शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकऱ्यांना २१ कोटी ९९ लाखांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ हजार २३ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले होते. त्यानुसार तालुक्यातील ४ हजार ८६३ ...

शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ हजार २३ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले होते. त्यानुसार तालुक्यातील ४ हजार ८६३ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊन ४ हजार ७९४ शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण झाले आहे. या प्रमाणिकरणाअंतर्गत ४ हजार ७२० शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तर ७४ शेतकऱ्यांचे अद्यापही प्रमाणिकरण होणे शिल्लक आहे. तालुक्यात कर्जमुक्तीचा लाभ झालेेल्या ४ हजार ७२० शेतकऱ्यांपैकी ४ हजार ७०४ शेतकऱ्यांनी सुमारे २१ कोटी ९९ लाख रुपयांच्या कर्जमुक्तीला मान्यता दर्शविली आहे. तर केवळ १६ शेतकऱ्यांनी या कर्जमुक्तीला विविध कारणांनी अमान्यता दर्शविली आहे. कर्जमुक्ती योजनेच्या काही वर्षांपूर्वी कृषी पीककर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना थकीत कर्जाची परतफेड सुलभ व्हावी म्हणून रूपांतरित योजना राबवित थकीत कर्जाचे हप्ते पाडण्यात आले. हप्ते दरवर्षी भरून नवे पीककर्ज उचलण्याची संंधी शासनाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. मात्र, शासनाच्या या संधीचा लाभ न घेता शेतकऱ्यांनी रूपांतरित कर्जफेड योजनेअंतर्गत थकीत कर्जाच्या हप्त्यांचा भरणा न केल्याने पुढील काळात कर्जमुक्ती योजनेतंर्गत केवळ थकीत हप्ते ग्राह्य धरून कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला तर उर्वरित मूळ कर्ज सदर हप्ते वगळता कायम ठेवण्यात आले. तथापि, कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ होऊनदेखील मूळ कर्जाची रक्कम माफ न करण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सदर कर्जमुक्ती नाकारल्याची माहिती आहे.

बॉक्स

१६० शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित

शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ हजार २३ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरविण्यात आले. मात्र, गत दोन महिन्यांपासून तालुक्यातील १६० शेतकऱ्यांच्या याद्या शासनाने अद्यापही प्रसिद्ध केल्या नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठरले आहेत. नवीन पीककर्ज उचल करण्यास अडथळा येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.