शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पवनी तालुक्यात पाच वर्षांत २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 4, 2015 00:05 IST

दरवर्षीच्या नापिकी व कर्जाच्या वाढत्या भारामुळे पवनी तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत.

निश्चित मेश्राम पालोरा (पवनी)दरवर्षीच्या नापिकी व कर्जाच्या वाढत्या भारामुळे पवनी तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. धान पिकाला मिळणारा अत्यल्प भाव व लागणारा खर्च जास्त असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाकडून तोंडाला पाने पुसण्यासारखी अल्प मदत मिळत आहे. पवनी तालुक्यात मागील पाच वर्षात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात १० शेतकरी पात्र तर ११ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून ओळख आहे. या भागातील शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्यामुळे बारमाही पिक घेतले जाते. येथील शेतकरी सधन आहे. मागील पाच वर्षापासून वरून राजाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे. विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. पिकाची मातीमोल दराने विक्री करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी विविध बँक, सोसायट्या, पतसंस्थांचे कर्ज घेतले आहे. आज ना उद्या पीक हातात येईल म्हणून घरी होते नव्हते कर्ज काढून पीक घेत आहेत. मात्र अपयश शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. पवनी तालुक्यात पाच वर्षात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात ११ लाभार्थी अपात्र तर १० लाभार्थी पात्र ठरले आहेत. यात प्रवीण कावळे कुर्झा, सूर्यभान पचारे रुयाळ, सखाराम कावळे मोहरी, गोविंदा वैरागडे चिचाळ, रविंद्र बावनकर आसगाव, बालकदास खोब्रागडे मांगली, चिंदू पायदलवार इटगाव, सदाराम नखाते चिचाळ, मनोहर मस्के कुर्झा, मुरलीधर इटगाव, मोहन समर्थ वलनी हे शेतकरी शासन नियमाप्रमाणे अपात्र ठरले आहेत. सोसायटी कर्जाचे नोटीस घरी पाठवित असल्यामुळे कर्ज कसे फेडायचे, मुलीचे लग्न, शिक्षणाचा खर्च आदी चिंतेने शेतकरी त्रस्त झाला आहेत. दिवसेंदिवस खत, औषधीचे किमती वाढत आहेत. मात्र मालाला मिळणारा अल्प भावाने शेती करणे न परवडणारे झाले आहे. आज ना उद्या पीक हातात येईल म्हणून शेतकरी रात्रंदिवस राबत आहे.