देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ मध्यम, लघू, जुने मालगुजारी प्रकल्पात सोमवार रोजी ६३.९६ टक्के जलसाठा आहे. यातील सहा लघु प्रकल्प व दहा जुने मालगुजारी तलाव असे एकूण १६ प्रकल्प तुडूंब भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रकल्पामध्ये १४ टक्के जलसाठा अधिकचा आहे.भंडारा जिल्ह्यात गत आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात अचानक भरीव वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांची चिंता निर्माण झाली होती. शेतकरी धास्तावला असतानाच गत आठवड्याभरापासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आता सुखावला आहे. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागांतर्गत चार मध्यम प्रकलप आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा. मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे. १७ ऑगस्ट रोजी चांदपूर मध्यम प्रकल्पात ६२.९१, बघेडा ८३.९६, बेटेकर बोथली ५४.८८ तर सोरना जलाशयात ३२.६२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ६८.९८ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा ७८.९५ टक्के आहे.जिल्ह्यातील १६ सिंचन प्रकल्प तुडूंब भरले असून जिल्ह्यातील बहुतांश लघु प्रकल्प व माजी मालगुजारी तलावात जलसाठ्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची आवश्यकता असतानाच ऑगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात झालेल्या पावसाच्या हजेरीने शेतकरी आनंदीत आहे.तुडूंब भरलेले प्रकल्प्जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांतर्गत दहा जुने मालगुजारी तलाव व सहा लघु प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यामध्ये कवलेवाडा, डोंगरला, कारली, नागठाणा, मंडनगाव, गुढरी, रेंगेपार कोठा. लघु प्रकल्प व एकोडी, आमगाव, पिंडकेपार, पाथरी, परसोडी, लवारी, सानगडी, रेंगेपार कोहळी, कनेरी व चालना येथील मालगुजारी तलावांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ टक्के जलसाठा अधिक आहे. २०१८ मध्ये जलसाठा केवळ ३९.३७ टक्के एवढा होता. गत दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक आहे.
जिल्ह्यातील १६ प्रकल्प तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST
भंडारा जिल्ह्यात गत आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात अचानक भरीव वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांची चिंता निर्माण झाली होती.
जिल्ह्यातील १६ प्रकल्प तुडुंब
ठळक मुद्दे६३ प्रकल्प : गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्के जलसाठा अधिक