शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

४३६ पैकी १७२ पदे रिक्त; कसा होणार शेतीची विकास ?

By युवराज गोमास | Updated: July 20, 2024 15:22 IST

कृषी विभाग : रिक्त पदांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : भंडारा कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात उद्योग व व्यापारापेक्षा सर्वाधिक रोजगार निर्मिती कृषी क्षेत्रातून होते. परंतु, जिल्ह्यात कृषीच्या पायाभूत विकासाचे मार्गदर्शन व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या कृषी विभागात रिक्त पदांचा ताण अनेक वर्षांपासून कायम आहे. जिल्ह्यात कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत एकूण ४३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी २६४ पदे भरलेली असून, १७२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांची प्रगती होण्यास अडथळे येत आहेत.

शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या विघातक दुष्परिणामाची माहिती नसते. त्याचा फटका अनेकदा बसतो. प्रसंगी शेतकऱ्यांचा जीवही जातो. जिल्ह्यात आधुनिक कृषी तंत्र. यंत्र, पीक लागवडीची, तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीच्या माहिती अनेकांना नसल्याने उत्पादनात वाढ झालेली नाही. कृषी विभागाच्या योजनांपासून शेतकरी अनभिन्न आहे. पारंपरिक पद्धतीनेच शेती होताना दिसत आहे. यात बदल घडवून आणण्याची क्षमता कृषी विभागात आहे.

गट 'अ' दर्जाची ५ पैकी ३ पदे रिक्तजिल्ह्यात कृषी उपसंचालकाचे पद रिक्त आहे. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असताना केवळ एक पद भरलेले असून, एक रिक्त आहे. पदभार सोपवून दिवस ढकलण्याचे काम होताना दिसत आहेत.

गट 'क' श्रेणीतील ३१८ पैकी १०७ पदे रिक्तजिल्ह्यात गट 'क' श्रेणी तरी कर्मचाऱ्यांची ३१८ पदांना मान्यता आहे. त्यापैकी २११ पदे भरलेली असून, १०७ पदे रिक्त आहेत. यात कृषी सहायक, अनुरेखक, वाहन चालक व कनिष्ठ लिपिकांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. कृषी सहायकांची ४८, तर कृषी पर्यवेक्षकांची पाच पदे रिक्त आहेत.

गट 'ब' अधिकाऱ्यांची १५ पदे रिक्तशासनाच्या योजना व नव तंत्रज्ञानाची माहिती पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी गट 'ब' अधिकाऱ्यांची असते. जिल्ह्यात गट ब अधिकाऱ्यांची ४२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २७ पदे भरलेली असून, १५ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात सात तालुका कृषी अधिकाऱ्यांपैकी एक पद भरलेले असून, सहा पदे रिक्त आहेत.

गट 'ड' श्रेणीतील ४७ पदांची कमतरताविभागाच्या तळ पातळीवर थेट काम करणाऱ्या गट 'ड' कर्मचाऱ्यांची ७० पदे मंजूर असताना केवळ २३ पदे भरलेली असून, ४७ पदे रिक्त आहेत. यामुळे कामांचा खोळंबा होत आहे.

"कृषी विभागात रिक्त पदांमुळे कामांचा ताण वाढत असला तरी प्रभार सोपवून कामे निकाली काढली जातात. शेती व शेतकऱ्यांची प्रगती साधण्याकडे कृषी विभागाचे विशेष लक्ष आहे."- संगिता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी