शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

मौखिक आरोग्य तपासणीत आढळले १८ कर्करुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:44 IST

तंबाखुमुळे कर्करोग होतो ही बाब सर्वंश्रृत असली तरी तंबाखू खाण्याचे प्रमाण दिवसेंगणिक वाढत आहे. याचाच प्रत्यय राज्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणीत आला.

ठळक मुद्दे४.५१ लाख नागरिकांची तपासणी : आरोग्य विभागाचा पुढाकार

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : तंबाखुमुळे कर्करोग होतो ही बाब सर्वंश्रृत असली तरी तंबाखू खाण्याचे प्रमाण दिवसेंगणिक वाढत आहे. याचाच प्रत्यय राज्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणीत आला. भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणी मोहिमेत १८ कर्करुग्ण आढळून आले आहेत.राज्यात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात ४ लक्ष ५१ हजार ८९३ नागरिकांचा यात सहभाग होता. जिल्ह्यातील ७५ हजार ६४५ नागरिकांनी स्वत:हून तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी करून घेतली.तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी नागरिकांपर्यंत जाऊन ३ लक्ष ७६ हजार २४८ नागरिकांची तपासणी केली. यात ४८ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले. शासनाने असंसर्गीय आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष मोहिम हाती घेतली होती. यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नियोजन सुरु होते.अशी आहे व्यसनाधीन व्यक्तींची संख्याच्तपासणी अंतर्गत मद्यप्राशन करणारे ५९ हजार ९८८ लोकांची संख्या आहे. तसेच तंबाखू खाणारे १ लक्ष ६९ हजार ६३ व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. या अंतर्गत तंबाखू खाण्यामुळे तोंड न उघडता येणाºया व्यक्तींची संख्या ७ हजार ३५९, पांढरा लाल चट्टा असलेले १ हजार ७८०, जाडसर त्वचा असलेले ८०६ तर १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीत चट्टा बरा न झालेल्या इसमांची संख्या ४६१ आहे. विशेष म्हणजे मुखाची स्वच्छता राखणाºया व्यक्तींची संख्या २ लक्ष ९५ हजार ६८८ असून अस्वच्छता ठेवणाºया व्यक्तींची संख्या १ लक्ष २२ हजार ३४६ आहे.चार वर्षात वाढले रुग्णच्मागील चार वर्षात कर्करोगाने पीडित रुग्णांची संख्या १४ हून वाढून २३४ पर्यंत आली आहे. यात तोंडाच्या कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये १९ महिला तर ७९ पुरुषांचा समावेश आहे. सन २०१४ मध्ये १४ कर्करुग्ण होते. सन २०१५ मध्ये ६५ तर २०१६ मध्ये ६२ कर्करुग्ण आढळले. सर्वाधिक रुग्ण २०१७ मध्ये म्हणजेच ९३ इतके कर्करुग्ण आहेत. यात तोंडाचा कर्करुग्ण असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.तंबाखू सेवनापासून कर्करोग होतो, ही बाब माहित असतानाही सेवन करीत असलेल्या लोकांना या पासून परावृत्त करणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाच्या वतीने रुग्णालयात नि:शुल्क आरोग्य कर्करोग शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे.-डॉ.मनिष बत्रा,दंतरोग चिकित्सक सामान्य रुग्णालय भंडारा.