शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पवनी तालुक्यात पाच वर्षांत २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 4, 2015 00:05 IST

दरवर्षीच्या नापिकी व कर्जाच्या वाढत्या भारामुळे पवनी तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत.

निश्चित मेश्राम पालोरा (पवनी)दरवर्षीच्या नापिकी व कर्जाच्या वाढत्या भारामुळे पवनी तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. धान पिकाला मिळणारा अत्यल्प भाव व लागणारा खर्च जास्त असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाकडून तोंडाला पाने पुसण्यासारखी अल्प मदत मिळत आहे. पवनी तालुक्यात मागील पाच वर्षात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात १० शेतकरी पात्र तर ११ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून ओळख आहे. या भागातील शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्यामुळे बारमाही पिक घेतले जाते. येथील शेतकरी सधन आहे. मागील पाच वर्षापासून वरून राजाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे. विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. पिकाची मातीमोल दराने विक्री करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी विविध बँक, सोसायट्या, पतसंस्थांचे कर्ज घेतले आहे. आज ना उद्या पीक हातात येईल म्हणून घरी होते नव्हते कर्ज काढून पीक घेत आहेत. मात्र अपयश शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. पवनी तालुक्यात पाच वर्षात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात ११ लाभार्थी अपात्र तर १० लाभार्थी पात्र ठरले आहेत. यात प्रवीण कावळे कुर्झा, सूर्यभान पचारे रुयाळ, सखाराम कावळे मोहरी, गोविंदा वैरागडे चिचाळ, रविंद्र बावनकर आसगाव, बालकदास खोब्रागडे मांगली, चिंदू पायदलवार इटगाव, सदाराम नखाते चिचाळ, मनोहर मस्के कुर्झा, मुरलीधर इटगाव, मोहन समर्थ वलनी हे शेतकरी शासन नियमाप्रमाणे अपात्र ठरले आहेत. सोसायटी कर्जाचे नोटीस घरी पाठवित असल्यामुळे कर्ज कसे फेडायचे, मुलीचे लग्न, शिक्षणाचा खर्च आदी चिंतेने शेतकरी त्रस्त झाला आहेत. दिवसेंदिवस खत, औषधीचे किमती वाढत आहेत. मात्र मालाला मिळणारा अल्प भावाने शेती करणे न परवडणारे झाले आहे. आज ना उद्या पीक हातात येईल म्हणून शेतकरी रात्रंदिवस राबत आहे.