शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्दचे १९ दरवाजे उघडले

By admin | Updated: June 23, 2015 01:11 IST

मागील आठवडाभरात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती.

जनजीवन विस्कळीत अनेक गावे जलमय  कोरंभी-गणेशपूर मार्ग बंदभंडारा : मागील आठवडाभरात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती. सायंकाळ नंतर जोर धरलेल्या पावसाने सोमवारी दुपारी ३ वाजतानंतर उसंत घेतली. दरम्यान जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे. गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने ०.५० मिटरने १९ वक्रद्वारे उघडण्यात आले आहे. शहरालगत वाहणारा नाला दुथडी भरून वाहत असल्याने भंडारा कोरंभी मार्ग बंद झाल्याने सहा गावांचा संपर्क तुटला आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. सायंकाळच्या सुमारास पावसाने जोर धरला तो आज दुपारी ३ वाजतापर्यंत कायम होता. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले होते. पहिल्या पावसाने जोमदार हजेरी लावल्याने शहरासह ग्रामीण भागातीलही मुख्य मार्गावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागत आहे. उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने कोरडे पडलेले नदीनाले आता ओसंडून वाहू लागले आहे. वैनगंगा नदीच्या कारधा पुलावरून ३७ हजार ४१६ क्युसेस पाणी वाहत आहे. वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर काल सायंकाळी ५.३८ मिटर पाण्याची पातळी असल्याची नोंद करण्यात आली होती. रात्रभर पाऊस सुरु असल्याने यात वाढ झाली आहे. सोमवारला दुपारी ४ वाजता या पाण्यात २० सेंमी ची वाढ झाली असून सध्या पाण्याची पातळी ५.५८ मिटरपर्यंत पोहचली आहे. संततधार पावसामुळे नदीच्या प्रवाहातून गोसीखुर्द धरणात पाणी विसर्ग होत असल्याने धरणाची पाणीपातळी समतोल ठेवण्यासाठी धरणाची १९ वक्रद्वारे ०.५० मिटरने उघडण्यात आली आहे. धरणात २४०.६०० मिटर पाणी असून धरणाची पातळी स्थिर ठेवण्यासाठी २४० मिटर पाणी ठेवले जाते. ६०० मिटर पाणी क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने सोमवारला सकाळी धरणाचे ३ गेट ०.५० मिटरने उघडण्यात आले होते. सध्या धरणात ६६ हजार ४ क्युसेस पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सायंकाळी ५.३० च्या सुमारास धरणाची पातळी कायम ठेवण्यासाठी आणखी १६ असे १९ गेट उघडण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)सहा गावांचा संपर्क तुटलाभंडारा : भंडारा शहरालगतच्या गणेशपूर जवळून वाहणारा नाला सततच्या पावसामुळे व वैनगंगा नदीच्या बॅकवॉटरमुळे दुथडी भरून वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने पिंडकेपार, कोरंभी, सालेबर्डी, खैरीपांदी, जवाहरनगर, कवडसी या सहा गावांचा भंडारा शहराशी संपर्क तुटला आहे.जिल्ह्यात ६८ घरांची पडझड जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार १ ते २२ जून पर्यंत ६८ घरांची पावसामुळे पडझड झाली आहे. विजेमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झालेले आहेत. यासोबतच ११ जनावर मृत तर एक जखमी झाला आहे. ४३ घरांची व २४ गोठ्यांची अंशत: पडझड झाली आहे. मोहाडी तालुक्यातील एक घर पूर्णत: पडले असून जिल्ह्यात एकूण ६८ घरे पडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारापावसाने जोर धरला असल्याने नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत. गोसीखुर्द धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहे. रात्रभर पाऊस सुरु राहिल्यास किंवा मध्यप्रदेशातील धरणातून पाणी सोडल्यास नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना याचा धोका निर्माण होऊ शकतोण यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.