शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

२० लाखांचे अग्निशमन वाहन ३० लाखांच्या घरात कैद

By admin | Updated: March 31, 2016 00:52 IST

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयतर्फे महाराष्ट्र अग्निशमन अग्निसुरक्षा अभियानांतर्गत सन २०१३ मध्ये नगर परिषदेला ...

पवनी येथील प्रकार : चालकाविना वाहन पडूनअशोक पारधी  पवनी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयतर्फे महाराष्ट्र अग्निशमन अग्निसुरक्षा अभियानांतर्गत सन २०१३ मध्ये नगर परिषदेला रु. २० लाख किमतीचे अग्निशमन वाहन घेण्यासाठी निधी उपलब्ध झाला. त्याअंतर्गत अग्निशमन वाहन खरेदी करण्यात आले. मागील साडेतीन वर्षापासून वाहन चालकाशिवाय वाहन ३० लाखाच्या इमारतीमध्ये कैद करून ठेवलेले आहे.नोकर भरतीचे अधिकार पालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे वाहनचालकाची भरती प्रक्रिया जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याने वाहनचालक उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी अग्निशमन वाहनांची सेवा पवनीकरांना तसेच तालुकावासीयांना मिळू शकली नाही. उन तापू लागले आहे. उन्हाळा सुरु झाला म्हणजे दरवर्षी दुर्दैवाने घरांना आग लागण्याचे प्रकार सुरु होतात. अशावेळी तालुक्यातील प्रभावित जनतेला भंडारा किंवा उमरेड येथील अग्निशमन सेवेवर अवलंबून राहावे लागते. किमान १ ते दीड तास उशिराने वाहन घटनास्थळी पोहचत असते. तेव्हापर्यंत लोकांनी कितीही प्रयत्न केला. तरी खुप मोठे नुकसान झालेले असते. अशावेळी पवनी नगर परिषदेत कैद असलेल्या अग्निशमन वाहनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.अग्निशमन वाहन चालक प्रशिक्षीत असावा लागतो. ऐरवी ट्रॅक्टर चालविणारे चालक अग्निशमन वाहन चालवू शकत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाकडे उपलब्ध वाहन चालक अग्निशमन वाहन चालविणे व हाताळणे हे काम करण्यास असमर्थ आहेत. चालक नव्हते त्यामुळे हे वाहन फिल्टर प्लँट शेजारी उघड्यावर दोन वर्षे उभे राहिले. शेवटी वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ३० लाख रूपये खर्च करून गौतम वॉर्डात इमारत उभी करण्यात आली. या इमारतीमध्ये एक वर्षापासून अग्निशमन वाहन कैद करून ठेवण्यात आलेले आहे. वापरात नसल्याने वाहनाचे बॅटरीसारखे अनेक भाग निकामी झालेले राहतील म्हणजे पुन्हा वाहनावर खर्च करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येईल.पालिका प्रशासनाने स्वच्छता निरीक्षक, तारतंत्री व वाहनचालक कम आॅपरेटर (अग्निशमन वाहन) अशी पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती भंडारा यांचेकडे प्रस्ताव पाठविला. परंतु अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. जेव्हापर्यंत वाहनचालक नियुक्त होणार नाही तेव्हापर्यंत अग्निशमन वाहनास कारावासाची शिक्षा आहे असे समजण्यास हरकत नाही. वाहनाचा कारावास संपण्याचे अधिकार जिल्हास्तरावर राखून ठेवल्याचे बोलल्या जात आहे.