शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पवनी तालुक्यात पाच वर्षांत २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 4, 2015 00:05 IST

दरवर्षीच्या नापिकी व कर्जाच्या वाढत्या भारामुळे पवनी तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत.

निश्चित मेश्राम पालोरा (पवनी)दरवर्षीच्या नापिकी व कर्जाच्या वाढत्या भारामुळे पवनी तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. धान पिकाला मिळणारा अत्यल्प भाव व लागणारा खर्च जास्त असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाकडून तोंडाला पाने पुसण्यासारखी अल्प मदत मिळत आहे. पवनी तालुक्यात मागील पाच वर्षात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात १० शेतकरी पात्र तर ११ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून ओळख आहे. या भागातील शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्यामुळे बारमाही पिक घेतले जाते. येथील शेतकरी सधन आहे. मागील पाच वर्षापासून वरून राजाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे. विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. पिकाची मातीमोल दराने विक्री करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी विविध बँक, सोसायट्या, पतसंस्थांचे कर्ज घेतले आहे. आज ना उद्या पीक हातात येईल म्हणून घरी होते नव्हते कर्ज काढून पीक घेत आहेत. मात्र अपयश शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. पवनी तालुक्यात पाच वर्षात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात ११ लाभार्थी अपात्र तर १० लाभार्थी पात्र ठरले आहेत. यात प्रवीण कावळे कुर्झा, सूर्यभान पचारे रुयाळ, सखाराम कावळे मोहरी, गोविंदा वैरागडे चिचाळ, रविंद्र बावनकर आसगाव, बालकदास खोब्रागडे मांगली, चिंदू पायदलवार इटगाव, सदाराम नखाते चिचाळ, मनोहर मस्के कुर्झा, मुरलीधर इटगाव, मोहन समर्थ वलनी हे शेतकरी शासन नियमाप्रमाणे अपात्र ठरले आहेत. सोसायटी कर्जाचे नोटीस घरी पाठवित असल्यामुळे कर्ज कसे फेडायचे, मुलीचे लग्न, शिक्षणाचा खर्च आदी चिंतेने शेतकरी त्रस्त झाला आहेत. दिवसेंदिवस खत, औषधीचे किमती वाढत आहेत. मात्र मालाला मिळणारा अल्प भावाने शेती करणे न परवडणारे झाले आहे. आज ना उद्या पीक हातात येईल म्हणून शेतकरी रात्रंदिवस राबत आहे.