शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

बावनथडी धरणातून २० क्युबिक सोडले पाणी

By admin | Updated: September 7, 2016 00:39 IST

आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाने धान पिकाकरिता पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र तथा मध्य प्रदेश शासनाने सिंचनाकरिता सोडले पाणी : शेतीला पडल्या भेगा, शेतकरी डिझेल पंपाद्वारे करीत आहेत उपसामोहन भोयर तुमसर आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाने धान पिकाकरिता पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाचा संयुक्त बावनथडी (राजीव सागर) प्रकल्प आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. धानपिकाला पाण्याची सध्या गरज आहे. शेतात भेगा पडणे सुरु झाले आाहे. धान पिक वाचविण्याकरिता राज्य शासनाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. तिच स्थिती मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. मध्यप्रदेश शासनाने एकाचवेळी दि. २३ आॅगस्ट पासून प्रकल्पातून पाणी सोडणे सुरु केले.तुमसर व मोहाडी तालुक्यातील सुमारे आठ हजार हेक्टर शेतीला याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होईल असे जलसंपदा विभागाचे अभियंता यांनी लोकमतला सांगितले.१५ आॅगस्टपर्यंत धरणात ३५ टक्के जलसाठा होता. तांत्रिक भाषेत हा मृत जलसाठा समजला जातो. आतापर्यंत २० घनमीटर प्रतीसेकंद पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला. पुढील आदेशापर्यंत पाणी येथे सोडण्यात येणार आहे.खापा (तुमसर) परिसरातून बावनथडीचा मोठा कालवा जातो, परंतु लहान वितरिकेची कामे अपूर्ण असल्याने सुमारे ४०० एकर शेती सिंचनापासून वंचित आा६े. कालव्यात डिझेल पंप लावून येथील शेतकरी धानपिकांना पाणी देत आहे. याकरिता शेतकऱ्यांना डिझेलकरिता हजारो रुपये खर्च करावे लागत आहे.येथील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शेतीजवळून कालवा वाहते. परंतु आम्हाला पाणी मिळत नाही अशी खंत शेकडो शेतकऱ्यांनी व्यक्त केली. विहिर राहून तहानलेले अशी स्थिती येथे आहे. बावनथडी धरणातून सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातील सुमारे ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला पाणी मिळेल.- आय. बी. राठोड, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, भंडारा