.१८ टक्के जलसाठा आहे.