शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी धरणातून २० क्युबिक सोडले पाणी

By admin | Updated: September 7, 2016 00:39 IST

आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाने धान पिकाकरिता पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र तथा मध्य प्रदेश शासनाने सिंचनाकरिता सोडले पाणी : शेतीला पडल्या भेगा, शेतकरी डिझेल पंपाद्वारे करीत आहेत उपसामोहन भोयर तुमसर आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाने धान पिकाकरिता पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाचा संयुक्त बावनथडी (राजीव सागर) प्रकल्प आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. धानपिकाला पाण्याची सध्या गरज आहे. शेतात भेगा पडणे सुरु झाले आाहे. धान पिक वाचविण्याकरिता राज्य शासनाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. तिच स्थिती मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. मध्यप्रदेश शासनाने एकाचवेळी दि. २३ आॅगस्ट पासून प्रकल्पातून पाणी सोडणे सुरु केले.तुमसर व मोहाडी तालुक्यातील सुमारे आठ हजार हेक्टर शेतीला याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होईल असे जलसंपदा विभागाचे अभियंता यांनी लोकमतला सांगितले.१५ आॅगस्टपर्यंत धरणात ३५ टक्के जलसाठा होता. तांत्रिक भाषेत हा मृत जलसाठा समजला जातो. आतापर्यंत २० घनमीटर प्रतीसेकंद पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला. पुढील आदेशापर्यंत पाणी येथे सोडण्यात येणार आहे.खापा (तुमसर) परिसरातून बावनथडीचा मोठा कालवा जातो, परंतु लहान वितरिकेची कामे अपूर्ण असल्याने सुमारे ४०० एकर शेती सिंचनापासून वंचित आा६े. कालव्यात डिझेल पंप लावून येथील शेतकरी धानपिकांना पाणी देत आहे. याकरिता शेतकऱ्यांना डिझेलकरिता हजारो रुपये खर्च करावे लागत आहे.येथील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शेतीजवळून कालवा वाहते. परंतु आम्हाला पाणी मिळत नाही अशी खंत शेकडो शेतकऱ्यांनी व्यक्त केली. विहिर राहून तहानलेले अशी स्थिती येथे आहे. बावनथडी धरणातून सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातील सुमारे ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला पाणी मिळेल.- आय. बी. राठोड, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, भंडारा