शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

महामार्गावरील २१९ मदिरालये बंद

By admin | Updated: April 2, 2017 00:20 IST

राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर ५०० मीटरच्या आत असलेले देशी व विदेशी दारूची दुकाने हटविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भंडारा जिल्ह्यातील २४९ पैकी २१९ दारूची दुकाने बंद झाली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका : बारबंदीमुळे तळीराम झाले सैरभैरभंडारा : राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर ५०० मीटरच्या आत असलेले देशी व विदेशी दारूची दुकाने हटविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भंडारा जिल्ह्यातील २४९ पैकी २१९ दारूची दुकाने बंद झाली आहेत. या महामार्गापासून लांब अंतरावर असलेल्या ३० दुकानांना या निर्णयाचा फटका बसलेला नाही. दरम्यान, महामार्गावरील दारू दुकानांमधील मद्यपिंची दररोजची वर्दळ थांबल्याचे चित्र दिसून आले आहे.महामार्गावर असलेल्या दारू विक्रीच्या दुकानांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातात जीवितहाणीची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. हा निष्कर्ष न्यायालयात पोहोचल्यानंतर सर्वोच न्यायालयाने डिसेंबर २०१६ मध्ये राष्ट्रीय व राज्य मार्गावरील ५०० मीटरच्या आत असलेले देशी-विदेशी दारूचे दुकाने हटविण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी होत ३१ मार्चपासून हे दुकाने बंद झाली आहेत.भंडारा जिल्ह्यात देशी दारूची किरकोळ विक्रीची ६९ दुकाने, ०७ वाईन शॉप, १५१ बार व परमीटरूम आणि २२ बिअर शॉपी असे एकूण २४९ दुकाने आहेत. या आदेशामुळे देशी दारूची किरकोळ विक्रीची ४९ दुकाने, ०७ वाईन शॉप, १४४ बार व परमीटरूम आणि १९ बिअर शॉपी असे एकूण २१९ दुकाने बंद झाली आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या डिसेंबर महिन्यातील आदेशानंतर राज्य सरकारने उत्पादन शुल्क विभागाला सर्व्हेक्षण करून जिल्हास्तरीय अहवाल मागितला होता. त्यानंतर भंडारा जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यात किती राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग आहेत, या महामार्गाचा क्रमांक कोणता आणि नकाशा यासह माहिती मागितली होती. बांधकाम विभागाच्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाने हा अहवाल शासनाकडे पाठविला होता.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भंडारा जिल्ह्यातील महामार्गावर असलेले ६५ टक्के दुकाने असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या आशयाचे वृत्त ५ जानेवारी रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. परंतु प्रत्यक्षात अंतिम अहवालाअंती जिल्ह्यात ८८ टक्के दारूची दुकाने महामार्गावर असल्याचे आजच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)बीअरबारला टाळे ; तळीरामांची फजितीमोहाडी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने देशातील महामार्गावरील दारू दुकाने १ एप्रिलपासून बंद झाले आहेत. मोहाडी येथीलही चार बीअर बार व दोन देशी दारूची दुकाने बंद असल्याचे चित्र दिसून आले. मात्र काही बिअरबारमध्ये मागच्या दारातून लपूनछपून दारू विक्री सुरू होती. काही विशिष्ट व्यक्तींच्या घरूनसुद्धा तळीरामांना दारू विकण्यात आल्याची मोहाडीत चर्चा होती. मात्र याकडे पोलीस किंवा दारूबंदी विभागाचे अधिकारी फिरकले नाहीत. मोहाडी येथे भंडारा-तुमसर राज्य महामार्गाला लागूनच थोड्याथोड्या अंतरावर चार बीअर बार तर मोहाडी आंधळगाव राज्य मार्गावर दोन देशी दारूची दुकाने आहेत. त्यांना आता ५०० मीटर अंतराच्या दूर दुकान सुरू करता येणार असल्यामुळे त्यादिशेने त्या दारू दुकानदारांची धावपळ सुरू आहे. दारू दुकानातील शिल्लक साठा विकण्यासाठी क्लृप्त्या लढविण्यात येत आहे. बहुतांश बार मालकाकडे साठा असताना त्यांनी उत्पादन शुल्क विभागाला अल्प साठा असल्याचे सांगून मागच्या दाराने विकण्याचे कामे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)तळीरामांची उडाली झोपलाखनी : सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गालगतचे बीअर बार, बीअर शॉपी व देशी दारूच्या दुकानांना सील करण्यात आले. त्यामुळे तळीरामांची झोप उडाली असून अन्य पर्यायांच्या शोधात तळीराम शनिवारला दिवसभर भटकताना दिसून आले.१ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत ३१ मार्चच्या मध्यरात्री पासून बीअर बार, बीअर शॉपी व देशी दारू दुकानाला सील लावल्यामुळे तळीरामांची पंचाईत झाली आहे.लाखनी परिसरात मार्गालगत १५ बीअर, शॉपी व देशी दारू दुकाने असून ते बंद असल्याने तळीरामांचे जिथे कुठे मिळेल म्हणून एकमेकांना विचारताना दिसून आले असून मोहफुलाच्या दारूसह मिळेल त्या पर्यायाच्या शोधात भटकताना दिसून आले. (शहर प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्याच्या हद्दीत येणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतील २४९ पैकी २१९ दारूची दुकाने ३१ मार्चपासून बंद झाली आहेत. -सुरेंद्र मनपिया, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग भंडारा.