शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

२० लाखांचे अग्निशमन वाहन ३० लाखांच्या घरात कैद

By admin | Updated: March 31, 2016 00:52 IST

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयतर्फे महाराष्ट्र अग्निशमन अग्निसुरक्षा अभियानांतर्गत सन २०१३ मध्ये नगर परिषदेला ...

पवनी येथील प्रकार : चालकाविना वाहन पडूनअशोक पारधी  पवनी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयतर्फे महाराष्ट्र अग्निशमन अग्निसुरक्षा अभियानांतर्गत सन २०१३ मध्ये नगर परिषदेला रु. २० लाख किमतीचे अग्निशमन वाहन घेण्यासाठी निधी उपलब्ध झाला. त्याअंतर्गत अग्निशमन वाहन खरेदी करण्यात आले. मागील साडेतीन वर्षापासून वाहन चालकाशिवाय वाहन ३० लाखाच्या इमारतीमध्ये कैद करून ठेवलेले आहे.नोकर भरतीचे अधिकार पालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे वाहनचालकाची भरती प्रक्रिया जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याने वाहनचालक उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी अग्निशमन वाहनांची सेवा पवनीकरांना तसेच तालुकावासीयांना मिळू शकली नाही. उन तापू लागले आहे. उन्हाळा सुरु झाला म्हणजे दरवर्षी दुर्दैवाने घरांना आग लागण्याचे प्रकार सुरु होतात. अशावेळी तालुक्यातील प्रभावित जनतेला भंडारा किंवा उमरेड येथील अग्निशमन सेवेवर अवलंबून राहावे लागते. किमान १ ते दीड तास उशिराने वाहन घटनास्थळी पोहचत असते. तेव्हापर्यंत लोकांनी कितीही प्रयत्न केला. तरी खुप मोठे नुकसान झालेले असते. अशावेळी पवनी नगर परिषदेत कैद असलेल्या अग्निशमन वाहनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.अग्निशमन वाहन चालक प्रशिक्षीत असावा लागतो. ऐरवी ट्रॅक्टर चालविणारे चालक अग्निशमन वाहन चालवू शकत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाकडे उपलब्ध वाहन चालक अग्निशमन वाहन चालविणे व हाताळणे हे काम करण्यास असमर्थ आहेत. चालक नव्हते त्यामुळे हे वाहन फिल्टर प्लँट शेजारी उघड्यावर दोन वर्षे उभे राहिले. शेवटी वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ३० लाख रूपये खर्च करून गौतम वॉर्डात इमारत उभी करण्यात आली. या इमारतीमध्ये एक वर्षापासून अग्निशमन वाहन कैद करून ठेवण्यात आलेले आहे. वापरात नसल्याने वाहनाचे बॅटरीसारखे अनेक भाग निकामी झालेले राहतील म्हणजे पुन्हा वाहनावर खर्च करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येईल.पालिका प्रशासनाने स्वच्छता निरीक्षक, तारतंत्री व वाहनचालक कम आॅपरेटर (अग्निशमन वाहन) अशी पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती भंडारा यांचेकडे प्रस्ताव पाठविला. परंतु अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. जेव्हापर्यंत वाहनचालक नियुक्त होणार नाही तेव्हापर्यंत अग्निशमन वाहनास कारावासाची शिक्षा आहे असे समजण्यास हरकत नाही. वाहनाचा कारावास संपण्याचे अधिकार जिल्हास्तरावर राखून ठेवल्याचे बोलल्या जात आहे.