शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

२४ दिवसांत १६३ टक्के पाऊस

By admin | Updated: June 25, 2015 00:30 IST

पावसाच्या नक्षत्रांना प्रारंभ होताच वरुण राजानेही मुक्त हस्ताने हजेरी लावली आहे.

शेतकरी सुखावला : जिल्ह्यात ४० टक्के पेरणी पूर्णभंडारा : पावसाच्या नक्षत्रांना प्रारंभ होताच वरुण राजानेही मुक्त हस्ताने हजेरी लावली आहे. मागील २४ दिवसात जिल्ह्यात १६३ टक्के पाऊस बरसला आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून धान पेरणी जोमात सुरु आहे. जिल्ह्यात दि.१ जून ते ३० सप्टेंबर पर्यंत अशा कालावधीत तालुकानिहाय दैनंदिन पर्जन्यमानाची नोंद करण्यात येत असते. यावर्षी दि.१ जून ते २४ जून या कालावधीत एकुण सरासरी २५५.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी याच तारखेला १५६.५ मि.मी. पाऊस बरसला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची टक्केवारी थोडी अधिक आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असून धान उत्पादक शेतकऱ्याला पेरणीसाठी वेळ मिळाला आहे. गत २४ दिवसात भंडारा तालुक्यात ३१९.३ मि.मी., मोहाडी ३२३.३ मि.मी., तुमसर २४९.४ मि.मी., पवनी २४७.६ मि.मी., साकोली २०८.९ मि.मी., लाखांदूर १५७.३ मि.मी. तर लाखनी तालुक्यात २८४.७ मि.मी. पाऊस बरसला आहे. या सर्वांची बेरीज १७९०.५ असून सरासरी २५५.८ मि.मी. आहे. जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान सरासरी १३३०.२ मि.मी. बरसला पाहिजे, अशी नोंद करण्यात येत असते. ३० सप्टेंबर पर्यंत बरसलेल्या पावसाच्या आधारावर टक्केवारी काढण्यात येते. सध्या मागील २४ दिवसात २०१४ च्या तुलनेत ६३ टक्के पाऊस अधिक बरसला. (प्रतिनिधी)आठ गेट अर्ध्या मीटरने सुरुजिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची रिपरीप होती. त्यामुळे नदीनाल्यातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. हा जलसाठा गोसेखुर्द धरणात विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची पाणी पातळी समतोल ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या दिवशी १९ वक्रद्वार ०.५० मिटरने उघडली होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने आणखी सहा दरवाजे असे २५ दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. पाऊस मंदावला असून आज दुपारनंतर उर्वरीत १७ गेट बंद करण्यात आली आहेत. सध्या गोसीखुर्दची ८ वक्रद्वार ०.५० मिटरने उघडी ठेवण्यात आली आहे. यातून ७७४ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. रात्रभर पावसाने जोर धरल्यास उद्या आणखी काही वक्रद्वारे उघडण्यात येतील.