शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

जिल्ह्यात ३३ दिवसात २०१ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:01 IST

जिल्ह्यात ३३ दिवसात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी खरा पाऊस हा गत आठवड्यातीलच आहे. तब्बल महिनाभराच्या दडीनंतर पावसाचे आगमन झाले असून गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : रोवणीच्या कामाला वेग, जलसाठ्यांची स्थिती मात्र कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ३३ दिवसात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी खरा पाऊस हा गत आठवड्यातीलच आहे. तब्बल महिनाभराच्या दडीनंतर पावसाचे आगमन झाले असून गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.भंडारा जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३ जुलै पर्यंत २३८.७ मिमी पाऊस कोसळतो. मात्र सध्या जिल्ह्यात या कालावधीत २०१.५ मिमी पाऊस कोसळला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीही याच कालावधीत २३१.७ मिमी पाऊस कोसळला होता. १ ते ३ जून पर्यंत पडणाऱ्या पावसाची सरासरी ८४ टक्के आहे.भंडारा तालुक्यात आतापर्यंत २३१.३ मिमी, मोहाडी २१७.३ मिमी, तुमसर २७३.८ मिमी, पवनी १४८.१ मिमी, साकोली २१५.२ मिमी, लाखांदूर १७५.७ मिमी, लाखनी १४९.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात कोसळला आहे. समाधानकारक पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आता धान रोवणीच्या कामाला लागला आहे. जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी अद्यापही जलसाठ्यात कोणतीच वाढ झाली नाही.गोसेखुर्द प्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा अद्यापही निरंक आहे. या प्रकल्पाचा एकुण साठा १४६.०८ दलघमी आहे. तर उपयुक्त पाणी साठा ७४०.१७ दलघमी आहे. पाणलोट क्षेत्रात ११३ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी या प्रकल्पाच्या पाण्यात कोणतीही वाढ झाली नाही.२४ तासात ६० मिमी पाऊसभंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ६०.०३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात ८९.२ मिमी तर सर्वात कमी पाऊस भंडारा तालुक्यात ४० मिमी कोसळला. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.