शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणार्थ ३३ गावात १७८ योजना

By admin | Updated: May 26, 2017 02:04 IST

वैनगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने यावर्षी पवनी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने

पवनी तालुका : सहायकांची बदली, मान्सूनच्या तोंडावर कामांची लगीनघाईलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : वैनगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने यावर्षी पवनी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने पाणी टंचाई निवारणार्थ ३६ गावांमध्ये १७८ योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या होत्या. पंचायत समिती स्तरावरून पूर्ण करावयाच्या कित्येक योजना पूर्ण झालेल्या आहेत. मात्र पाण्याची पातळी खाली गेलेली असल्याने पाणी टंचाईचे सावट पूर्णत: दूर झालेले नाही.पाणी टंचाई निवारणार्थ प्रस्तावित करण्यात आलेल्या योजनामध्ये नवीन विंधन विहीर २६ गावात ५६, कुपनलिका ३ गावात ३, विंधन विहीरीची विशेष दुरूस्ती १७ गावात ३२, नळ योजनेची विशेष दुरूस्ती २२ गावात २३, तात्पूरती पुरक नळ योजना एक, विहीर खोलीकरण, गाळ काढणे ३६ गावांमध्ये ६३ अशा एकूण ३६ गावांसाठी १७८ योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी कित्येक योजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तयार करण्यात आलेल्या बृहत आराखड्यानुसार तालुक्यातील खैरी दिवाण, इटगाव, भोजापूर, रेवणी, सिंधी, पाथरी, मोहरी, लावडी, आकोट, बाचेवाडी, विरली खंदार, उमरी अड्याळ, नवेगाव पाले, धानोरी, खापरी भुयार, आमगाव आदर्श सेंद्री बुज, मिन्सी, सोमनाळा खुर्द, चिखली गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. बृहत आराखड्यास मंजुर करून संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात आलेली आहे. पवनी पंचायत स्तरावरून करावयाचीकामे पूर्ण करण्यात आलेल असून जिल्हा परिषद स्तरावरील कामे प्रगती पथावर आहेत. पंचायत समिती स्तरावर कनिष्ठ अभियंता पद रिक्त आहे. यातील सहायकांची बदली झालेली आहे. त्यांना बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे लागणार आहे. अशा वेळी पंचायत समितीचे बांधकाम विभाग पोरके होणार असल्याची चर्चा आहे.प्रभाग क्रमांक १० मध्ये भीषण पाणीटंचाईभंडारा : शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये पाणीटंचाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. सदर परिसरातील पाणीटंचाईची समस्या न सोडविल्यास नगरपरिषद कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेविका शुभांगी लोकेश खोब्रागडे यांनी दिला आहे. या आशयाचे निवेदन नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांना देण्यात आले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत रमाबाई आंबेडकर वॉर्ड, संत ज्ञानेश्वर वॉर्ड, कपिलनगर, साईनाथनगर आदी क्षेत्राचा भाग येतो. आंबेडकर वॉर्डातील विद्यानगर, सत्कारनगर परिसरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, नगरपरिषदेचे गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील नळ कनेक्शन त्वरीत बंद करण्यात यावे, पटवारी भवन परिसरात असलेल्या पंपगृहात जलकुंभ बसविण्यात यावे, योगेश भुरे यांच्या घरासमोरील बोरवेलचा उपसा करणे, अरुण अंबांदे यांच्या घरासमोर बोरवेल तयार करणे, संत ज्ञानेश्वर वॉर्डतील नहाले यांच्या घराशेजारील व मनिष मते यांच्या घरासमोरील बोरवेलचा उपसा करणे तसेच कपीलनगरातील बगीचा परिसरात असलेल्या बोरवेलवर पंपगृह निर्माण करून पाण्याची टाकी निर्माण करणे, बौद्ध विहार परिसरात नवीन बोरवेल्सची निर्मिती करणे व साईनाथ नगर येथील तुपकर यांच्या घरासमोर असलेल्या सार्वजनिक विहिरीवर पंपगृह बनवून पाण्याची टाकी निर्माण करणे आदींची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरसेविका शुभांगी खोब्रागडे यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत मागण्यांची पुर्तता न झाल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे. कोंढीत अशुद्ध पाणीपुरवठाजवाहरनगर : तालुक्याच्या पश्चिम टोकावर वसलेले व कन्हान नदीच्या सुपीक खोऱ्यात वसलेले कोंढी हे पुरातन गाव. या गावातील लोकसंख्या सुमारे चार हजाराच्या घरात आहे. राजकीय चळवळीचे हे एक गाव म्हणून गणल्या गेले. मात्र येथे शुद्ध पाण्याचा अभाव दिसून येतो. आज घडीला टंचाईकृती आराखड्यांतर्गत बोर करून गावात तुटपुंज अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्यासाठी योग्य स्त्रोत कन्हान नदीजवळ असताना सुद्धा शुद्ध पाणीपुरवठ्याची सोयी सुविधा नाही. जनतेला विशेष करून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देण्यात यावे. गावात जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत कोंढी, सावरी, राजेदहेगाव, इंदिरानगर, खराडी, खरबी, चिखली या गावांसाठी मोठ्या स्वरूपांची जलशुद्धीकरण युक्त पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करून ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.