शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

पवनी तालुक्यात पाच वर्षांत २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 4, 2015 00:05 IST

दरवर्षीच्या नापिकी व कर्जाच्या वाढत्या भारामुळे पवनी तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत.

निश्चित मेश्राम पालोरा (पवनी)दरवर्षीच्या नापिकी व कर्जाच्या वाढत्या भारामुळे पवनी तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. धान पिकाला मिळणारा अत्यल्प भाव व लागणारा खर्च जास्त असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाकडून तोंडाला पाने पुसण्यासारखी अल्प मदत मिळत आहे. पवनी तालुक्यात मागील पाच वर्षात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात १० शेतकरी पात्र तर ११ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून ओळख आहे. या भागातील शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्यामुळे बारमाही पिक घेतले जाते. येथील शेतकरी सधन आहे. मागील पाच वर्षापासून वरून राजाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे. विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. पिकाची मातीमोल दराने विक्री करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी विविध बँक, सोसायट्या, पतसंस्थांचे कर्ज घेतले आहे. आज ना उद्या पीक हातात येईल म्हणून घरी होते नव्हते कर्ज काढून पीक घेत आहेत. मात्र अपयश शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. पवनी तालुक्यात पाच वर्षात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात ११ लाभार्थी अपात्र तर १० लाभार्थी पात्र ठरले आहेत. यात प्रवीण कावळे कुर्झा, सूर्यभान पचारे रुयाळ, सखाराम कावळे मोहरी, गोविंदा वैरागडे चिचाळ, रविंद्र बावनकर आसगाव, बालकदास खोब्रागडे मांगली, चिंदू पायदलवार इटगाव, सदाराम नखाते चिचाळ, मनोहर मस्के कुर्झा, मुरलीधर इटगाव, मोहन समर्थ वलनी हे शेतकरी शासन नियमाप्रमाणे अपात्र ठरले आहेत. सोसायटी कर्जाचे नोटीस घरी पाठवित असल्यामुळे कर्ज कसे फेडायचे, मुलीचे लग्न, शिक्षणाचा खर्च आदी चिंतेने शेतकरी त्रस्त झाला आहेत. दिवसेंदिवस खत, औषधीचे किमती वाढत आहेत. मात्र मालाला मिळणारा अल्प भावाने शेती करणे न परवडणारे झाले आहे. आज ना उद्या पीक हातात येईल म्हणून शेतकरी रात्रंदिवस राबत आहे.