शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांत २२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:03 IST

अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही. आगामी काळातील टंचाई लक्षात घेता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी व चारापिकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यासाठी धोक्याची घंटा : जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात आठ दलघमी पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही. आगामी काळातील टंचाई लक्षात घेता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी व चारापिकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण ६३ प्रकल्प आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बपेरा, मोहाडी तालुक्यातील टेकेपार बोथली आणि सोरणा हे चार मध्यम प्रकल्प आहे तर ३१ लघु प्रकल्प असून २८ माजी मालगुजारी तलाव आहे. चांदपूर प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पीत जलसाठा २८.८७ दलघमी असून सध्या याप्रकल्पात ७.४० दलघमी साठा आहे. तर बपेरा, टेकेपार बोथली आणि सोरर्णा या प्रकल्पात केवळ मृत जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पात दुप्पट म्हणजे १५.८३ टक्के जलसाठा होता. यावर्षी पडलेल्या अपुºया पावसाने पुर्णक्षमतेने प्रकल्प भरले नाहीत.जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्प क्षमता ५३.५४ दशलक्ष दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात १२.९८ दलघमी उपयुक्त जलसाठा असून २४.२५ दलघमी मृतसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठ्याचे टक्केवारी १२.९८ आहे. २८ माजी मालगुजारी तलावांची प्रकल्पीय संकल्पीत क्षमता २५.३८ दलघमी असून सध्या या प्रकल्पात ५.९१ दलघमी म्हणजे २३.२९ टक्के जलसाठा आहे.या प्रकल्पातील अपुºया जलसाठ्याचा परिणामी उन्हाळी पिकांवर होणार आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडले जाणार नाही. सर्व पाणी पिण्यासाठी आणि चारापिकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासून पाण्याचा वापर जपून करण्याची गरज आहे.पाच वर्षांपासून घटतोय जलसाठाधान उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असून निसर्गाच्या भरोशावर अवलंबून आहे. मात्र गत पाच वर्षाचा तुलनात्मक अभ्यास केला असता दरवर्षी पावसाचे आणि परिणामी जलसाठ्याचे प्रमाण कमी होत आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ८१.६५ टक्के जलसाठा होता. २०१५ मध्ये निचांकी पातळीला जावून १८.५५ टक्के, २०१६ मध्ये २३.२६ टक्के आणि २०१७ मध्ये ४३.७५ टक्के जलसाठा होता. मात्र गत पावसाळ्यात अपुरा पाऊस झाल्याने सध्या प्रकल्पात २२.१८ टक्के जलसाठा आहे.