शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मौखिक आरोग्य तपासणीत आढळले १८ कर्करुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:44 IST

तंबाखुमुळे कर्करोग होतो ही बाब सर्वंश्रृत असली तरी तंबाखू खाण्याचे प्रमाण दिवसेंगणिक वाढत आहे. याचाच प्रत्यय राज्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणीत आला.

ठळक मुद्दे४.५१ लाख नागरिकांची तपासणी : आरोग्य विभागाचा पुढाकार

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : तंबाखुमुळे कर्करोग होतो ही बाब सर्वंश्रृत असली तरी तंबाखू खाण्याचे प्रमाण दिवसेंगणिक वाढत आहे. याचाच प्रत्यय राज्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणीत आला. भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणी मोहिमेत १८ कर्करुग्ण आढळून आले आहेत.राज्यात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात ४ लक्ष ५१ हजार ८९३ नागरिकांचा यात सहभाग होता. जिल्ह्यातील ७५ हजार ६४५ नागरिकांनी स्वत:हून तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी करून घेतली.तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी नागरिकांपर्यंत जाऊन ३ लक्ष ७६ हजार २४८ नागरिकांची तपासणी केली. यात ४८ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले. शासनाने असंसर्गीय आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष मोहिम हाती घेतली होती. यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नियोजन सुरु होते.अशी आहे व्यसनाधीन व्यक्तींची संख्याच्तपासणी अंतर्गत मद्यप्राशन करणारे ५९ हजार ९८८ लोकांची संख्या आहे. तसेच तंबाखू खाणारे १ लक्ष ६९ हजार ६३ व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. या अंतर्गत तंबाखू खाण्यामुळे तोंड न उघडता येणाºया व्यक्तींची संख्या ७ हजार ३५९, पांढरा लाल चट्टा असलेले १ हजार ७८०, जाडसर त्वचा असलेले ८०६ तर १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीत चट्टा बरा न झालेल्या इसमांची संख्या ४६१ आहे. विशेष म्हणजे मुखाची स्वच्छता राखणाºया व्यक्तींची संख्या २ लक्ष ९५ हजार ६८८ असून अस्वच्छता ठेवणाºया व्यक्तींची संख्या १ लक्ष २२ हजार ३४६ आहे.चार वर्षात वाढले रुग्णच्मागील चार वर्षात कर्करोगाने पीडित रुग्णांची संख्या १४ हून वाढून २३४ पर्यंत आली आहे. यात तोंडाच्या कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये १९ महिला तर ७९ पुरुषांचा समावेश आहे. सन २०१४ मध्ये १४ कर्करुग्ण होते. सन २०१५ मध्ये ६५ तर २०१६ मध्ये ६२ कर्करुग्ण आढळले. सर्वाधिक रुग्ण २०१७ मध्ये म्हणजेच ९३ इतके कर्करुग्ण आहेत. यात तोंडाचा कर्करुग्ण असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.तंबाखू सेवनापासून कर्करोग होतो, ही बाब माहित असतानाही सेवन करीत असलेल्या लोकांना या पासून परावृत्त करणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाच्या वतीने रुग्णालयात नि:शुल्क आरोग्य कर्करोग शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे.-डॉ.मनिष बत्रा,दंतरोग चिकित्सक सामान्य रुग्णालय भंडारा.