शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१.७७ लाख हेक्टरमध्ये होणार धान लागवड

By admin | Updated: June 3, 2015 00:48 IST

येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. पीक लागवडीच्या दृष्टीने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ...

भंडारा : येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. पीक लागवडीच्या दृष्टीने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी सर्वसाधारण क्षेत्रापैकी १ लाख ७७ हजार २९३ हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून जिल्ह्यासाठी ६७ हजार ३०० मेट्रिक टन खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे.भाताचे कोठार म्हणून सर्वश्रूत असलेल्या भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. वरूणराजाने दडी मारल्याने अनेकांची पऱ्हे करपून तर काहींनी रोवणी पाण्याअभावी हातून गेली. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांच्या शेतीत धानाचे उत्पादन झाले नसल्याने शेती पडीक राहली.जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधिक्षक कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी खरीप व रब्बी पिकांचा अहवाल शासनाकडे सादर करतो. यावर्षी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्रापैकी १ लाख ७७ हजार २९३ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात येणार आहे. त्यासोबतच तूर, सोयाबीन, ऊस व अन्य पिकांची लागवड करण्यात येणार आहे. तूर पिकाची ८ हजार २५४ हेक्टर क्षेत्रात लागवड होणार असून सोयाबीनची ८ हजार ३३० क्षेत्रात लागवड होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला. यावर मात करता यावी, म्हणून खरीप हंगामात अनेकांनी भात पिकांऐवजी नगदी पीक म्हणून ऊस पिकाची लागवड करण्याचे ठरविले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊस पीक सुमारे ४ हजार हेक्टरमध्ये वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भात पिकासाठी ३८ हजार ५८६ क्ंिवटल बियाणांची गरज असून महाबीजकडे १३ हजार ५०० क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. तूर पिकासाठी ४५० क्ंिवटलची आवश्यकता असून महाबीजकडे २७० क्ंिवटलची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीनची ८ हजार ३३० हेक्टरमध्ये पेरणी होणार असून त्यासाठी ५ हजार ४७२ क्ंिवटलची आवश्यक असून त्यापैकी ३ हजार २८२ क्ंिवटल बियाणांची महाबीजकडे मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)खताच्या लिंकिंग रोखण्यावर भरजिल्ह्यात खताची लिंकिंग तसेच परप्रांतात खताची विक्री होणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृषिनिविष्ठा संनियंत्रण स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खते, बियाणे निरीक्षकांनी सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. भरारी पथक व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे.